शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

गोव्यात सतत पक्षांतरं का होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 10:04 IST

गोव्यात आमदार सतत पक्षांतरे करतात, त्यामुळे स्थैर्य हे एक आव्हान बनते, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या प्रचार सभेत केले.

- राजू नायक

गोव्यात आमदार सतत पक्षांतरे करतात, त्यामुळे स्थैर्य हे एक आव्हान बनते, असे विधान केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपच्या प्रचार सभेत केले, त्याची बरीच चर्चा झाली असली तरी त्यात तथ्य नाही, असे कोणी म्हणू शकत नाही.

१९९० च्या दशकात गोव्यात सतत पक्षांतरे झाली आहेत. त्यामुळेच केंद्राला पक्षांतरविरोधी कायदा आणावा लागला. गोव्यात तरीही पक्षांतरे होतात. गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षाच्या दोघा आमदारांनी पक्षांतर केले, त्यामुळे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या.

१९९० च्या दशकात गोव्याने पक्षांतराचा विक्रम करून १३ मुख्यमंत्री बनलेले पाहिले आहेत. त्यामुळे २००३मध्ये पक्षांतरविरोधी कायदा करावा लागला.

तज्ज्ञांच्या मते, चिमुकले राज्य व नेत्यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा, त्याचप्रमाणे मतदारांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे आमदार पक्षांतरे करतात, दुस-या पक्षात जाऊन लाभाची पदे मिळवितात व पुन्हा जिंकूनही येतात. मी सर्वात अधिक वेळा पक्ष बदललेले आहेत. परंतु मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असा निर्णय घेत आलो आहे, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी अलीकडेच म्हटले होते. आजगावकर यांनी २०१७च्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून फुटून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची उमेदवारी मिळविली व जिंकून आल्यानंतर त्या पक्षाच्या आणखी एका सदस्यासह सत्ताधारी भाजपात प्रवेश करून मंत्रिपद मिळविले. ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यांच्याविरुद्ध मगोपने पक्षांतर बंदी कायद्यान्वये तक्रार दाखल केली आहे.

मतदारसंघ लहान असल्यामुळे मतदारांचा आमदारांशी सतत संपर्क असतो. विकासकामांसाठी त्यांचा दबाव असतोच, परंतु वैयक्तिक कामे, विशेषत: नोक-यांसाठी दबाव खूपच आहे. सरकारी नोक-यांसाठी तर मंत्री, आमदारांकडे सतत रेटा लागलेला असतो. आमदाराची यशस्वीता त्याने किती सरकारी नोक-या आपल्या मतदारसंघात दिल्या यावर निश्चित होत असते. दुर्दैवाने राज्यात खोगीरभरतीमुळे प्रशासनावर ताण पडत असून सतत नवे कर्मचारी घ्यावे लागत असल्यामुळे खर्चाचा बोजाही वाढत आहे.

वास्तविक राज्याचा चिमुकलेपणा हा येथील राजकीय प्रश्न बनला आहे. पूर्वी पक्षांतरांना ‘मान्यता’ होती तेव्हा एक तृतीयांश सदस्य फुटत. २१ सदस्यांमध्ये सात सदस्य फुटणे सहज शक्य होत असे. पक्षाचे सदस्य सहा असले तर दोन सहज फुटत. तो प्रकार टाळण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा झाला. परंतु ‘पक्षांतरे’ जाऊन आता ‘राजीनामे’ आले आहेत. सदस्य आमदारकीचे राजीनामे देऊन सहज पुन्हा निवडणूक लढवतात. कारण छोटय़ा २८ हजार मतदारसंख्येच्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे तीन-चार हजार खात्रीचे मतदार असतात व उमेदवाराचे चार हजार मतदार असले तर आठ हजार मतसंख्या घेऊन ते जिंकून येऊ शकतात. घटनातज्ज्ञ अॅड. क्लिओफात आल्मेदा यांच्या मते, राज्यात लोकप्रिय स्वरूपाचे अनेक नेते आहेत. त्यांची स्वत:ची व्होट बँक असल्याने ते बिनदिक्कत राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढविणे पसंत करीत आले आहेत. ज्या राज्यात विधानसभा उमेदवाराचे मताधिक्यच दोन लाख असते तेथे हे प्रकार शक्य नाहीत.

दुर्दैवाने बहुसंख्य मतदारांना आपला आमदार प्रबळ मंत्री असावा असे वाटत असल्याने पक्षांतरांना नैतिक पाठिंबा लाभत असतो. त्यातून भ्रष्टाचारही वाढतो. स्वत:ची व्होट बँक तयार करण्यासाठी नेते प्रचंड भ्रष्टाचार करतात. काही मतदारसंघात मंत्री आपल्या खात्रीच्या व्होट बँकेची विमा, वीज, आरोग्याचा खर्च आणि घरदुरुस्तीही स्वत:च्या पैशांतून करतात, आणि ते भ्रष्ट नव्हे तर ‘लोकप्रिय’ आमदार गणले जातात!

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाMLAआमदारBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण