शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

वाचनीय लेख - शेअर बाजारात उत्साही गर्दी आहे, तेव्हा जरा जपून !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 11:07 IST

भारतीय शेअर बाजार वादळाच्या उंबरठ्यावर आहे. गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप कंपन्यांचे समभाग, डेट गुंतवणुकीची साधने किंवा रोखीने पैसे साठवून ठेवावा!

केतन गौरनिया, वित्तीय सल्लागार

गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजाराने सर्वोच्च शिखर गाठलेले दिसले.. निफ्टी इंडेक्स आणि पाठोपाठ बँक निफ्टी यांनी अभूतपूर्व उच्चांक गाठला. मिड कॅप श्रेणीतील कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्यासाठी तुडुंब गर्दी आहे आणि आताच्या परिस्थितीत अनेकजण शेअर बाजारात टिप्स देण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सद्य:स्थितीत काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या किमती देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांच्या किमतीशी स्पर्धा करताना दिसत आहेत.

ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पाच ते दहा वर्षांचे क्षितिज निश्चित केले होते त्यांनी स्वतःला सिद्ध केले असे म्हणता येईल. सर्व  घडामोडी  पचवत बाजाराने हा प्रवास केला आहे. एप्रिल २०२३ मध्ये शेअर बाजारात जेव्हा निराशावाद पसरला होता त्यावेळी मी याच ठिकाणी चांगल्या दिवसांचे भाकीत केले होते. त्यावेळी निफ्टी १७,५०० अंशांवर, सेन्सेक्स ६० हजार अंशांवर तर मिडकॅप निफ्टी ३० हजार ५०० अंशांवर होता. आज निफ्टी २० हजार २०० वर, सेन्सेक्स ६८ हजार अंशांवर तर मिडकॅप निफ्टी ४१ हजार अंशांवर आहे. या वळणावर आपला नफा नोंदवत काही बचावात्मक पवित्रा घेत शेअर बाजार गुंतवणूक करायला हवी. यामुळे दीर्घकालीन जोखमीचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.एक इशारा देणे गरजेचे वाटते. जेव्हा बहुतांश लोक हे बाजाराबद्दल अधिक उत्साही असतात, किंवा स्वार्थीपणाने व्यवहार करताना दिसतात, त्यावेळी गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असा इशारा देण्यामागे काही कारणे आहेत. अनेक कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी २०२३ मध्ये ११ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या समभागांची निर्गुंतवणूक (विक्री) केली आहे. विक्रीची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अशा सरावलेल्या गुंतवणूकदारांना बाजारात पुन्हा प्रवेश करण्याची घाई नसते. तर दुसरीकडे, म्युच्युअल फंड, सामान्य गुंतवणूकदार यांचे लक्ष हे निव्वळ मालमत्ता मूल्यावर (एनएव्ही) व अल्प मुदतीच्या कामगिरीवर असते. 

मार्केटमध्ये मंदीसारखी स्थिती असते, तेव्हा भारतीय शेअर बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार महागडे होतात.  मिड कॅप किंवा स्मॉल कॅप समभागांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे हतबल झालेले दिसतात. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण गुंतवणूकदारांना तिथे अडकून पडायला होते.सध्या डॉलर इंडेक्स १०५ च्या दरम्यान घिरट्या घालत आहे. तर तेलाच्या किमती प्रती बॅरल ९० अमेरिकी डॉलर इतक्या आहेत. अमेरिकेचे १० वर्षांच्या कालावधीसाठीचे व्याजदर हे ४.७५ तर कधी ५ टक्के आहेत. अशा स्थितीत, भारतीय बाजारासमोर अनेक आव्हाने आहेत. भारतात मान्सून सामान्य स्तरापेक्षा कमी झाला आहे. परिणामी महागाई वाढताना दिसेल.  

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, २०१४ ते २०२३ या कालावधीमध्ये भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी घसरला आहे. २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण २९ टक्के इतकी झाली होती. २००४ ते २०१४ च्या तुलनेत ही घसरण दुपटीने होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील मंदी पाहता भारतीय निर्यातीला देखील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आगामी  निवडणुका लक्षात घेता अधिक चलनवाढीचा धोका आहेच. यामुळे लोकानुनयी आर्थिक निर्णय होऊ शकतील. अर्थकारणाला फटका बसेल अशा  राजकीय घोषणा होऊ शकतील.  कर आणि जीडीपी यामधील गुणोत्तराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधेसाठी खर्च करण्यासाठी सरकारला मर्यादा येतील, तसेच आर्थिक स्थिती पाहता अनेक योजनांना याचा फटका बसू शकेल. 

थोडक्यात, भारतीय बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर आहे. गुंतवणूकदारांनी बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागात किंवा डेट गुंतवणुकीच्या साधनांत किंवा रोखीने पैसे साठवून ठेवावा. बाजारात सध्या झपाट्याने होणाऱ्या तेजी-मंदीच्या चढउताराचा विचार करता अनेकांना अल्पमुदतीमध्ये आपले नुकसान झाले, असे वाटू शकते. पण आगामी एक ते दोन वर्षांत चांगल्या किमतीला समभागांची उपलब्धी होऊ शकते. ता.क. - हा लेख लिहिल्यापासून आज तो प्रकाशित होईपर्यंतच्या केवळ काही दिवसांमध्येच बीएसई इंडेक्स व निफ्टीमध्ये २.६ टक्क्यांपर्यंत करेक्शन झालेले दिसेल!

टॅग्स :share marketशेअर बाजारbusinessव्यवसाय