शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

चार भिंतीतलं खासगी सुख ओरबाडलं जातं, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 08:33 IST

वैवाहिक नात्यामध्ये स्त्रीची इच्छा, संमती याला महत्त्व असतं, याची जाणीव व्यापक स्वरूपात विकसित होणार नाही, तोवर हे लढे अपरिहार्यच आहेत!

-गौरी पटवर्धन, लेखक, मुक्त पत्रकार

बलात्कार म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न वारंवार वेगवेगळ्या संदर्भात स-त-त चर्चिला जात असतो. त्याबद्दलचे कायदे आणि कोर्टाचे निकाल हेही सातत्याने उत्क्रांत होत असतात. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या गुन्ह्याचं पराकोटीचं खासगी स्वरूप! एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यात एका विवक्षित क्षणी नेमकं काय घडलं हे तिसऱ्या व्यक्तीला संपूर्णपणे कधीही समजू शकत नाही.

हा बलात्कार वैवाहिक संबंधात घडलेला असेल, नवऱ्याने बायकोवर केलेला असेल तर त्यातली गुंतागुंत फारच वाढते. मुळात वैवाहिक बलात्काराला बलात्कार म्हणावं की नाही इथपासूनच मतभेद! ११ मे २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने यासंबंधात दिलेला निकाल  ही द्विधा मन:स्थिती दर्शविणारा आहे. दोन्ही बाजूंचे काही मुद्दे योग्य आहेत, अशी भूमिका घेत दिल्ली उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची अनुमती दिली आहे. 

१८६० साली भारतीय दंडसंहिता अस्तित्वात आल्यापासून विवाहित जोडप्यातील शारीरिक संबंधामध्ये जर पत्नीची संमती नसेल तर तो बलात्कार मानावा का, याबद्दल चर्चा सुरू आहे.  कायद्याचा, न्यायालयांचा आणि एकूण समाजाचाच आजवरचा दृष्टिकोन साधारणपणे असा, की नवरा-बायकोतील शारीरिक संबंध हे बलात्कार मानू नयेत. कुठल्याही खटल्यात समोर असलेले पुरावे आणि त्यासाठीच्या कायद्यातील तरतुदी या चौकटीतच न्यायालयांना चालावं लागतं. बदलत्या समाजरचनेने नवे प्रश्न निर्माण केले की संदर्भहीन ठरलेले कायदे बदलावे लागतात, जो अनुभव निर्भया प्रकरणात देशाने घेतला.  

मात्र न्यायालय आणि त्याहीपेक्षा कायदा करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर बहुतेक वेळा एकूण समाजाच्या मताचा प्रभाव असतो; कारण तेही त्याच समाजातून आलेले असतात. त्यातही लोकप्रतिनिधींना एकूण समाजमनाचा कल कुठे आहे याचा अंदाज घेऊन त्यानुसार आपले विचार / वर्तन बेतावे लागते.  वैवाहिक बलात्कार हा सर्वसामान्यतः समाजाला (आजही) बलात्कार वाटत नाही ही या सर्व प्रकरणाच्या मुळाशी असलेली खरी शोकांतिका आहे. आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत लग्न ही गोष्टच मुळी स्त्री आणि पुरुषाने एकमेकांशी अधिकृतपणे शरीरसंबंध ठेवावेत यासाठी करायची असते. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असते म्हणूनच स्त्री आणि पुरुष लग्न करतात हे त्यात अध्याहृत असतं. एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवणं हा विवाहित स्त्री-पुरुषांचा, त्यातही पुरुषांचा अधिकार आहे, अशीच समाजाची धारणा असते; आणि त्याच्या हक्काचं जे आहे ते त्याला मिळालं पाहिजे असाच एकूण सूर असतो. 

 - पण, पत्नीला ‘त्यावेळी’ संबंध ठेवण्याची इच्छा नसेल तर तिला नकार देण्याचा अधिकार आहे की नाही? त्यातून उपस्थित होणारा मूलभूत प्रश्न म्हणजे तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे की नाही?  पत्नी  संबंध ठेवायला नाही म्हणाली आणि नवऱ्याला शरीरसुख हवंच असेल, तर तो अशा वेळी काय करतो? खरंतर, त्याने अशा वेळी काय करावं असं समाज त्याला कळत-नकळत शिकवतो. मुळात शरीरसंबंधांमध्ये स्त्रीलाही आनंद मिळाला पाहिजे, याचा विचार आपल्याकडे समाज म्हणून होतो का? तसा विचार करायला पुरुषाला शिकवलं जातं का? की ‘नवरा म्हणून तुझा अधिकार सरळ मार्गाने मिळत नसेल तर जबरदस्तीनं ते सुख घेण्यातच खरा पुरुषार्थ आहे,’ अशीच शिकवण पुरुषांना आपोआप मिळत जाते. जबरस्तीची कृती जर का एखाद्या परपुरुषाने केली तर ती बलात्कार ठरते; मग, ती कृती करणारा पुरुष केवळ नवरा आहे म्हणून तीच कृती बलात्कार ठरत नाही, असं होऊ शकतं का, असे अनेक कंगोरे या प्रश्नाला आहेत. पत्नीची तयारी / इच्छा नसताना पतीनं जबरदस्तीनं ठेवलेले शरीरसंबंध जर बलात्काराच्या व्याख्येत बसत नसतील तर बलात्काराची व्याख्याच पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवी, असा आग्रह स्त्री संघटनांनी दीर्घकाळ धरलेला आहे.

स्त्री-पुरुषांच्या नात्यातला पॉवरगेमही अनेकदा वेगवेगळी रूपं धारण करून शरीरसंबंधांच्या आखाड्यात प्रकट होतो. मुळातच वैवाहिक नात्यामध्ये स्त्रीची इच्छा आणि तिची संमती याला महत्त्व असतं, असायला हवं याची जाणीव अधिक व्यापक स्वरूपात विकसित होणार नाही, तोवर हे लढे आपल्या समाजाला आणि अर्थातच न्यायालयांनाही लढावे लागणार आहेत.patwardhan.gauri@gmail.com

टॅग्स :Womenमहिला