शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

सरकारच्या नाकावरची माशी कधी हलेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 08:26 IST

वांगचुक यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप करणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. लडाखच्या तोंडावर नुस्ते पैसे फेकणे, हे कसले धोरण? ही तर चेष्टा झाली!

योगेंद्र यादवराष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया

सोनम वांगचुक ही काही कुणी सर्वसाधारण व्यक्ती नव्हे. अमीर खानच्या थ्री इडियट्समधील राँचो हे पात्र त्यांच्यावरून बेतले आहे, एवढ्यावर त्यांचा महिमा संपत नाही. नावीन्यपूर्ण उपक्रमकेंद्रित शिक्षणाचे उद्गाते,  नवनवे तंत्रज्ञान शोधून काढणारे अलौकिक अभियंते किंवा आपल्या प्रदेशाच्या आणि लोकांच्या मागण्यांसाठी लढणारे आंदोलक एवढेच त्यांचे कर्तृत्व नाही.  सोनम वांगचुक हे वैकल्पिक विकासाचे द्रष्टे तत्त्ववेत्ते आणि सृजनशील वैज्ञानिक आहेत;  भारतवर्षाची शान आणि लडाखचे गांधी आहेत!

सोनम वांगचुक जे प्रश्न मांडतात, ती काही  त्यांची व्यक्तिगत समस्या नाही. तिथल्या दोन्ही जनसंघटनांचे, लेह आणि कारगिल डेमोक्रॅटिक असोसिएशन या त्यांच्या शिखर संस्थेचे  त्या प्रश्नावर  एकमत आहे. हा साऱ्या लडाखने उचलून धरलेला मुद्दा आहे. तेथील सर्व पक्षांनी त्याचे  समर्थन केलेले आहे. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातसुद्धा  यासंबंधी वचन दिलेले होते. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लेहमधील बौद्ध आणि कारगिलमधील मुसलमान आज  एकजुटीने उभे आहेत. अख्ख्या लडाखने दृढ संकल्प केला आहे - सोनम वांगचुक सोबत नसतील तर केंद्र सरकारबरोबरच्या कोणत्याही वाटाघाटीला ते तयार नाहीत. 

राज्यघटनेतील कलम ३७० हटवण्यात आले त्यावेळी, आता आपण जम्मू-काश्मीरच्या पकडीतून बाहेर पडून स्वतःचे भाग्य स्वतःच घडवू शकू, अशी उमेद लडाखच्या जनतेत जागी झाली होती. याच गैरसमजापोटी खुद्द सोनम वांगचुक यांनीसुद्धा  त्या निर्णयाचे मनःपूर्वक  स्वागत केले, मोदीजींचे  अभिनंदनही केले. परंतु गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारने लडाखी जनतेच्या आकांक्षांवर पाणी फिरवले.  राज्याचा दर्जा देणे दूरच, पाँडिचेरीच्या धर्तीवर या केंद्रशासित प्रदेशाला लोकनियुक्त विधानसभा देण्यालाही त्यांनी नकार दिला. श्रीनगरच्या बेफिकीर राजवटीतून मुक्त होऊन लडाख आता दिल्ली दरबाराच्या वसाहतवादी तावडीत सापडले आहे. लडाखची जनता लोकशाही मागते, दिल्लीहून त्यांच्या तोंडावर पैसे फेकले जातात.  इथले तरुण रोजगार मागतात, सरकार त्यांच्या कानाशी योजनांची टेप वाजवते.

इतर मागण्या एकवेळ बाजूला ठेवल्या तरी  भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात लडाखचा समावेश करायला कोणती हरकत  असू शकते? राज्यघटनेतील या तरतुदीनुसार केंद्र सरकार देशातील कोणत्याही आदिवासीबहुल प्रदेशात एक स्वायत्त परिषद स्थापन करू शकते. ही परिषद  सर्व स्थानिक निर्णय घेऊ शकते. या परिषदेतील लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्थानिक रीतीरिवाज, परंपरा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती  यांचे नियमन करू शकतात. आसामात बोडोलँड आणि कार्बी आंगलाँगसारख्या प्रदेशांत ही तरतूद लागू आहे. लडाखमध्येही ती लागू केल्यास वेगवेगळ्या आदिवासी समूहांना वेगवेगळ्या स्वायत्त परिषदा लाभतील. त्यामुळे त्यांच्यात आपापसात तणाव निर्माण होण्याच्या शक्यताही कमी होतील आणि स्थानिक साधनसंपत्ती बाहेरच्या लोकांनी लुबाडण्याचा धोकाही टळेल. परंतु केंद्र सरकार या मुद्द्यावर अडून बसले आहे.  लडाखची जमीन काही बड्या कंपन्यांना देऊन टाकायच्या तयारीत दिल्ली दरबार  असावा, हा लडाखी जनतेचा  संशय अधिकच  बळावला आहे. विकासाचे स्वप्न दाखवत विनाशाची तयारी चालू आहे. गेली सहा वर्षे हे आंदोलन अहिंसक चळवळीचे आदर्श उदाहरण ठरले आहे. लडाखी लोकांनी सरकारला निवेदने दिली, उणे २०° तापमानात धरणे धरले, बेमुदत उपोषण केले, लेहपासून दिल्लीपर्यंत १००० किमीची पदयात्रा काढली. परंतु सरकारच्या नाकावरची माशीसुद्धा हलली नाही. जणू या आंदोलकांचा संयम सुटतो केव्हा आणि त्याचे निमित्त करून आपण त्यांच्यावर तुटून पडतो केव्हा याची सरकार वाटच पाहात होते.

या आंदोलनातील काही तरुण हिंसक बनले ही मुळीच आश्चर्याची गोष्ट नाही. उलट हे आंदोलन तब्बल सहा वर्षे अहिंसक राहू  शकले, हेच खरे आश्चर्य! त्यानंतर लगेच या आंदोलनात घडलेल्या हिंसेवर टीका करण्याची हिंमत दाखवून, संपूर्ण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला तर  आपण  शतशः वंदनच करायला हवे. या आंदोलकांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. वांगचुक यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप करणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. कारगिल युद्धात आणि चीनबरोबरच्या प्रत्येक चकमकीत भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या लडाखींना देशद्रोही मुळीच ठरवता येणार नाही. प्रथम काश्मीर, मग पंजाब, त्यानंतर मणिपूर आणि आता लडाख सीमेवरील किती प्रदेशांत सरकार अशी परकेपणाची भावना फैलावणार आहे? जे हिमालयाचे म्हणणे ऐकत नाहीत, त्यांना हिमालयाचा प्रकोप सहन करावाच लागतो, हे सरकारने लक्षात ठेवावे!  

English
हिंदी सारांश
Web Title : When will the government address Ladakh's demands, asks Sonam Wangchuk?

Web Summary : Sonam Wangchuk highlights Ladakh's struggle for autonomy under the Sixth Schedule. Despite promises, the government hasn't addressed their concerns, leading to discontent and protests. Ladakh seeks self-governance and protection from exploitation, but Delhi remains unresponsive, risking alienation in the border region.
टॅग्स :ladakhलडाखagitationआंदोलन