शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

निवृत्त कर्मचाऱ्यांचा निधी नेमका कुणाचा? भविष्य कुणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:18 AM

ईपीएस १९९५, केवढा मोठ्ठा प्रश्न? १८ वर्षे सुटला नाही.

- विनायक गोडसेईपीएस १९९५, केवढा मोठ्ठा प्रश्न? १८ वर्षे सुटला नाही. आम्ही निवडून आलो तर चुटकीसरशी सोडवू, अशा वल्गना झाल्या. ९० दिवसांत तुमचा प्रश्न सोडवून तुम्हाला तीन हजार रुपये पेंशन लागू करू. असे म्हणणारे लोक १७९० दिवस झाले तरी हा प्रश्न का बरं सोडवू शकले नाहीत ? उलट या काळात आणखी तीव्र झाला. कारण एवढ्या वेळात आणखी काही लाख पेंशनर वाढले. काय अडचण आहे तो प्रश्न सोडवायला? तर हो, इच्छाशक्तीची वानवा! द्यायचेच नाही. सरकार चालवायला पैसे पाहिजेत. पण कुणाचे? गरिबांचे, निरूपद्रवी जीवांचे. त्यांनी घाम गाळून कमवायचे, पेंशनचे चॉकलेट देऊन त्यातला हिस्सा काढून घ्यायचा आणि लिमलेटवर भागवायचे. कारण एकच, हे देशभर विखुरलेले ६५ लाख लोक, त्यातले काही आजारी, काही परावलंबी. सरकारी नोकरांनी मागितला नसताना मागील थकबाकीसह, सहावा वेतन आयोग, सातवा वेतन आयोग किती कमी वेळात लागू केला? त्यांनी न मागता एनपीएसमधला हिस्सा १० टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर नेला. खासदारांचे वेतन, भत्ते, पेंशन वाढवले. खासदारांचे वेतन ठराव न करता ठरावीक वर्षांनी वाढण्यासाठी प्रस्ताव मांडतात. मग आम्ही काय घोडं मारलं? ज्यांच्या व्यासपीठावर तुम्ही बोललात, ‘मी तुमचा प्रवक्ता म्हणून बोलेन.’ त्यांचा प्रश्न हातात नाहीच घेतला, पण त्यांच्यासाठी पंतप्रधानांची वेळ ठरवायला यांना वेळ नाही.

पंतप्रधानांना वेळ नाही, कारण निरुपयोगी म्हातारे. यांच्यामुळे आपल्याला काय फरक पडणार? तसाच कामगार मंत्रालयाला पण वेळ नाही. हं, त्यांनी एकदोन वेळा भेटण्यासाठी वेळ दिला, पण तो वेळ काढण्यासाठी. त्यांनी काय कार्यवाही केली? काहीच नाही. ‘आम्ही अर्थ मंत्रालयाच्या निर्णयाची वाट बघतोय’. असे सांगत दोन अधिवेशने घालवली. त्यांनी टाइमपास करण्याची कारणं शोधताना लक्षात आले की, त्यांच्या आधी बंडारू दत्तात्रय होते. त्यांनी शिर्डी येथील सभेत ‘पेंशनवाढ करू’. असे जाहीर केले. त्यांची उचलबांगडी झाली. मग काय बिशाद कोण तुम्हाला पेंशन वाढवण्यासाठी प्रयत्न करेल? एक एक अधिवेशन पुढे ढकलत शेवटी सीबीटीवर ढकलले. सीबीटीवाले काय सगळे सरकारचे मिंधे. सगळे आयुक्त पगारी नोकर. मालकाशी इमान राखून गरिबाची मान मुरगळणार. कंपनी प्रतिनिधी? ते सरकारचीच बाजू घेणार. कारण यांनी भांडवलदारधार्जिणे कायदे बनवले. आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी? त्यांच्या बाबतीत हा प्रश्न कायम आहे की, हे नेमके कुणाचे प्रतिनिधित्व करतात? कारण १९९५ पासून एकाही सीबीटी मेंबरने पेंशनवाढीसाठी ब्र काढला नाही. आणि आता एवढे पैसे असताना सरकार जाहीर करते, किमान पेंशन २००० द्यायला आमच्याकडे पैसे नाहीत. त्या वेळी सीबीटी मेंबर गप्प. याचा अर्थ हाच की सरकारने यांना चॉकलेट दिले किंवा तोंडात बोळा कोंबला.
आमचे, म्हणजे ईपीएसचे जवळपास चार लाख कोटी रुपये असताना, फंड व्यवस्थापन करणारे पैसे देऊ शकत असताना, तो विषय पूर्णपणे बाजूला सारून सरकारने काय साधले? लोकसभेच्या पायºया चढताना प्रथम चरणस्पर्श करण्यापूर्वी वंदन करून चुंबन घेणारे आमचे पंतप्रधान, जे स्वत:ला ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेतात. त्यांनी मुद्दामच हा प्रश्न दुर्लक्षित ठेवलाय असे म्हणायला नक्कीच वाव आहे. कारण सरकार पाठीशी आहे म्हणूनच आमच्या पेंशनवाढीच्या मागण्या मान्य होत नाहीत. एवढेच नाहीतर, राजस्थान, केरळ, तामिळनाडू उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काम करण्याऐवजी त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची हिंमत सरकारी पाठिंब्याशिवाय ईपीएफओ करणार नाही.सगळ्यात मोठा विनोद हा आहे की, आमचे पैसे नियोजन करणारा ईपीएफओचा कर्मचारी, त्यात शिपायापासून आयुक्तापर्यंत सर्व आले. त्यांना मात्र आमच्या कित्येक पटीने पेंशन. कोणाच्या खिशातून? आमच्याच. कारण हे केंद्र सरकारी कर्मचारी नाहीत. आयएल अ‍ॅण्ड एफएस बुडायला आलीय, हे माहीत असताना त्यात २० हजार कोटी रुपये घालायला सांगणारा महाभाग याच सरकारच्या पाठीशी लपलाय. आमची पेंशनवाढ नाकारणारा याच सरकारच्या पाठीशी लपलाय.सीबीटीने पेंशनवाढ जाहीर करण्यात आचारसंहिता आडवी येत नाही, हे सामान्य नागरिकांना माहिती आहे. माझी या सरकारला विनंती आहे. ‘जागे व्हा, नाहीतर ही नाराजी तुम्हाला भोगावी लागेल.’( निवृत्त कर्मचारी नेते)