शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विशेष लेख - जुन्या पुस्तकामध्ये नवी ऊर्जा भरली जाते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 6:15 AM

महाराष्ट्र साहित्य परिषद गेली ११५ वर्षे मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या जतन-संवर्धनासाठी कार्यरत आहे. आज परिषदेचा वर्धापनदिन! त्यानिमित्ताने.......

२०१६ मध्ये कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने “साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे”, ही भूमिका  समोर ठेवून परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी आपल्या कार्यशैलीत बदल केला.  साहित्य परिषदेतर्फे विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन  आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले. मसाप तालुका पातळीवर आणि छोट्या गावातही पोहोचली. परिषदेच्या शिवार साहित्य संमेलनांना  ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. साहित्य परिषदेत सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्याने आणि पारितोषिकांचे वितरण एवढेच कार्यक्रम होत असत. त्यात बदल करून  ज्येष्ठ लेखिका वैदेही, डॉ. प्रतिभा राय, सितांशु यशचंद्र या अन्य भाषांतील थोर सारस्वतांना परिषदेच्या वर्धापनदिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेने लोक चळवळ उभारली, पंतप्रधानांना एक लाख पत्रे, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि नेत्यांच्या गाठी-भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता या आंदोलनाला यश आले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे यासाठीच्या लेखक आणि विधिज्ञांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच झाल्या. 

साहित्य संमेलना अध्यक्षपदासाठी निवडणुकांचा पर्याय होता तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत असे.  समाजमनातही त्याविषयी खदखद होतीच. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठाम भूमिका घेऊन निवडणुकीऐवजी ‘सन्मानपूर्वक निवड’ या पर्यायाचे समर्थन केले. तसा ठराव मसापच्या कार्यकारी मंडळात प्रथम मंजूर केला आणि महामंडळातही तो मंजूर व्हावा यासाठी पुढाकार घेतला. सर्व संस्थांच्या सहमतीने हा पर्याय स्वीकारला गेला आणि डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे यांच्या रूपाने वाचकांच्या मनातील संमेलनाध्यक्ष संमेलनांना मिळाले. तंत्रस्नेही समाजाला साहित्य परिषदेने संकेतस्थळ, फेसबुक पेज, व्हॉटसॲप ग्रुपच्या साहाय्याने जोडले. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित करणारी मसाप ही भारतातील एकमेव साहित्यसंस्था आहे. हा वाङ्मयाचा इतिहास ई-बुक रूपात आणला.  महापुरात उद्ध्वस्त झालेल्या सांगलीच्या नगर वाचनालयाला अकरा हजार पुस्तके परिषदेने भेट म्हणून दिली. कोरोनाच्या संकटकाळात निवडणुका घेणे शक्य नसल्याने आणि या कठीण काळात निवडणुकीवर होणारा  खर्च वाचविण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने पाच वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.  काळाची गरज ओळखून विद्यमान कार्यकारी मंडळाला सर्वसाधारण सभेने पाच वर्षांची मुदतवाढ दिली. 

आता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील आणि विश्वस्त यशवंतराव गडाख, दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांनी केलेल्या आर्थिक मदतीतून परिषदेत नूतनीकरण सुरू आहे. साहित्य परिषदेचे ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृह वातानुकूलीत आणि ध्वनिप्रतिबंधित होत आहे.  वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण होत आहे.  परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवीत आज साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे. - अंजली कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद