शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 06:37 IST

फटाक्यांचा धूर ही इतर ओझ्याने दबलेल्या उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी! फटाक्यांवर बंदी घातली आणि ती पाळली गेली, तर श्वास मोकळा होईल?

प्रियदर्शिनी कर्वे, समुचित एन्व्हायरो टेक, पुणे

सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या एका सुनावणीमुळे दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणाचा विषय प्रकाशझोतात आला आहे. दिल्लीच्या आसपासच्या फटाके उद्योजकांनी त्यांचे परवाने रद्द करण्याच्या  एका निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, फटाक्यांच्या उत्पादनावर फक्त दिल्लीतच बंदी का, देशभर का नाही, दिल्लीतल्या नागरिकांचे आरोग्य इतर नागरिकांच्या आरोग्यापेक्षा जास्त मोलाचे आहे का? दुसऱ्या दिवशी खंडपीठाने फटाके उद्योगांचे परवाने रद्द करण्याच्या पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती दिली! अर्थात सुनावणी अजून चालू आहे, त्यामुळे आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही.

भारतातील शहरांमधल्या हवेच्या प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत असणारे घटक म्हणजे रस्त्यांवरील वाहने, चालू बांधकामे आणि कचऱ्याचे अव्यवस्थापन. वाहनांच्या इंजिनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणात गेल्या दोनेक दशकांमध्ये बऱ्यापैकी घट झालेली आहे. तरीही, वाहनांचे योगदान जास्त आहे, ते वाहनांची रबरी चाके व रस्त्यांच्या घर्षणातून हवेत उडणाऱ्या धूळ आणि रबरच्या कणांमुळे. बांधकामे चालू असताना,  हवेत सिमेंट, माती, डांबर, इ. चे सूक्ष्म कण उडतात. यात २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान व्यासाचे कण थेट फुप्फुसामध्ये जाऊन पोहोचतात आणि हे सर्वाधिक धोकादायक आहे. घन कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही व कचरा गोळा करण्याची यंत्रणा अकार्यक्षम आणि अपुरी आहे.  बराचसा मिश्र कचरा उघड्यावर अशास्त्रीय पद्धतीने जाळला जातो किंवा कुजतो. त्यातून कार्बन मोनॉक्साइड, मिथेन, सल्फर डायॉक्साइड व इतर अनेक घातक वायू हवेत मिसळतात.  शहरांतील जलाशयांमध्येही सांडपाणी आणि घन कचरा कोणतीही प्रक्रिया न करता मिसळला जातो. तिथे त्याचे विघटन होऊनही मिथेन व इतर घातक वायू हवेत मिसळतात. या सर्व समस्या सर्व शहरांत वर्षभर आहेत. त्यामुळे शहरांमधील प्रदूषणाची पातळी धोकादायक असते.

उन्हाळ्यात थोडा-फार वारा असतो, त्यामुळे प्रदूषण इतस्ततः पसरते, त्याची तीव्रता कमी होते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याबरोबर काही प्रदूषण जमिनीवर येते आणि तात्कालिक परिस्थिती सुधारते. मात्र, हिवाळ्यात प्रश्न चिघळतो. उत्तर भारतात हिवाळ्यात वारा पूर्ण पडलेला असतो. त्यामुळे हवेतले प्रदूषण शहरावरच साठत राहते. त्याचवेळी ग्रामीण भागात पिकांची कापणी झाल्यावर शेतात पडलेला काडीकचरा शेतकरी जाळून टाकू लागतात. यामुळेही प्रदूषणात भर पडते. याचदरम्यान दिवाळीतल्या फटक्यांचा धूर प्रदूषणाची तीव्रता आणखी वाढवतो.

फटाक्यांचा धूर हा इतर मालाच्या ओझ्याने दबलेल्या उंटाची पाठ मोडणारी शेवटची काडी आहे. फटाक्यांवर बंदी घातली आणि ती पाळली गेली, तरी वर्षभरातली प्रदूषणाची मूळ समस्या सुटणार नाही. पण, दिवाळीच्या कालावधीत प्रदूषण जी अत्युच्च पातळी ओलांडते, त्याला नक्कीच आळा बसेल आणि या दिवसांत आरोग्यावर होणारे हानीकारक परिणाम टाळता येतील. फटाके ध्वनी प्रदूषणातही भर घालतात, त्यालाही आळा बसू शकेल. पण, फटाके निर्मितीचे उद्योग बंद झाले, तर कित्येक लोकांचा रोजगार जाणार आहे. नागपूरस्थित नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले आहेत. या फटक्यांमध्ये कमी घातक रसायने वापरली जातात. त्यातून पाण्याची वाफही बाहेर पडते व ती फटाक्यांचे कण हवेत उडण्याला प्रतिबंध करते. या फटाक्यांचा आवाजही कमी असतो. फटाके उद्योगाने या फटाक्यांची निर्मिती करावी व ग्राहकांनीही हरित फटाके विकत घ्यावे, अशी शिफारस हरित लवाद व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पूर्वीच केलेली आहे. पण, याबाबत पुरेशी जनजागृती नाही आणि राजकीय इच्छाशक्तीही कमी पडते.

सध्या चालू असलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाक्यांबद्दलची माहिती नीरी व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून मागवली आहे. याचिका दिल्लीतल्या फटाके उत्पादकांची असली, तरी जे काही करायचे ते भारतभरासाठी लागू करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत दिसते. भारताच्या राज्यघटनेने प्रदूषणमुक्त हवा, पाणी, इ. मिळणे हा मूलभूत हक्क नागरिकांना दिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आणखी व्यापक विचार करून एकंदरच हवा आणि इतरही प्रदूषणाच्या मुद्द्याला हात घालावा. गणेशाेत्सवात ठिकठिकाणी ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, इ. टाळण्यासाठी आदेश दिले गेलेले असूनही प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत ते कसे धाब्यावर बसवले गेले, हे आपण अनुभवलेले आहे. त्यामुळे न्यायालयाचा काहीही आदेश आला, तरी तो पाळला जाणार की नाही, हाही कळीचा मुद्दा आहे!

pkarve@samuchit.com

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024pollutionप्रदूषणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय