शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

कुणाची संक्रांत कुणावर ?

By सचिन जवळकोटे | Updated: January 11, 2018 03:00 IST

संक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?

स्थळ पहिलं : कणकवलीसंक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?’ थोरलेही दचकले. दोघांनी पिताश्रींना विचारलं. या दोन गुणी लेकरांच्या अनोख्या प्रश्नावर भरपूर डोकं खाजवूनही नारायणरावांना काही उत्तर सापडलं नाही.‘माका पण कळला नाय बाळांनोऽऽ मी पण आयुष्यात कधी गोड बोलाक नाय,’ असं म्हणत त्यांनी देवेंद्रपंतांनाच मेसेज टाकला, ‘याचा अर्थ काय?’ पंतांकडून तत्काळ रिप्लाय आला, ‘गूळ खोबरं घ्याऽऽ नुसतंच गोड-गोड बोला,’ हा मेसेज वाचताना मात्र तिघांच्याही डोक्यात प्रकाश पडला. आपल्याला नुसतं गूळ खोबरं देऊन ठेवलेल्या पंतांच्या गोडऽऽ गोड बोलण्याचा अर्थही त्यांना समजला.स्थळ दुसरं : मातोश्रीउद्धोंच्या मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं मिलिंदकडं बघितलं; कारण या मोबाईलवर कुणाचा कॉल घ्यायचा अन् कुणाचा कट करायचा, याचं नियोजन म्हणे मिलिंदच करायचे. कॉल चक्क ‘कृष्णकुंज’वरून आलेला पाहून मोबाईल उचलला गेला. तिकडून खर्ज्या आवाजात एक डॉयलॉग आदळला, ‘नमस्कार. मी राज. तीळ द्याऽऽ गूळही द्याऽऽ गोडही तुम्हीच बोला!’ फोन कट झाला. या संदेशात फक्त घेण्याचीच भाषा होती. देण्याचा कुठं उल्लेखच नव्हता. तेव्हा चिडून उद्धोंनी युवराजांना विचारलं, ‘देण्या-घेण्यात माहीर असणाºया तुमच्या काकांना आज-काल फक्त घ्यायचंच माहितंय वाटतं; परंतु आपण तरी कधी कुणाला काय देतोय?’ त्यावर अल्लडपणे युवराज उत्तरले, ‘हो. देतो कीऽऽ आपल्याच सरकारला तळतळाट अन् शिव्याशाप!’स्थळ तिसरं : वर्षा बंगलादेवेंद्रपंतांना तीळगूळ देण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील सहकारी उत्साहानं (अन् नाईलाजानंही) जमले. तीळगुळाची पुडी बांधण्यासाठी रद्दीच्या भावात गेलेल्या मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका विनोदभाऊंनी वापरली. ‘पुढच्या वर्षी बदलणाºया सरकारमध्ये आम्ही दोघं असणार की नाही?’ असा सवाल महादूदादा अन् सदाभाऊंनी केला, मात्र मोबाईल पाहण्यात गुंतलेल्या गिरीशरावांनी लक्ष दिलं नाही. बहुधा रात्रीची क्लिप पाहण्यात ते व्यस्त असावेत. चंद्रकांतदादांनी खुणावताच त्यांच्या लाडक्या यल्लप्पानं तातडीनं पोतं भरून तीळ-गूळ आणलं. हे भरगच्च पोतं म्हणजे ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’चीच कृपा. (म्हणजे चांगल्या रस्त्यावरून आलेल्या गाडीतलं पोतं टिकलं हो. उगाच नसता गैरसमज नसावा.) असो.इकडं सुभाषबापू सांगू लागले, ‘मी लोकांचं मंगल करणारा मंत्री. त्यामुळं पालिकेत बाहेरच्यांना गूळ देईन, मात्र घरच्या मालकांना तीळही देणार नाही,’ हे ऐकून सोलापुरातील ‘विजयकुमार अन् दिलीपराव’ अनेकांना आठवले. या सर्व धांदलीत कुणाच्या तरी लक्षात आलं की इथं पंकजाताईच आल्या नाहीत. गर्दीतल्या एकानं त्यांना कॉल केला, ‘ताई.. तीळ-गूळ द्यायला कधी येणार?’ तेव्हा तिकडून दचकून विचारणा झाली, ‘कुठला गूळ.. चिक्कीतला का?’ मात्र, नेटवर्क खराब झाल्यानं पुढचा आवाज ऐकू आला नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे