शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शिवसेना-भाजपा महायुतीचं नक्की काय ठरलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 20:11 IST

निवडणूकपूर्व युती करून भाजप-शिवसेना पक्षाने ‘आमचं ठरलंय’, अशी गर्जनाच केली होती. युतीला मिळालेल्या कौलाबद्दल बरेच काही लिहूनही झाले आहे. पण आता साऱ्या महाराष्ट्राला निवडणूक निकालानंतर एकच प्रश्न पडलाय. नवा मुख्यमंत्री कोण?

- विनायक पात्रुडकर (कार्यकारी संपादक)साऱ्या महाराष्ट्राला निवडणूक निकालानंतर एकच प्रश्न पडलाय. नवा मुख्यमंत्री कोण? मराठी जनतेने त्याचा कौल देऊन जबाबदारी पार पाडली आहे. निकालानंतरचा कौल स्वीकारून जबाबदारी घेण्यास राजकीय पक्ष मात्र तयार नाहीत. निवडणूकपूर्व युती करून भाजप-शिवसेना पक्षाने ‘आमचं ठरलंय’, अशी गर्जनाच केली होती. युतीला मिळालेल्या कौलाबद्दल बरेच काही लिहूनही झाले आहे. बहुतांश मराठी मतदारांनी या निकालाबद्दल समाधानही व्यक्त केले. विरोधकांना संपविण्याची भाषा मराठी जनांना पसंत पडली नाही. त्यामुळे युतीच्या बाजूने मर्यादित कौल देत सत्तेत राहा; पण मस्तीत नको, असा संदेशही दिला. सत्तेचा दर्प अहंकार कमी करून जबाबदारीने महाराष्ट्र पुढे नेण्याचा सन्मार्गी संदेशही या निकालातून स्पष्ट दिसतो. इतका स्पष्ट संदेश देऊनही विशेषत: भाजप-शिवसेना या पक्षनेत्यांनी जो तमाशा आणि पोरखेळ सुुरू ठेवलाय त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय प्रतिमा नक्कीच ढासळली गेली आहे.निकाल लागून तब्बल दहा दिवस झाले; पण सरकार स्थापन होण्याचे चिन्ह दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निकाल स्वीकारत आपण प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे जाहीर केले. काँग्रेसने नेहमीप्रमाणे दिल्ली दरबारी निष्ठा ठेवत, भूमिका अधांतरी ठेवली. अर्थात अपेक्षेपेक्षा यश अधिक मिळाल्याने काँग्रेसनेते प्रचंड समाधानी आहेत. प्रश्न आहे तो शिवसेनेचा. कधी आक्रमक तर कधी नरमाईची भूमिका घेत शिवसेनेकडून ताणाताणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नेमके काय गुप्तगू झाले होते, याचे कोडे साºया महाराष्ट्राला पडले आहे. कोणती मंत्रिपदे सेनेला हवी होती, उपमुख्यमंत्री पदाबाबत नेमके काय ठरले होते. कोणती मंत्रिपदे भाजप सोडायला तयार नाही. नेमक्या कोणत्या खात्यावर दोघांचाही डोळा आहे. अशी प्रश्नांची सरबत्ती गप्पांच्या फडात रंग भरत आहे. सत्तेचे हे समीकरण नेमके कोणाच्या अहंकारात अडकले आहे.महाराष्ट्राच्या प्रतिमेपेक्षा यांचा अहंकार जास्त आहे का? मराठी माणसांना मतदान करण्यात फारसा ‘इंटरेस्ट’ नसतो; पण सत्तेचे गणित फारसे जुळत नसेल तेव्हा त्यांच्यातील ‘इंटरेस्ट’ जागा होतो. एरवी मतदानाच्या दिवशी सुट्टीचे नियोजन करणारा मराठी माणूस राजकारणाच्या किस्स्यांमध्ये मात्र पुरता रमून जातो. ओल्या दिवाळीच्या आनंदानंतर सत्तेचा सारीपाटावर जे फटाकडे फटत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय दिवाळी सुरूच असल्याचे चित्र देशभर पसरले आहे. याला अटकाव कोण आणि कधी घालणार? हाही प्रश्नच आहे; पण यानिमित्ताने भाजप-सेनेचे नेते अडेलतट्टू आहेत, असे चित्र निर्माण झाले. युती आणि आघाडीला जो कौल मिळाला आहे, तो सर्वश्रूत आहे. सरकार स्थापन करून तुमची अंतर्गत भांडणे सोडवत बसा, असाही सूर उमटतो आहेच; परंतु सरकार स्थापन करण्यापेक्षा या पक्षनेत्यांना मानपानातच जास्त रस असल्याचे दिसते.नक्की यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे की, पक्षाची पुढची सोय करायची आहे? असाही नैतिक मुद्दा चर्चिला जातो आहे. त्यामुळे सेना-भाजप नेत्यांनी आता स्वत: पुढे येऊन त्यांच्यात नेमके काय ठरले होते, हे जाहीरपणे सांगायला हवे. तरच या राजकीय नेत्यांवर भरवसा ठेवता येईल. सत्तेसाठी जो उंदरा-मांजराचा खेळ सुरू आहे त्याचाही उबग आला आहे. स्वत:ला वाघ-सिंह म्हणून घेणाºया या पक्षनेत्यांनी निधड्या छातीने सामोरे यावे आणि सत्तावाट्याचा हिशोब सांगावा, तरच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अटकळींना अटकाव बसेल, त्यातच साऱ्यांचे सौख्य आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा