शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 22:29 IST

महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे

- धर्मराज हल्लाळेमहापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे लातूर महापालिका भाजपाकडे राहिली तर निधी उपलब्ध होईल. विकासकामांना गती येईल, अशी अपेक्षा आहे. परंतू, ज्यांना पदावरून हटविले जाईल त्यांची नाराजी दूर झाली नाही तर आकड्यांच्या खेळात भाजपाला सत्तेची मिळालेली संधी गमवावी लागेल. महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे तसेच स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी राजीनामे दिले आहेत. स्वीकृत नगरसेवकांचे मागितल्याचे समजते. लातूर महापालिकेत सत्ताधारी भाजपाचे ३६, काँग्रेसचे ३३ आणि राष्ट्रवादीचे १ असे बलाबल आहे. स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसचे समान सदस्य आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या वेळी काँग्रेसने नाराजांना जवळ केले तर सत्ताधा-यांना नामुष्किला सामोरे जावे लागेल. मात्र काँग्रेसची रणनिती सध्या तरी सत्ता हस्तगत करण्याची दिसत नाही़ एकूणच डबघाईला आलेली महापालिका़ सत्ता असूनही मिळत नसलेला पुरेसा निधी ही कारणे काँगे्रसने तूर्त सत्तेपासून दूर राहण्यासाठी पुरेशी आहेत.सुरेश पवार हे प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होते. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत. कामाचा अनुभव आणि सर्वांशी असेलेले मधुरसंबंध या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. एकंदर महापालिकेत ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे व पक्ष ज्या त-हेने सत्ता हाकत आहे ते पाहता सुरेश पवार हे भाजपासाठी योग्य पर्याय होते. परंतु, नेमके काय बिनसले हे बाहेर येत नाही़ सयंमी स्वभावामुळे पवार कार्यकाळ पूर्ण करतील, अशी आशा होती. मध्यंतरी काँग्रेसने भाजपातील असंतुष्ट गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ऐनवेळी चमत्कार घडेल, असेही सांगितले. त्याचा परिणामही दिसला. महापौरांनी बोलावलेल्या सभेला सत्ताधारी भाजपाचेच अनेक सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ आली. एकूणच भाजपातील जुन्या आणि नव्या पदाधिकारी व सदस्यांची कुरघोडी चर्चेत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे धुसफूस सुरू आहे. त्यामुळे नवीन निवड करताना नाराजांचा गट इकडेतिकडे झाला तर राजकीय गणित बदलणार आहे.महापौरांच्या विरोधात तक्रार देऊन भविष्यात सत्ता बदल घडविण्याचा उत्साह काहीजणांचा असला तरी काँग्रेस श्रेष्ठी घाई करणार नाही. असे दिसते. कामांना गती नसल्यामुळे जनतेत ओरड आहे. करवाढीचा मुद्दा आहे. शहरभरातील खड्डे डांबरीकरणाने दूर झाले ही एक जमेची बाजु सोडली तर महापालिकेच्या कामावर समाधान नाही. मात्र भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर सत्ता पक्षाला आपल्या सदस्यांना जोडून ठेवणे कठीण जाणार आहे. कालांतराने पक्षांतरांचे वारे वाहतील का ? या प्रश्नाचेही उत्तर लवकरच कळणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाlaturलातूर