शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 22:29 IST

महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे

- धर्मराज हल्लाळेमहापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे लातूर महापालिका भाजपाकडे राहिली तर निधी उपलब्ध होईल. विकासकामांना गती येईल, अशी अपेक्षा आहे. परंतू, ज्यांना पदावरून हटविले जाईल त्यांची नाराजी दूर झाली नाही तर आकड्यांच्या खेळात भाजपाला सत्तेची मिळालेली संधी गमवावी लागेल. महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे तसेच स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी राजीनामे दिले आहेत. स्वीकृत नगरसेवकांचे मागितल्याचे समजते. लातूर महापालिकेत सत्ताधारी भाजपाचे ३६, काँग्रेसचे ३३ आणि राष्ट्रवादीचे १ असे बलाबल आहे. स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसचे समान सदस्य आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या वेळी काँग्रेसने नाराजांना जवळ केले तर सत्ताधा-यांना नामुष्किला सामोरे जावे लागेल. मात्र काँग्रेसची रणनिती सध्या तरी सत्ता हस्तगत करण्याची दिसत नाही़ एकूणच डबघाईला आलेली महापालिका़ सत्ता असूनही मिळत नसलेला पुरेसा निधी ही कारणे काँगे्रसने तूर्त सत्तेपासून दूर राहण्यासाठी पुरेशी आहेत.सुरेश पवार हे प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होते. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत. कामाचा अनुभव आणि सर्वांशी असेलेले मधुरसंबंध या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. एकंदर महापालिकेत ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे व पक्ष ज्या त-हेने सत्ता हाकत आहे ते पाहता सुरेश पवार हे भाजपासाठी योग्य पर्याय होते. परंतु, नेमके काय बिनसले हे बाहेर येत नाही़ सयंमी स्वभावामुळे पवार कार्यकाळ पूर्ण करतील, अशी आशा होती. मध्यंतरी काँग्रेसने भाजपातील असंतुष्ट गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ऐनवेळी चमत्कार घडेल, असेही सांगितले. त्याचा परिणामही दिसला. महापौरांनी बोलावलेल्या सभेला सत्ताधारी भाजपाचेच अनेक सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ आली. एकूणच भाजपातील जुन्या आणि नव्या पदाधिकारी व सदस्यांची कुरघोडी चर्चेत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे धुसफूस सुरू आहे. त्यामुळे नवीन निवड करताना नाराजांचा गट इकडेतिकडे झाला तर राजकीय गणित बदलणार आहे.महापौरांच्या विरोधात तक्रार देऊन भविष्यात सत्ता बदल घडविण्याचा उत्साह काहीजणांचा असला तरी काँग्रेस श्रेष्ठी घाई करणार नाही. असे दिसते. कामांना गती नसल्यामुळे जनतेत ओरड आहे. करवाढीचा मुद्दा आहे. शहरभरातील खड्डे डांबरीकरणाने दूर झाले ही एक जमेची बाजु सोडली तर महापालिकेच्या कामावर समाधान नाही. मात्र भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर सत्ता पक्षाला आपल्या सदस्यांना जोडून ठेवणे कठीण जाणार आहे. कालांतराने पक्षांतरांचे वारे वाहतील का ? या प्रश्नाचेही उत्तर लवकरच कळणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाlaturलातूर