शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उत्तर प्रदेशात विजय कोणाचा, योगींचा की मोदींचा? भाजपाच्या विजयाची रणनिती समजून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:35 IST

मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला!

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता चार राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले. विशेषत: उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मिळालेले यश अभूतपूर्व असे आहे. ऐंशीच्या दशकानंतर या राज्यात कोणत्याच पक्षाला अशी संधी मिळालेली नाही. योगी सरकार त्यास अपवाद ठरले. यूपीत काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण या राज्यातून लोकसभेत ८० खासदार निवडून येतात. हा आकडा मोठा आहे. यूपी जिंकली की लोकसभेची अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते.  महाराष्ट्र (४८), प. बंगाल (४१), बिहार  (४०), तमिळनाडू (३९), मध्यप्रदेश (२९), कर्नाटक (२८), गुजरात (२६), आंध्रप्रदेश (२५), राजस्थान (२५) या नऊ मोठ्या राज्यांपैकी प. बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र सोडले तरी उर्वरित सहा राज्यातून तब्बल १९६ खासदार निवडून येतात. यूपीचे ८० मिळून २७६ खासदार होतात. लोकसभेत बहुमतासाठी २७१ जागा लागतात ! भाजपचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर हे आकडे महत्वाचे ठरतात. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने याच राज्यांनी भाजपला सत्ता मिळवून दिली. 

यूपी का महत्वाचे, याचे उत्तर वरील आकडेवारीत आहे. त्यामुळे काही करुन हे राज्य जिंकणे भाजपसाठी आणि अर्थातच  मोदींसाठी अनिवार्यच होते. म्हणूनच, मोदीजींनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. या दोन वर्षात पंतप्रधानांचे सर्वाधिक दौरे याच राज्यात झाले. इतके की, मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला! भाजपच्या प्रचारात सुरुवातीपासूनच 'राम' होताच. मनोज तिवारी यांनी गायलेले राम मंदिरावरील गीत तर इतके लोकप्रिय ठरले की ते लग्न समारंभात वाजू लागले ! अनेक लोकगायकांनी याच धर्तीवर भाजपचा प्रचार केला. मुख्यमंत्री योगींच्या भाषणात 'सुशासन आणि राशन हे दोन मुद्दे असले तरी त्यांचाही भर 'ये धर्मयुद्ध है', 'कुरुक्षेत्र है' 'कौरव और पांडवों की लढाई है' हे सांगण्यावर होता. मतांच्या धुव्रीकरणासाठी एवढे पुरेसे होते! खरंतर शेतकरी आंदोलन, हाथरस, लखीमपूर खेरी, उन्नावच्या घटना, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि कोरोनाकाळात गंगेत वाहणारी प्रेतं हे मुद्दे योगी सरकारच्या विरोधात जाणारे होते. शिवाय, जाट विरुद्ध ठाकूर यांच्यातील सुप्त संघर्ष, राजा मिहीरभोज पुतळा प्रकरणामुळे गुर्जर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासून 'मोदी तुमसे बैर नही, मगर योगी तुम्हारी खैर नही!' अशी घोषणा सर्वत्र घुमत होती. लोक योगींवर नाराज आहेत, पण मोदीजींवर खुश आहेत  ही बाब भाजपच्या चाणक्यांनी वेळीच हेरली आणि विरोधात जाणाऱ्या सर्व विषयांवर 'बुलडोझर' फिरवला. योगी आणि मोदी 'डबल इंजिन सरकार' असा प्रचार केला. योगीविरोधी जनमताचे मतपरिवर्तन घडविण्यात मोदीजी यशस्वी झाले. भाजपच्या या विजयात मोदीजींचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही मान्य करेल. 

सपाचे अखिलेश यादव यांनी चांगली लढत दिली. पण उमेदवार देण्यात त्यांची चूक झालेली दिसते. खरं म्हणजे, यावेळी मायावती निष्क्रिय होत्या. अखिलेश यांना बसपाची वोट बँक खेचता आली असती. पण तिथेही ते कमी पडलेले दिसतात. बसपाचा एकमेव उमेदवार निवडून आला असला तरी या पक्षाला १२ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्ष या रेसमध्येच नव्हता. प्रियांका गांधी यांच्या रोड शोला गर्दी जमायची पण ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचली नाही. एकट्या प्रियांकांच्या भरोशावर पक्ष कसा जिंकेल?

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२