शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

जिल्हा सहकारी बँकांच्या नोकरभरतीवर अंकुश कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 02:59 IST

खरे तर आर्थिक घोटाळे हे केवळ नागरी सहकारी बँकांमध्येच सुरू आहेत अशी अवस्था नाही. या सर्व बँकांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा सहकारी बँकांतही असे अनेक गैरप्रकार आहेत.

सुधीर लंके  देशातील सर्व नागरी सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी केंद्र सरकार या अधिवेशनात विधेयक आणणार आहे. या निर्णयाने नागरी बँकांवर अधिक निर्बंध येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. नागरी बँकांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे सुरू आहेत. ते टाळण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल असे केंद्र सरकारचे मत आहे. खरे तर आर्थिक घोटाळे हे केवळ नागरी सहकारीबँकांमध्येच सुरू आहेत अशी अवस्था नाही. या सर्व बँकांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा सहकारी बँकांतही असे अनेक गैरप्रकार आहेत. जिल्हा सहकारी बँकांवर सध्या ‘आरबीआय’, ‘नाबार्ड’ व राज्य सरकार अशा तिघांचे नियंत्रण आहे. मात्र, तरीही या संस्थांमध्ये गडबडीआहेत. राज्य सहकारी बँकेचा घोटाळा राज्यात गाजला. तोच कित्ता अनेक सहकारी बँकांनीही गिरविला आहे. नाशिक जिल्हा सहकारी बँकेवरही मध्यंतरी प्रशासक नेमण्याची नामुष्की ओढावली होती. जिल्हा सहकारी बँकांची नोकरभरती हा असाच चिंतेचा विषय आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नगर जिल्हा सहकारी बँकेने २०१७ साली आपली ४६४ पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबवली. जी प्रचंड वादग्रस्त व संशयास्पद ठरली. भरतीबाबत तक्रारी झाल्यानंतर सहकार विभागाने चौकशी करून प्रारंभी ही भरती रद्द केली. पुढे सहकार विभागानेच फेरचौकशी केली व भरतीला ‘क्लीन चिट’ दिली. हे नगरलाच घडले असे नाही. सातारा व सांगली येथील जिल्हा बँकांच्या भरतीवरही आरोप झाले. तेथेही पुढे भरतीला ‘क्लीन चिट’ दिली गेली. जनतेने तक्रारी करायच्या व सहकार विभागाने बँकांची पाठराखण करत भरतीला ‘क्लीन चिट’ द्यायची अशी प्रथाच सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे हे वारंवार घडत असताना ‘नाबार्ड’, ‘आरबीआय’, तसेच राज्य शासन डोळ्यावर पट्टी ओढून शांत आहेत. जिल्हा सहकारी बँकांनी कोणत्या खासगी एजन्सीमार्फत भरतीप्रक्रिया राबवावी यासाठी ‘नाबार्ड’ एक यादी सुचविते. त्यातून एखाद्या संस्थेची निवड करून बँका भरतीप्रक्रिया राबवितात. नाबार्ड ही यादी कशाच्या आधारे तयार करते, हाही प्रश्नच आहे. नगर जिल्हा बँकेने ‘नायबर’ या संस्थेमार्फत ही प्रक्रिया राबवली. ‘नायबर’ संस्थेने या कामाचा ठेका घेतला व पुढे परस्पर अन्य संस्थांकडे भरतीचे काही कामकाज सोपविले. बँकेचे पदाधिकारी मुलाखतींच्या पॅनलवर व समोर मुलाखत देण्यासाठी उमेदवार म्हणून त्यांचीच मुले. परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना ना सीसीटीव्ही चित्रीकरण ना उमेदवारांसमोर उत्तरपत्रिका सीलबंद केल्या गेल्या. असे अनेक प्रकार नगरला घडले. असे असतानाही भरतीला ‘क्लीन चिट’ मिळाली. ‘मध्य प्रदेश स्टेट को-आॅपरेटिव्ह बँक विरुद्ध नानुराम यादव’ या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने भरतीबाबत काही नियम निर्देशित केले आहेत. त्यात एक नियम असे सांगतो की, भरतीत एक जरी गैरप्रकार आढळला तरी संपूर्ण भरती रद्द करण्यात यावी. कारण या गैरप्रकाराचा फायदा कुणी घेतला हे नेमके शोधणे अवघड असते. हा निकष लावला तर नगरची भरती पूर्णत: अनियमित ठरू शकते. कारण येथे चार उमेदवार सहकार विभागानेच भरतीतून बाद केले आहेत. सहकार खात्याचे अधिकारी पगार सरकारचा घेतात व गुलामी जिल्हा बँकांच्या संचालकांची करतात की काय, अशी अवस्था आहे. अर्थात, त्याचे कारणही स्पष्ट आहे. या बँकांचे बहुतांश संचालक हे आमदार असतात. काही ठिकाणी मंत्रीच या बँकांचे नेतृत्व करतात. जो अधिकारी आपल्या मनाप्रमाणे काम करेल त्याला सोयीची पोस्टिंग व जो करणार नाही त्याची गडचिरोलीला बदली, असे धोरण घेतले जाते. नगरच्या बँकेची भरती ज्या अधिकाऱ्याने रद्द केली होती त्याची गडचिरोलीला बदली झाली होती.
सहकारी बँकांची भरतीप्रक्रिया या बँकांच्या ताब्यात न ठेवता राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र आस्थापना निर्माण करून ही भरतीप्रक्रिया राबविण्याची आवश्यकता आहे. या बँकांवर कार्यकारी संचालक नियुक्त करतानाही स्वत:च्या मर्जीतील अधिकारी बसविले जातात. कार्यकारी संचालक नियुक्त करण्यासाठीही ‘आरबीआय’चे निकष आहेत. मात्र, त्यातही प्रचंड पळवाटा आहेत. वयाच्या सत्तरीपर्यंत या पदावर राहता येईल, अशी सोय ‘आरबीआय’नेच करून ठेवली आहे. या बँका जनतेच्या भागभांडवलातून व निधीवर उभ्या राहतात. मात्र, त्यांना माहिती अधिकाराचा कायदा लागू नाही. सभासद व ठेवीदारांनी माहिती मागितली तरीही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे जिल्हा बँकांतील नोकरभरतीतून मर्जीतील अधिकारी, राजकारण्यांना बाहेर ठेवण्याची आणि प्रक्रिया अधिक पारदर्शी करण्याची गरज आहे.(आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर)