शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात विजय कोणाचा, योगींचा की मोदींचा? भाजपाच्या विजयाची रणनिती समजून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:35 IST

मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला!

- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता चार राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले. विशेषत: उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मिळालेले यश अभूतपूर्व असे आहे. ऐंशीच्या दशकानंतर या राज्यात कोणत्याच पक्षाला अशी संधी मिळालेली नाही. योगी सरकार त्यास अपवाद ठरले. यूपीत काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण या राज्यातून लोकसभेत ८० खासदार निवडून येतात. हा आकडा मोठा आहे. यूपी जिंकली की लोकसभेची अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते.  महाराष्ट्र (४८), प. बंगाल (४१), बिहार  (४०), तमिळनाडू (३९), मध्यप्रदेश (२९), कर्नाटक (२८), गुजरात (२६), आंध्रप्रदेश (२५), राजस्थान (२५) या नऊ मोठ्या राज्यांपैकी प. बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र सोडले तरी उर्वरित सहा राज्यातून तब्बल १९६ खासदार निवडून येतात. यूपीचे ८० मिळून २७६ खासदार होतात. लोकसभेत बहुमतासाठी २७१ जागा लागतात ! भाजपचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर हे आकडे महत्वाचे ठरतात. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने याच राज्यांनी भाजपला सत्ता मिळवून दिली. 

यूपी का महत्वाचे, याचे उत्तर वरील आकडेवारीत आहे. त्यामुळे काही करुन हे राज्य जिंकणे भाजपसाठी आणि अर्थातच  मोदींसाठी अनिवार्यच होते. म्हणूनच, मोदीजींनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. या दोन वर्षात पंतप्रधानांचे सर्वाधिक दौरे याच राज्यात झाले. इतके की, मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला! भाजपच्या प्रचारात सुरुवातीपासूनच 'राम' होताच. मनोज तिवारी यांनी गायलेले राम मंदिरावरील गीत तर इतके लोकप्रिय ठरले की ते लग्न समारंभात वाजू लागले ! अनेक लोकगायकांनी याच धर्तीवर भाजपचा प्रचार केला. मुख्यमंत्री योगींच्या भाषणात 'सुशासन आणि राशन हे दोन मुद्दे असले तरी त्यांचाही भर 'ये धर्मयुद्ध है', 'कुरुक्षेत्र है' 'कौरव और पांडवों की लढाई है' हे सांगण्यावर होता. मतांच्या धुव्रीकरणासाठी एवढे पुरेसे होते! खरंतर शेतकरी आंदोलन, हाथरस, लखीमपूर खेरी, उन्नावच्या घटना, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि कोरोनाकाळात गंगेत वाहणारी प्रेतं हे मुद्दे योगी सरकारच्या विरोधात जाणारे होते. शिवाय, जाट विरुद्ध ठाकूर यांच्यातील सुप्त संघर्ष, राजा मिहीरभोज पुतळा प्रकरणामुळे गुर्जर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासून 'मोदी तुमसे बैर नही, मगर योगी तुम्हारी खैर नही!' अशी घोषणा सर्वत्र घुमत होती. लोक योगींवर नाराज आहेत, पण मोदीजींवर खुश आहेत  ही बाब भाजपच्या चाणक्यांनी वेळीच हेरली आणि विरोधात जाणाऱ्या सर्व विषयांवर 'बुलडोझर' फिरवला. योगी आणि मोदी 'डबल इंजिन सरकार' असा प्रचार केला. योगीविरोधी जनमताचे मतपरिवर्तन घडविण्यात मोदीजी यशस्वी झाले. भाजपच्या या विजयात मोदीजींचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही मान्य करेल. 

सपाचे अखिलेश यादव यांनी चांगली लढत दिली. पण उमेदवार देण्यात त्यांची चूक झालेली दिसते. खरं म्हणजे, यावेळी मायावती निष्क्रिय होत्या. अखिलेश यांना बसपाची वोट बँक खेचता आली असती. पण तिथेही ते कमी पडलेले दिसतात. बसपाचा एकमेव उमेदवार निवडून आला असला तरी या पक्षाला १२ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्ष या रेसमध्येच नव्हता. प्रियांका गांधी यांच्या रोड शोला गर्दी जमायची पण ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचली नाही. एकट्या प्रियांकांच्या भरोशावर पक्ष कसा जिंकेल?

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२