शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कधी घेणार आम्ही धडे ?

By रवी ताले | Published: February 27, 2018 12:37 AM

एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या.

अकोला शहरातील मातानगर झोपडपट्टीत गत गुरुवारी भीषण अग्नितांडव घडले. एका झोपडीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली अन् मग स्फोटांची मालिकाच सुरू झाली. एका मागोमाग एक ११ सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि बघता-बघता तब्बल ५४ झोपड्या स्वाहा झाल्या. सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण मोठ्या संख्येने कुटुंबे उघड्यावर आली, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच!गंभीर बाब म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांमध्ये पाणी भरण्यासाठीचा ‘हायड्रंट’च बंद पडलेला होता. त्यामुळे बंब रिकामे झाल्यावर पुन्हा पाणी भरून आणण्यासाठी खूप धावपळ उडाली आणि अमूल्य वेळ वाया गेला. ही अत्यंत अक्षम्य स्वरूपाची हलगर्जी म्हणावी लागेल; पण हा मजकूर लिहित असताना तरी त्यासाठीची जबाबदारी निश्चित झालेली नव्हती!अलीकडे लहान-मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी होत असते. पुढचे काही दिवस त्यावर चर्चा होते, उपाययोजनांसंदर्भात गप्पा झडतात आणि काही दिवसांतच त्या घटनेचा विसर पडतो!गत काही वर्षांपासून जगभर लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये केंद्रीकरण होऊ लागले आहे. रोजगारासाठी लोक शहरांमध्ये येतात आणि नाईलाजास्तव झोपडपट्ट्यांचा आसरा घेतात. तेथील झोपड्या अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या असतात. साहजिकच आग लागल्यास ती फार झपाट्याने पसरते आणि रस्त्यांच्या अभावामुळे अग्निशमन विभागाचे काम कठीण होऊन बसते.अपघात पूर्णत: टाळणे कधीच शक्य नसते; पण किमान त्यांची वारंवारिता कमी करणे आणि अपघात झालाच, तर हानीचे प्रमाण किमान पातळीवर राखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य असते. त्यासाठी उदाहरणांवरून धडे घेण्याची आणि त्या अनुषंगाने भविष्यासाठी तयारी करण्याची गरज असते. नेमके इथेच आपण कमी पडतो.अकोल्याच्या आगीचेच उदाहरण घ्या! शहरातील एकमेव ‘हायड्रंट’ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या ठिकाणी आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ‘हायड्रंट’ असल्यास अग्निशामक बंब जास्त खेपा करू शकतात. शिवाय एक ‘हायड्रंट’ बंद असला, तरी दुसºया ‘हायड्रंट’चा वापर केला जाऊ शकतो. झोपडपट्ट्यांमध्ये आग लागण्याचे प्रमाण मोठे आहे, हे लक्षात घेऊन झोपडपट्ट्यांनजीक ‘हायड्रंट’ची निर्मिती झाल्यास, आग लवकर आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकते.याशिवाय झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांमध्ये आगीची संभाव्य कारणे, त्यापासून बचाव, स्वयंपाकाच्या सुरक्षित पद्धती इत्यादी मुद्यांच्या अनुषंगाने जनजागृतीपर मोहीम राबविण्याचाही लाभ होऊ शकतो. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्याची गरज आहे. झोपडपट्ट्यांमधील आगीच्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्याची आत्यंतिक निकड आहे. राज्य सरकारकडून तशा पुढाकाराची अपेक्षा करावी का?- रवी टाले(ravi.tale@lokmat.com)

टॅग्स :fireआग