शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

जनतेच्या विशेषाधिकाराचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:43 AM

विशेषाधिकार. शब्दातूनच अर्थाचा दबदबा अभिव्यक्त होतो इतका तो विशिष्ट आहे. विशेषाधिकार म्हणजे सरकार, विशेषाधिकार म्हणजे सत्तेने दिलेले विशेषत्व. भारतीय संविधान लोकशाहीवादी असले तरी विशिष्ट व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांच्यावरील जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्याकरिता कायद्याने हा अधिकार प्रदान केला आहे.

विशेषाधिकार. शब्दातूनच अर्थाचा दबदबा अभिव्यक्त होतो इतका तो विशिष्ट आहे. विशेषाधिकार म्हणजे सरकार, विशेषाधिकार म्हणजे सत्तेने दिलेले विशेषत्व. भारतीय संविधान लोकशाहीवादी असले तरी विशिष्ट व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांच्यावरील जबाबदारी अधिक कार्यक्षमपणे पार पाडण्याकरिता कायद्याने हा अधिकार प्रदान केला आहे. पण, हा अधिकार म्हणजे कसेही वागण्याचा अमर्याद परवाना किंवा एखाद्या उत्तरदायित्वापासून मिळालेली मुक्तता असे अजिबात नाही. असलाच तर तो त्या अधिकारात वंचित-शोषितांच्या हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे. पण, दुर्दैवाने या विशेषाधिकाराचा वापर प्रत्येकवेळी केवळ ‘स्व’च्या वलयाला जगापुढे अधोरेखित करण्यासाठी केला गेला आहे. याच क्रमातले नवे उदाहरण परवा विधानसभेत पाहायला मिळाले. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ऐरवी ‘राजकीय मतभेद’ असा परवलीचा शब्द समोर करून लोकहिताच्या विषयावरही परस्परांचे कपडे फाडणारे सर्वपक्षीय आमदार विशेषाधिकाराच्या मुद्यावर सरकारला गुद्दे द्यायला अध्यक्षांपुढे उभे ठाकले. विशेषाधिकाराच्या हक्कासाठी यावेळची सर्वपक्षीय आमदारांची ही एकजूट नाशिक जिल्ह्यातील एका तहसीलदाराच्या हक्कभंगावरून निर्माण झाली. या तहसीलदाराने म्हणे, राकाँच्या सदस्य दीपिका चव्हाण यांना असभ्य वागणूक दिली होती. यावरून सत्ताधीश-विरोधकांची ही एकजूट इतकी घट्ट होती की त्यांच्या निर्धारापुढे आधी सभागृह तहकूब झाले व नंतर तर संबंधित खात्याच्या मंत्र्याला त्या तहसीलदाराला पार निलंबितच करावे लागले. विधानसभेतला हा घटनाक्रम नियोजित नव्हता. पण, गोष्ट विशेषाधिकाराची आहे म्हटल्यावर आधी एक आमदार, नंतर दुसरा व नंतर तिसरा असे अनेकांना त्यांच्या अवमाननेच्या आठवणी अस्वस्थ करू लागल्या आणि विशेषाधिकाराच्या सुरेक्षसाठी पाहता-पाहता आमदारांची एक मोठी साखळी निर्माण झाली. विशेषाधिकाराची सुरक्षा ही योग्यच गोष्ट आहे व ती तसा अधिकार लाभलेल्या प्रत्येकाने केलीही पाहिजे. परंतु ज्या लक्षावधी मतदारांनी आपल्या हिताच्या रक्षणासाठी आमदारांना विजयाचा विशेषाधिकार प्रदान करून राज्याच्या विधिमंडळात पाठवले त्या जनतेच्या विशेषाधिकाराचे काय याचे उत्तरही या आमदारांनी शोधायला हवे. शेतकरी सातत्याने नागवला जातोय, बेरोजगारांची फौज दिवसागणिक वाढतेय, गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले नाही, भ्रष्टाचाराची वाळवी थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलीय. याच्या बंदोबस्तासाठीही सर्वपक्षीय आमदारांनी, जनतेने त्यांना दिलेला विशेषाधिकार वापराला पाहिजे. नाही तर एक दिवस जनता तो स्वत:च काढून घेईल.

टॅग्स :Courtन्यायालय