शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लातूर महापालिकेत भाजपा कार्यकाळ पूर्ण करणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 22:29 IST

महापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे

- धर्मराज हल्लाळेमहापौर, उपमहापौर यांची अडीच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लातूर महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपाने पदाधिका-यांचे राजीनामे घेतले. आता नव्याने पदाधिकारी निवडले जातील. मात्र एकंदर काठावरचे बहुमत आणि अंतर्गत गटबाजीमुळे सत्ताधारी पक्षही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळे लातूर महापालिका भाजपाकडे राहिली तर निधी उपलब्ध होईल. विकासकामांना गती येईल, अशी अपेक्षा आहे. परंतू, ज्यांना पदावरून हटविले जाईल त्यांची नाराजी दूर झाली नाही तर आकड्यांच्या खेळात भाजपाला सत्तेची मिळालेली संधी गमवावी लागेल. महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे तसेच स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी राजीनामे दिले आहेत. स्वीकृत नगरसेवकांचे मागितल्याचे समजते. लातूर महापालिकेत सत्ताधारी भाजपाचे ३६, काँग्रेसचे ३३ आणि राष्ट्रवादीचे १ असे बलाबल आहे. स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसचे समान सदस्य आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या वेळी काँग्रेसने नाराजांना जवळ केले तर सत्ताधा-यांना नामुष्किला सामोरे जावे लागेल. मात्र काँग्रेसची रणनिती सध्या तरी सत्ता हस्तगत करण्याची दिसत नाही़ एकूणच डबघाईला आलेली महापालिका़ सत्ता असूनही मिळत नसलेला पुरेसा निधी ही कारणे काँगे्रसने तूर्त सत्तेपासून दूर राहण्यासाठी पुरेशी आहेत.सुरेश पवार हे प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होते. सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत. कामाचा अनुभव आणि सर्वांशी असेलेले मधुरसंबंध या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. एकंदर महापालिकेत ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे व पक्ष ज्या त-हेने सत्ता हाकत आहे ते पाहता सुरेश पवार हे भाजपासाठी योग्य पर्याय होते. परंतु, नेमके काय बिनसले हे बाहेर येत नाही़ सयंमी स्वभावामुळे पवार कार्यकाळ पूर्ण करतील, अशी आशा होती. मध्यंतरी काँग्रेसने भाजपातील असंतुष्ट गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ऐनवेळी चमत्कार घडेल, असेही सांगितले. त्याचा परिणामही दिसला. महापौरांनी बोलावलेल्या सभेला सत्ताधारी भाजपाचेच अनेक सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ आली. एकूणच भाजपातील जुन्या आणि नव्या पदाधिकारी व सदस्यांची कुरघोडी चर्चेत आहे. अंतर्गत गटबाजीमुळे धुसफूस सुरू आहे. त्यामुळे नवीन निवड करताना नाराजांचा गट इकडेतिकडे झाला तर राजकीय गणित बदलणार आहे.महापौरांच्या विरोधात तक्रार देऊन भविष्यात सत्ता बदल घडविण्याचा उत्साह काहीजणांचा असला तरी काँग्रेस श्रेष्ठी घाई करणार नाही. असे दिसते. कामांना गती नसल्यामुळे जनतेत ओरड आहे. करवाढीचा मुद्दा आहे. शहरभरातील खड्डे डांबरीकरणाने दूर झाले ही एक जमेची बाजु सोडली तर महापालिकेच्या कामावर समाधान नाही. मात्र भविष्यात लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर सत्ता पक्षाला आपल्या सदस्यांना जोडून ठेवणे कठीण जाणार आहे. कालांतराने पक्षांतरांचे वारे वाहतील का ? या प्रश्नाचेही उत्तर लवकरच कळणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाlaturलातूर