शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

अडसर दूर, इंधनाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:50 IST

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे.

बांधकाम व्यवसायात मंदी असल्याने यंदाच्या वर्षी रेडीरेकनरमध्ये (वार्षिक मूल्य दर) कोणतीही वाढ न करून शासनाने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चालना मिळेल. बांधकाम व्यवसायासमोरील एक मोठा अडसर त्यामुळे दूर झाला आहे. मात्र, शासनाकडून या व्यवसायाला इंधन देण्याची गरज होती, ती पूर्ण झालेली नाही. राज्यातील उद्योगाचे चक्र अविरतपणे चालू ठेवण्याची जबाबदारी शासनाची असते. अडचणीत असलेल्या उद्योगांना बळ देण्यासाठी शासनाने काही निर्णय घेणे अपेक्षित असते. बांधकाम व्यवसाय हा तर देशातील सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा आहे. देशाच्या प्रगतीचे निदर्शक बांधकाम व्यवसायातून दिसते; मात्र काही वर्षांपासून या व्यवसायाला मंदीने ग्रासले आहे. पुणे महापालिका क्षेत्रातच गेल्या वर्षीच्या तुलनेत बांधकाम परवाना शुल्क निम्म्याने कमी झालेले आहे. सन २०१७-१८मध्ये १ हजार ४०० कोटी रुपयांचे असलेले उत्पन्न यंदाच्या वर्षी ५६१ कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे. याची कारणे अनेक आहेत; पण त्यातील एक कारण शासनाकडून नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या दरात सातत्याने केलेली वाढ, हेच आहे. सन २००९चा अपवाद वगळता, दरवर्षी वार्षिक मूल्य दरात वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरात तर ही वाढ इतक्या झपाट्याने झाली, की बाजारभावापेक्षाही वार्षिक मूल्य दर वाढल्याची उदाहरणे आहेत. मंदीच्या पार्श्वभूमीवर यात सुधारणा होण्याची अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांकडून होतीच; परंतु सामान्य माणसाला त्याचा भुर्दंड जास्त बसत होता. मुद्रांक आणि नोंदणी शुल्क हे ग्राहकांना भरावे लागते. त्यामुळे एका बाजूला परवडणाऱ्या घरांसाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असताना मुद्रांक शुल्क ग्राहकांना परवडत नाही, अशीही स्थिती अनेक ठिकाणी दिसते. शासनाने वार्षिक मूल्य दर जाहीर करण्याअगोदरच कायद्यात बदल करून हे दर कमीही करण्याची तरतूद केली होती. त्यामुळे सरसकट नाही तरी किमान ज्या ठिकाणी अवास्तवपणे दरवाढ झाली आहे, त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क हे शासनाच्या महसुलाचे एक प्रमुख साधन आहे. यंदाच्या वर्षीच तब्बल २६ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दरवर्षी त्यामध्ये सातत्याने वाढही होत आहे. परंतु, रेडीरेकनरचे दर शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केले, तर महसूल मिळण्याबरोबरच नागरिकांच्या खिशाला अवाजवी कात्री लागणार नाही. व्यवहारांमध्ये वाढ होऊन उत्तरोत्तर महसूल वाढतच जाऊ शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी चुकीचे दर लागू झाले आहेत, त्यात दुरुस्ती करण्याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या