शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

अडसर दूर, इंधनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:50 IST

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे.

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे. मात्र, शासनाकडून या व्यवसायाला इंधन देण्याची गरज होती, ती पूर्ण झालेली नाही. राज्यातील उद्योगाचे चक्र अविरतपणे चालू ठेवण्याची जबाबदारी शासनाची असते. अडचणीत असलेल्या उद्योगांना बळ देण्यासाठी शासनाने काही निर्णय घेणे अपेक्षित असते. बांधकाम व्यवसाय हा तर देशातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा आहे. देशाच्या प्रगतीचे निदर्शक बांधकाम व्यवसायातून दिसते; मात्र काही वर्षांपासून या व्यवसायाला मंदीने ग्रासले आहे. पुणे महापालिका क्षेत्रातच गेल्या वर्षीच्या तुलनेत बांधकाम परवाना शुल्क निम्म्याने कमी झालेले आहे. सन २०१७-१८मध्ये १ हजार ४०० कोटी रुपयांचे असलेले उत्पन्न यंदाच्या वर्षी ५६१ कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. याची कारणे अनेक आहेत; पण त्यातील एक कारण शासनाकडून नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या दरात सातत्याने केलेली वाढ, हेच आहे. सन २००९चा अपवाद वगळता, दरवर्षी वार्षिक मूल्य दरात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर ही वाढ इतक्या झपाट्याने झाली, की बाजारभावापेक्षाही वार्षिक मूल्य दर वाढल्याची उदाहरणे आहेत. मंदीच्या पार्श्वभूमीवर यात सुधारणा होण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून होतीच; परंतु सामान्य माणसाला त्याचा भुर्दंड जास्त बसत होता. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क हे ग्राहकांना भरावे लागते. त्यामुळे एका बाजूला परवडणाऱ्या घरांसाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना मुद्रांक शुल्क ग्राहकांना परवडत नाही, अशीही स्थिती अनेक ठिकाणी दिसते. शासनाने वार्षिक मूल्य दर जाहीर करण्याअगोदरच कायद्यात बदल करून हे दर कमीही करण्याची तरतूद केली होती. त्यामुळे सरसकट नाही तरी किमान ज्या ठिकाणी अवास्तवपणे दरवाढ झाली आहे, त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क हे शासनाच्या महसुलाचे एक प्रमुख साधन आहे. यंदाच्या वर्षीच तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरवर्षी त्यामध्ये सातत्याने वाढही होत आहे. परंतु, रेडीरेकनरचे दर शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले, तर महसूल मिळण्याबरोबरच नागरिकांच्या खिशाला अवाजवी कात्री लागणार नाही. व्यवहारांमध्ये वाढ होऊन उत्तरोत्तर महसूल वाढतच जाऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी चुकीचे दर लागू झाले आहेत, त्यात दुरुस्ती करण्याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या