शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो, मोनोमुळे मुंबई कोणाची राहील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:03 IST

मेट्रो, मोनो स्थानकांजवळ उत्तुंग इमारतींना परवानगी देण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. 

- विनायक पात्रुडकरमेट्रो, मोनो स्थानकांजवळ उत्तुंग इमारतींना परवानगी देण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. घर आणि कार्यालयाजवळ सार्वजनिक वाहतूक या उपक्रमांतर्गत हा विचार सुरू आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या, वाहने यांचे नियोजन करण्यासाठी असा विचार होणे आवश्यकच आहे. हा विचार प्रत्यक्षात अंमलात आणताना अडचणींचा डोंगर समोर असून, आधी त्याचा आढावा प्रशासनाने घ्यायला हवा. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या सर्वोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे मेट्रो, मोनो स्थानकाजवळ उत्तुंग इमारती उभ्या राहिल्यानंतर हा प्रश्न सुटेल, याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही. मुळात मुंबईत घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्या भविष्यातही वाढतच राहणार आहेत. एखादे नवीन रेल्वे स्थानक होणार असेल, तर त्या विभागातील घरांच्या, जमिनींच्या किमती चौपटीने वाढतात. असे असेल तर मोनो, मेट्रो स्थानकाजवळील घरांच्या किमती नक्कीच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतील. कार्यालयांच्या किमतीही गगनाला भिडतील, हे स्वतंत्र सांगायला नको. त्यातूनही मेट्रो, मोनोजवळ कोणती कार्यालये असतील, तेथील अधिकारी, कर्मचारी व कामगारांची गुणवत्ता काय असेल. त्यांच्यापैकी किती जण मेट्रो, मोनोचा वापर करतील, याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. अन्यथा या योजनेची अवस्थादेखील मोनोप्रमाणे होईल. म्हणजे योजना अंमलात येऊन उत्तुंग इमारती उभ्या राहतील; पण तेथील घरे व कार्यालये रिकामी राहतील. मुळात आता मोनोची जी स्थानके आहेत, तेथे जवळपास औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे तेथे निवासी इमारती उभारून काहीच उपयोग होणार नाही. येथे औद्योगिक क्षेत्र उभारणेही शक्य नाही़ मोनोचे कारशेड असलेल्या भक्ती पार्क परिसरात सध्या कोट्यवधी रुपयांचे खासगी बिल्डरांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यालाही हवे तसे गि-हाईक नाही. या ठिकाणी आता मेट्रोचेही कारशेड होणार आहे. त्यामुळे येथील घरांची मागणी वाढेल. आताच ही घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. भविष्यात तर नक्कीच येथे सर्वसामान्य राहणार नाहीत. मेट्रोच्या दुस-या स्थानकांचा विचार केला, तर तेथे झोपडपट्टी अधिक आहे. मेट्रो मार्गाला लागूनच इमारतीदेखील आहेत. तेथे नव्याने प्रकल्प उभारणे तूर्त तरी शक्य नाही. अगदी ओढूनताणून प्रकल्प उभारायचे ठरविले, तरी त्याला कितपत यश मिळेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. तेव्हा प्रशासनाने पूर्णपणे विचार करूनच मेट्रो, मोनो स्थानकांजवळील इमारतींचा विचार करायला हवा. याआधीही घर, कार्यालय तेथे सार्वजनिक वाहतूक, असा विचार झाला होता. रेल्वे स्थानकेच चार मजली उभारायची, म्हणजे रेल्वेतून उतरल्यानंतर थेट कार्यालय, अशी योजना होती. प्रत्यक्षात ही योजना राबविताना अनेक अडचणी आल्या. परिणामी, ही योजना बारगळली. मुंबईसाठी नियोजन व्हायलाच हवे. येथे सर्वसामान्य कसा राहू शकेल, याचाही विचार व्हायलाच हवा. तरच कोणतीही योजना सफल होऊ शकेल.

 

टॅग्स :Metroमेट्रो