शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अडसर दूर, इंधनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:50 AM

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे.

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे. मात्र, शासनाकडून या व्यवसायाला इंधन देण्याची गरज होती, ती पूर्ण झालेली नाही. राज्यातील उद्योगाचे चक्र अविरतपणे चालू ठेवण्याची जबाबदारी शासनाची असते. अडचणीत असलेल्या उद्योगांना बळ देण्यासाठी शासनाने काही निर्णय घेणे अपेक्षित असते. बांधकाम व्यवसाय हा तर देशातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा आहे. देशाच्या प्रगतीचे निदर्शक बांधकाम व्यवसायातून दिसते; मात्र काही वर्षांपासून या व्यवसायाला मंदीने ग्रासले आहे. पुणे महापालिका क्षेत्रातच गेल्या वर्षीच्या तुलनेत बांधकाम परवाना शुल्क निम्म्याने कमी झालेले आहे. सन २०१७-१८मध्ये १ हजार ४०० कोटी रुपयांचे असलेले उत्पन्न यंदाच्या वर्षी ५६१ कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. याची कारणे अनेक आहेत; पण त्यातील एक कारण शासनाकडून नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या दरात सातत्याने केलेली वाढ, हेच आहे. सन २००९चा अपवाद वगळता, दरवर्षी वार्षिक मूल्य दरात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर ही वाढ इतक्या झपाट्याने झाली, की बाजारभावापेक्षाही वार्षिक मूल्य दर वाढल्याची उदाहरणे आहेत. मंदीच्या पार्श्वभूमीवर यात सुधारणा होण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून होतीच; परंतु सामान्य माणसाला त्याचा भुर्दंड जास्त बसत होता. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क हे ग्राहकांना भरावे लागते. त्यामुळे एका बाजूला परवडणाऱ्या घरांसाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना मुद्रांक शुल्क ग्राहकांना परवडत नाही, अशीही स्थिती अनेक ठिकाणी दिसते. शासनाने वार्षिक मूल्य दर जाहीर करण्याअगोदरच कायद्यात बदल करून हे दर कमीही करण्याची तरतूद केली होती. त्यामुळे सरसकट नाही तरी किमान ज्या ठिकाणी अवास्तवपणे दरवाढ झाली आहे, त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क हे शासनाच्या महसुलाचे एक प्रमुख साधन आहे. यंदाच्या वर्षीच तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरवर्षी त्यामध्ये सातत्याने वाढही होत आहे. परंतु, रेडीरेकनरचे दर शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले, तर महसूल मिळण्याबरोबरच नागरिकांच्या खिशाला अवाजवी कात्री लागणार नाही. व्यवहारांमध्ये वाढ होऊन उत्तरोत्तर महसूल वाढतच जाऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी चुकीचे दर लागू झाले आहेत, त्यात दुरुस्ती करण्याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या