शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:23 IST

मराठी अस्मितेच्या बाता मारणा-या सर्व पक्षांना, दिल्लीत महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला मान्यता मिळवून देण्यासाठी झटावे वाटत नाही का? हा प्रश्न केवळ पदव्युत्तर वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांचे भवितव्य इतका मर्यादित नाही, तर त्याचा थेट संबंध ग्रामीण आरोग्यसेवा व राज्यातील कुपोषण, बाल व माता मृत्यूशी आहे.

- डॉ. अमोल अन्नदातेमराठी अस्मितेच्या बाता मारणाºया सर्व पक्षांना, दिल्लीत महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाला मान्यता मिळवून देण्यासाठी झटावे वाटत नाही का? हा प्रश्न केवळ पदव्युत्तर वैद्यकीय सेवा व विद्यार्थ्यांचे भवितव्य इतका मर्यादित नाही, तर त्याचा थेट संबंध ग्रामीण आरोग्यसेवा व राज्यातील कुपोषण, बाल व माता मृत्यूशी आहे.महाराष्ट्रात कॉलेज आॅफ फिजिशियन्स अँड सर्जन्स (सीपीएस)कडून १९१३ सालापासून ग्रामीण, तसेच शहरी भागात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. ३ वर्षांपूर्वी या जागा ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांमध्येही उपलब्ध झाल्या व राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून त्या भरल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता भरून आली व राज्यात बालमृत्यू, मातामृत्यू कमी होण्यास याचा उपयोग झाला. आज एमबीबीएस होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी व त्यांना उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा यात प्रचंड तफावत आहे. सीपीएसच्या हजार पदव्युत्तर जागांमुळे ही तूट कमी झाली व देशभरात याचा गौरव महाराष्ट्र मॉडेल म्हणून झाला, पण नुकतेच दिल्लीस्थित मेडिकल काउन्सिल आॅफ इंडिया म्हणजे केंद्रीय वैद्यकीय परिषदेने बालरोग, स्त्रीरोग, पॅथॉलॉजी (डीसीएच, डीजीओ, डीपीबी ) व एफसीपीएस हे कोर्सेस वगळता, इतर पदव्युत्तर जागांची मान्यता काढून घेतली. या कोर्सना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मान्यता कायम असली, तरी अचानक केंद्रीयङ्क्तएमसीआयची मान्यता काढून घेतल्याने, वैद्यकीय विद्यार्थांच्या नैतिकतेवर व मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील या पदव्युत्तर शिक्षणाच्या जागांना दिल्लीकडून सापत्न वागणूक मिळते व एमसीआयच्या मान्यतेविषयी हा तळ्यात-मळ्यात खेळ सुरूच आहे. डिसेंबर २00९ मध्ये सर्वात आधी मेडिकल काउन्सिल आॅफ इंडियाने ही मान्यता काढून घेतली. त्यानंतर, २0१७ मध्ये केंद्रीय प्रतिनिधींच्या एका पाहणी पथकाद्वारे, सीपीएसच्या पदव्युत्तर जागांचे सर्वेक्षण करून, सर्व ३९ कोर्सेसना १७ डिसेंबर २0१७ रोजी एमसीआयने मान्यता दिली. एका महिन्यात परत चक्रे उलटी फिरली व २१ जानेवारी २0१८ रोजी काही कोर्स वगळता, इतर कोर्सची मान्यता एमसीआयने रद्द केली, तसेच या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी परत केंद्रीय सदस्यांची समिती गठीत केली आहे, पण २१ जानेवारी २0१८ आधी प्रवेश झालेल्या विद्यार्थांच्या जागांना एमसीआयची मान्यता कायम राहील. एमसीआयची मान्यता असल्यास, विद्यार्थी देशात कुठेही प्रॅक्टिस करू शकतात. यामुळे इतर राज्यातील डॉक्टर महाराष्ट्रात व इतर म्हणजे गुजरात, राजस्थान, दिव दमण या राज्यात महाराष्ट्रातील मुले सीपीएस कोर्सेसला प्रवेश घेऊ शकतात, पण एमसीआय मान्यता नसल्यास ही दारे बंद होतात. आज वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या कमी जागांमुळे प्रवेशासाठी स्पर्धा खूप तीव्र आहे. आज तरुण डॉक्टर उमेदीची अनेक वर्षे पदव्युत्तर परीक्षा देण्यातच खर्ची घालवितो. त्यामुळे राज्याची मोठी मानव ऊर्जा निष्फळ ठरते आहे.एकीकडे क्लिनिकल पदव्युत्तर जागा वाढविण्यासाठी, राज्य शासनाने मागे एमबीबीएसच्या पहिल्या व दुसºया वर्षांच्या शिक्षकांची पदे, तिस-या वर्षाच्या क्लिनिकल जागांकडे वळविण्याचा घाट घातला होता. तूर्त या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे, पण दुसरीकडे सीपीएससारखा क्लिनिकल पदव्युत्तर जागांच्या पर्यायाला केंद्राची मान्यता मिळवून देण्याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होते आहे.

(लेखक हे बालरोग तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :Mumbaiमुंबई