शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये का जातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 5:23 AM

तान्ह्या मुलांसाठीचे इन्क्युबेटर सुरक्षितच हवेत; पण आदिवासी आईचं बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवावंच लागू नये, याचीही व्यवस्था हवीच !

प्रगती जाधव-पाटील, (उपसंपादक, लोकमत सातारा) -

“ताई, काय सांगू? सरकार जे सांगतं ते सगळं देत नाहीच पण जे देतं तेसुद्धा  घ्या, असं सांगायला बायकांच्या खनपटीला बसावं लागतं. ऐकतच नाहीत. म्हणतात या गोळ्या घेऊन पोटातल्या बाळाला काही झालं तर ?” -  सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एका गावातल्या अंगणवाडीताई सांगत होत्या. हार्वर्ड आणि युनिसेफ यांच्यासोबत लोकमत समूहाने केलेल्या पोषण परिक्रमा या प्रशिक्षण उपक्रमात सहभागी पत्रकार म्हणून गावागावात फिरताना माता-बाल  आरोग्याच्या संदर्भातलं  वास्तव दिसलं, ते असं अस्वस्थ करणारं होतं. अनेक गावात  उत्साहाने काम करणाऱ्या अंगणवाडीताई आणि आशा सेविका अडचणींचे डोंगर ओलांडून गरोदर, स्तनदा स्त्रिया, नवजात शिशू आणि अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या पोषणाची  जबाबदारी पेलण्यासाठी झटत आहेत, आणि तरीही एकूण चित्र अपेक्षित  वेगाने बदलताना दिसत नाही. भंडारा दुर्घटनेची पहिली बातमी हाती आली, तेव्हा मनात पहिला प्रश्न हाच आला, तिथल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवलेली जवळपास सगळी नवजात बालकं कमी वजनाची जन्मली म्हणून त्या पेटीत गेली होती. त्यांचं नशीब, की त्यांच्या वाट्याला निदान ते इन्क्युबेटर तरी आले आणि दुर्दैव हे की, त्या जीवनदात्या पेटीतच होरपळून, गुदरमरून मरण्याची वेळ त्यांच्यावर आली. भंडाऱ्याच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बालकांचा जीव घेणारी आग कशामुळे लागली, ही माहिती सरकारी शोध मोहिमूेतन (कदाचित) समोर येईलच, पण भंडाऱ्यासारख्या ठिकाणी एकाचवेळी तब्बल सतरा बालकांना वजन कमी असल्यामुळे इनक्यूबेटरमध्ये ठेवायला लागणं याचं मूळ गरोदर महिलांचं कुपोषण अन् त्यातून जन्माला येणारी कुपोषित बालकं हेच आहे. २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी तब्बल तेरा राज्यात निम्म्याहून अधिक स्त्रिया आणि मुलं ऍनिमिक आहेत, असं  ताजी आकडेवारी सांगते. गरोदर स्त्रियांना पोषण आहार, लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्यांच्या पुरवठ्याची व्यवस्था होऊनही गरोदर स्त्रियांमधल्या अशक्तपणाचं, कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं दिसतं.राष्ट्रीय पातळीवर आसाम, बिहार, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं.  सधन महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचल्याचं चित्र सर्वत्र दाखवलं जातं. माता आणि अर्भक मृत्यू टाळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असल्याचा गवगवा सतत सुरू असतो, पण  भंडारा रुग्णालयातील घटनेने कुपोषणमुक्तीच्या नाऱ्यामधली हवा काढून घेतलेली आहे. राज्याच्या या पूर्व टोकासह विदर्भ आणि मेळघाटातही कुपोषणाची परिस्थिती गंभीर आहे. या भागांमध्ये अनेकांमध्ये अनुवांशिकतेने अ‍ॅनेमियाच्या पुढची पायरी म्हणवणारा ‘सिकल सेल’ हा आजार आढळून येतो. या पार्श्वभूमीवर महिला, नवजात बालक आणि पुरूष यांच्याबाबत जनहित याचिका अद्यापही न्यायालयात दाखल आहेत. मातांचं सुरक्षित बाळंतपण होऊन सुदृढ बाळं जन्माला यावीत, या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर केला. जननी सुरक्षाच्या नावाखाली हा प्रस्ताव पुढं आला. जागतिक बँकेने याला अर्थसहाय्य दिल्यानंतर अंगणवाडी आणि आशा सेविकांची व्यवस्था उभी राहून  महिलांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्याने सुरू झाली. गर्भावस्थेत आवश्यक असणारा आहार, औषधोपचार, लस घेण्याबाबतची माहिती ग्रामीण महिलांकडे पुरेशा प्रमाणात नसते. आरोग्य यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचते का? दारी येऊन फुकट सल्ला देणाऱ्यांचा वीट येऊन शासकीय औषधोपचार टाळण्याची प्रवृत्ती वाढतेय का? आशा आणि अंगणवाडी सेविकांचं काम केवळ कागदावरच सुपरफास्ट दिसतंय का? - याबाबतही सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे. महिलांमध्ये अ‍ॅनिमिया जास्त असल्याचं  एक कारण म्हणजे लैंगिक भेदभाव! हे चित्र प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसतं. महिला सकस आहारापासून वंचित राहतात. मुलींची कमी वयातील लग्नं आणि ओघाने येणारी बाळंतपण हेही एक प्रमुख कारण! आदिवासी समाजात  महिलांच्या आरोग्यासंबंधी पुरेशी जाण नाही. त्यांच्या पोटी जन्मणारी अपत्यं परिणामी इन्क्युबेटरमध्येच पोहोचतात. तान्ह्या मुलांसाठीचे इन्क्युबेटर  पुरेसे हवेत, सुरक्षितही हवेत, पण आदिवासी आईच्या पोटी जन्माला आलेलं बाळ त्या इन्क्युबेटरमध्ये ठेवावंच  लागू नये, याचीही व्यवस्था हवीच !

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर