शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांच्यावर सारेच का नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:42 IST

जगभरातील आणि भारताच्या विविध भागांतून जिथे शिकायला जावे, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते,

- संजीव साबडेजगभरातील आणि भारताच्या विविध भागांतून जिथे शिकायला जावे, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते, अशा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी जगदीश कुमार यांची नेमणूक झाली, त्याला आता पाच वर्षे पूर्ण होत आली. पण ते कुलगुरू झाले, तेव्हापासूनच त्यांच्याविषयी सतत नाराजी व्यक्त होत आली आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे काही जणांची नाराजी आहे. पण कुलगुरू कोणत्या विचारांचा असावा, हे ठरवता येत नाही. त्यामुळे तो मुद्दा गैरलागू ठरतो.जगदीेश कुमार हे अत्यंत विद्वान आहेत, पण विद्वत्ता आणि प्रशासक म्हणून करावयाचे काम यांमध्ये खूपच फरक असतो. प्रशासक म्हणून वेगळ्या पद्धतीने काम करायचे असते. जिथे हजारो विद्यार्थी शिकतात, शेकडो शिक्षक अध्यापनाचे काम करतात, अशा शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणे सोपे नसते. तिथे मीच दाखवेन, ती दिशा ही भूमिका चालत नाही. जगदीश कुमार यांच्याविषयी सतत वाद झाले, त्यामागील कारण हेच आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गटाला जवळ केले आणि त्यांच्या मदतीने अन्य विद्यार्थ्यांची बदनामी सुरू केली.

जगदीश कुमार यांचा एककल्ली कारभार, अकार्यक्षमता, सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न न करणे, प्राध्यापकांना विचारात न घेताच दडपून कारभार हाकण्याचे प्रयत्न यामुळे त्यांच्याविषयीचा राग वाढतच गेला. जेएनयूच्या आवारात गेल्याच आठवड्यात घुसून गुंडांनी घातलेला हैदोस आणि त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याने जगदीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. त्यातच ज्यांना मारहाण झाली, त्यांच्याविरोधातच तक्रारी आणि गुन्हे नोंदवले जात असल्याने जगदीश कुमार यांच्याविषयीचा संताप फारच वाढला आहे.त्याचमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनीही जगदीश कुमार यांना दूर करा, अशी मागणी केली आहे. जगदीश कुमार कारभार हाकण्यात अयशस्वी ठरले, हेच त्याचे कारण आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजपचे आणखी एक नेते राम नाईक यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. विद्यार्थी व विद्यापीठाच्या हितासाठी जगदीश कुमार यांना कुलगुरूपदावरून दूर करायला हवे, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकरही म्हणाले आहेत. कुलगुरूंच्या राजकीय विचारसरणीमुळे ही मागणी करीत नसल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. कुलगुरू झाल्यानंतर त्यांनी कारगिल युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून विद्यापीठाच्या आवारात लष्करी रणगाडे आणण्याचा घाट घातला. हे रणगाडे पाहून विद्यार्थ्यांत देशप्रेमाची भावना निर्माण होईल, असा त्यांचा अजब तर्क होता.जगदीश कुमार यांच्याच काळात जेएनयूमधील विद्यार्थी देशद्रोही व पाकिस्तानधार्जिणे असल्याचे आरोप झाले. त्यात भाजप नेते व अभाविप यांचाही हात होता. त्या वेळी जगदीश कुमार या मंडळींचे हीरो होते. या विद्यार्थ्यांची संभावना ‘तुकडे तुकडे गँग’ अशी करण्यात आली. विद्यापीठालाच देशद्रोह्यांचा अड्डा ठरविण्याचे जोरदार प्रयत्न केले गेले. त्याचवेळी नजीब अहमद हा विद्यार्थी गायब झाला. विद्यापीठात विशिष्ट गटालाच हाताशी धरण्याचे प्रयत्न कुलगुरूंनी केल्याचा हा परिणाम असल्याचे आरोप झाले.
गेल्या महिन्यापासून जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन फीवाढीच्या विरोधात होते. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क, वाचनालय शुल्क, वसतिगृह भाडे या साऱ्यांमध्ये वाढ केली. तसे करताना ते परवडेल की नाही, याचाही विचार विद्यापीठ व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केला नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्कातही प्रचंड वाढ करताना महागाईचे कारण पुढे केले गेले. शिक्षणावर सरकारने खर्च करण्याऐवजी प्रचंड फीवाढ करण्याचा प्रयत्न सरकारच्या अंगाशी आला. मग फीवाढ काहीशी कमी करण्यात आली. पण विद्यार्थ्यांना ती मान्य नव्हती आणि जगदीश कुमार मात्र अडून राहिले. त्यांनी नोंदणी सुरू केली. त्यामुळे विद्यार्थी संतापले.त्याचवेळी गुंड विद्यापीठात घुसले. विद्यार्थी संघाच्या अध्यक्षासह ३४ जण जखमी झाले. गुंड घुसल्यानंतर कुलगुरूंनी लगेच पोलिसांना पाचारण केले नाही, हाही आरोप आहे. जखमी विद्यार्थ्यांना भेटायलाही ते गेले नाहीत. कुलगुरूंकडून कोणत्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत, असे आता विद्यार्थ्यांबरोबर सरकार व भाजपमधील अनेक नेत्यांनाही वाटू लागले आहे. डाव्यांपुढे झुकायचे नाही, म्हणून जगदीश कुमार यांना कदाचित आता हटवण्यात येणार नाही. पण विद्यार्थ्यांचा सर्वाधिक राग असलेला कुलगुरू अशीच त्यांची नोंद झाल्यात जमा आहे.(समूह वृत्त समन्वयक)

टॅग्स :jnu attackजेएनयू