शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 03:31 IST

सामाजिक सुधारणांचा विषय आला की बहुसंख्य समाजाबाबत समाजाला आवडणारी भूमिका घ्यायची आणि अल्पसंख्य वर्गांबाबत समाजमनाविरुद्ध जाणारा पवित्रा घ्यायचा हा भाजपचा आजवरचा प्रवास आहे.

हाजी अली दर्ग्याच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात भाजपने आंदोलकांची भूमिका घेतली तर उलट शनी शिंगणापूरच्या मंदिरात देवाची पूजा करण्याचा महिलांना नसलेला अधिकार नसावाच असा पवित्रा घेतला.तिहेरी तलाक प्रथेला आळा घालण्यासाठी त्याविषयीचे जे विधेयक सरकारने संसदेत मांडले ते सरळ सरळ मान्य होण्याची शक्यता बरीच अवघड आहे. मुळात या विधेयकाला काँग्रेस, जनता दल (नितीश), ममता बॅनर्जी आणि दक्षिणेतील अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शशी थरुर यांनी हा विरोध संसदेत तत्काळ जाहीरही केला आहे. मुळात हे विधेयक मुस्लीम समाजातील स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना वैवाहिक संरक्षण मिळावे यासाठीच तयार केले गेले असल्याचा भाजपचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र ते देशातील मुसलमान वर्गाला डिवचण्यासाठी पुढे करण्यात आले असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

सामाजिक सुधारणांचा विषय आला की बहुसंख्य समाजाबाबत समाजाला आवडणारी भूमिका घ्यायची आणि अल्पसंख्य वर्गांबाबत समाजमनाविरुद्ध जाणारा पवित्रा घ्यायचा हा भाजपचा आजवरचा प्रवास आहे. समाजातील मोठा वर्ग सुधारणेला अनुकूल करून घेतल्याखेरीज त्यावर नवे प्रवाह लादले जाऊ नयेत, अशी भूमिका महात्मा गांधींपासून नंतरच्या सर्व नेत्यांनी घेतली. पं. जवाहरलाल नेहरूंचा याच प्रश्नावर तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याशी झालेला वाद व त्यासाठी नेहरूंनी केलेली राजीनाम्याची तयारी सर्वज्ञात आहे.
भाजपची भूमिका सरळ सरळ मुस्लीमविरोधी व त्या वर्गाला चिथावणी देणारी आहे. हाजी अली दर्ग्याच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात भाजपने आंदोलकांची भूमिका घेतली तर शनी शिंगणापूरच्या मंदिरात देवाची पूजा करण्याचा महिलांना नसलेला अधिकार नसावाच असा पवित्रा त्याने घेतला. हाच प्रकार भाजपने शबरीमाला मंदिराबाबतही घेतला. या मंदिरात सर्व वयाच्या स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठी केरळातील महिलांनी मोठे आंदोलन केले. याउलट हा प्रवेश दिला जाऊ नये म्हणून त्या राज्यातील कर्मठ वर्गांनी प्रतिआंदोलन केले. प्रवेशाच्या बाजूने केरळचे सरकार उभे राहिले. सर्वोच्च न्यायालयानेही हा प्रवेश दिला जावा व प्रवेश करणाऱ्या महिलांना संरक्षण दिले जावे, असा निर्णय घेतला. पुढे जाऊन त्या मंदिराच्या व्यवस्थापकांनीही आम्ही असे संरक्षण देऊ व महिलांना प्रवेश देऊ, अशी आपली भूमिका जाहीर केली. याउलट भाजपने विरोधी पवित्रा घेऊन आम्ही या महिलांना प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले. दुर्दैवाची बाब ही की हा विरोध प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांच्या केरळमधील निवडणूक प्रचार सभेत जाहीर केला.
सुधारणा इतरांमध्ये करायच्या असतील तर त्यांना पाठिंबा द्यायचा आणि त्या आपल्यात घडवायच्या असतील तर मात्र त्याला विरोध करायचा हा दुटप्पी राजकारणाचा प्रकार तर आहेच शिवाय तो समाजात बहुसंख्य व अल्पसंख्य यांच्यात दुही माजविण्याचा खेळही आहे. हिंदू व मुसलमान यांच्यात ऐक्य निर्माण व्हावे म्हणून एका महात्म्याने आपले प्राण गमावले आहेत. भाजपला त्याचे दु:ख नाही. उलट त्या पक्षाला ही दुही वाढविण्यात व तिचा राजकीय फायदा घेण्यात अधिक रस आहे. सरकारने मांडलेल्या या विधेयकाला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळेल ही शक्यता मोठी आहे. कारण लोकसभेत भाजपला व त्याच्या राष्ट्रीय आघाडीला बहुमत आहे. मात्र ते राज्यसभेत मंजूर होईलच याची शक्यता कमी आहे. त्या सभागृहात भाजपला बहुमत नाही आणि नितीशकुमारांसारखे त्यांचे मित्रपक्ष या विषयावर भाजपसोबत नाहीत. त्यामुळे या विधेयकाचे भवितव्य आज तरी अधांतरी आहे.
समाजात सुधारणा होणे गरजेचे आहे व त्यामुळे समाज आधुनिक व प्रगत होतो हेही साऱ्यांना समजणारे आहे. मात्र या सुधारणा समाजाला विश्वासात घेऊन व त्यातील बहुसंख्य लोकांना अनुकूल करून घेऊनच अमलात आणणे शहाणपणाचे आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांची उत्क्रांतीवादाची भूमिका यासंदर्भात समंजसपणे विचारात घेण्याजोगी आहे. समाजात असलेल्या असंतोषात भर घालणे व देशात दुही माजविणे याचे दुष्परिणाम हिंसाचारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सबब यासंदर्भात सरकारने अधिक विधायक व समाजाभिमुख भूमिका घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीमSabarimala Templeशबरीमला मंदिरHinduहिंदूJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू