शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यविषयक सुविधा कधी सुधारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 04:55 IST

भारतीय आरोग्य यंत्रणेला तुटपुंजा साधनांसह १.३५ अब्ज जनतेची काळजी घेताना नाकीनऊ आले. सुसज्ज मानली जाणारी यंत्रणा कोविडपुढे उघडी पडली.

- डॉ. एस. एस. मंठा, माजी अध्यक्ष, भारतीय तंत्रशिक्षण परिषदकोविड साथीने प्रत्येक देशातील आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे केले. युरोप अमेरिकेत उत्तम सुविधा आहेत, असे आपण जाणून होतो; पण त्यांनाच मोठा फटका बसला. भारतीय आरोग्य यंत्रणेला तुटपुंजा साधनांसह  १.३५ अब्ज जनतेची काळजी घेताना  नाकीनऊ आले. ही यंत्रणा आकाराने मोठी वाटते; पण लोकसंख्येच्या तुलनेत ती फारच छोटी पडते. ग्रामीण आणि शहरी भागात दर्जाच्या बाबतीत खूपच फरक दिसतो. तीच गोष्ट खासगी आणि सरकारी सेवेची. वर्षभरात या सेवा उघड्या पडल्या. अनेक इस्पितळांत ७५ ते ८० टक्के सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. काही ठिकाणी १०० टक्के वापर कोविडसाठी झाला तरी अनेक रुग्णांना खाटा मिळू शकल्या नाहीत. काही ठिकाणी इतर रुग्णांना सेवा मिळेनाशी झाली. एरवी सुसज्ज मानली जाणारी खासगी यंत्रणाही कोविडपुढे उघडी पडली. 

सरकारी इस्पितळे २६,००० आहेत, त्या तुलनेत खाजगी इस्पितळांची संख्या ४४ हजार आहे. सरकारी इस्पितळात उपचार मोफत असले तरी त्यांचा दर्जा अतिसामान्य असतो. स्वीकारार्ह प्रमाणकांच्या आसपासही तो जात नाही. प्रत्येक राज्यात याबाबतीत फरक आहे तो वेगळा. त्यातही आपपरभाव इतका की, बहुतेक आरोग्य यंत्रणा ७ राज्यांपुरती मर्यादित आहे. आरोग्य यंत्रणेतील तुटपुंजी गुंतवणूक, नसलेल्या सुविधा आणि कर्मचारी या सगळ्या गोष्टी साथीमुळे चव्हाट्यावर आल्या. डॉक्टर्स असोत वा निमवैद्यकीय कर्मचारी, पुरेशा संख्येने भरतीच केली गेलेली नाही. अशा हलाखीत इस्पितळे झगडत राहिली. आजारी पडले, काही आणीबाणी उद्‌भवली तर गरिबाने जायचे कोठे? 
कोरोना साथीने निर्माण केलेल्या आणीबाणीच्या स्थितीपलीकडे जाऊन भविष्यकाळासाठी काही नियमन, सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. खाजगी क्षेत्राचे नियमन अशा रीतेने झाले पाहिजे की, ते अधिक उपयोगाचे ठरेल. केवळ अडचणींचा डोंगर उभा करणारे ते असणार नाही. ग्रामीण भागातील ८६ टक्के आणि शहरी भागातही ८१ टक्के लोकांना अजून आरोग्य विमा नाही ही चिंतेची बाब आहे. डॉक्टर्स, तज्ज्ञ तसेच निमवैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने मिळायला हवेत, अशी परिस्थिती असूनही भारत वैद्यकीय पर्यटनासाठी आकर्षक देश मानला जातो. याचे कारण प्रगत देशांच्या तुलनेने स्वस्तसेवा आणि खाजगी इस्पितळांनी याबाबतीत दर्जाही चांगला राखला आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोंदणीकृत डॉक्टरांची संख्या १२.५ लाख असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी अलीकडे संसद अधिवेशनात दिली. याचा अर्थ लोकसंख्येप्रती डॉक्टरांचे प्रमाण १,३४३ व्यक्तींमागे १ असे आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स फक्त ३.७१ लाख असून, तेही जास्तकरून महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकात कार्यरत आहेत. दरवर्षी ६७ हजार एमबीबीएस डॉक्टर्स पदवी घेऊन बाहेर पडतात. ही संख्या अपुरीच आहे.  सर्व नागरिकांना पुरेशी आरोग्यसेवा पुरवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट  म्हणून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन सरकारने सुरू केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यसेवा, असे या योजनेचे स्वरूप आहे. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र ओळख क्रमांक मिळतो,  ज्यात २०१२२ पर्यंत त्या व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी  सर्व माहिती साठवलेली असते. आजाराचा इतिहास, निदान, सुचवलेली औषधे इत्यादीचा समावेश त्यात असेल. या योजनेचा हेतू उदात्त असून, त्याचे स्वागत केले पाहिजे. योजनेत स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे, ही त्यातली समाधानाची गोष्ट. 
दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यावर सगळ्या चाचण्या पुन्हा करण्याची गरज खरेच भासणार नाही? यातून रुग्णाचा पैसा आणि कष्ट वाचतील, असे गृहीत धरणे सदैव बरोबर ठरणार नाही.माहितीचे डिजिटायझेशन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणू शकेल. धोरणे आणि योजना यांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल. कोविड काळाने वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला तो भविष्यकाळातही सुरूच राहील. अनेक डॉक्टर्स रुग्ण तपासणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर करीत आहेत. टेलिमेडिसीनचा हा पर्याय भविष्यातही सुरू राहील. दूरस्थ रुग्णतपासणी हा एक पर्याय होऊ शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य