शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगा लहराकर, नही तो तिरंगेमे लिपटकर...

By विजय दर्डा | Updated: August 17, 2021 07:52 IST

कारगिलच्या युद्धभूमीतल्या अजोड साहसाची तेज:पुंज कहाणी म्हणजे ‘शेरशाह’ ! तिरंग्याच्या बळावरच लव नावाचा सामान्य मुलगा एक दिवस विक्रम बत्रा होतो !

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

जे चित्रपट देशभक्तीने परिपूर्ण आहेत, जे तरुणांना आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देतात, ते मी नक्कीच पाहतो. अलीकडेच मी ‘शेरशहा’ हा सिनेमा पहिला आणि कारगिल युद्धाच्या कटु आठवणीत हरवून गेलो. आपले ५२८ सैनिक त्या युद्धात हुतात्मा झाले होते. हा प्रश्न माझ्या मनात कायम असतो, की जो कोणी युद्धात मरतो तो कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा असतो. युद्धे लादली जातात. म्हणूनच मला युद्धाचा तिरस्कार आहे. कारगिल युद्धात अदम्य साहस, शौर्य दाखवणाऱ्या भारतीय वीरांच्या कहाण्या अगणित आहेत. पण विक्रम बत्राची कहाणी मात्र त्यात चमकणारी! वेगळी. 

विक्रम बत्रा हा हिमाचल प्रदेशातील पालनपूर या छोट्या; पण सुंदर शहरातला होनहार तरुण. सिनेमा पाहताना मनात आले, हिमाचलसारखा शांत प्रदेशाच्या कुशीतून असे  शूर योद्धे जन्माला यावेत, याचे रहस्य काय असेल? कारगिलच्या युद्धात हिमाचलातल्या ५२ वीरांनी प्राणार्पण केले. त्यात दोन परमवीरचक्र विजेते होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर आणि हवालदार संजय कुमार यांना परमवीरचक्र दिले गेले. विक्रम बत्राचे वडील जी. एल. बत्रा आणि आई कमल कांता दोघेही शिक्षक होते. विक्रम आणि त्याच्या भावाला मातापित्यांनी लव-कुश अशी नावे दिली होती. तसे म्हटले, तर या कुटुंबाचा सैन्याशी दुरूनही काही संबंध नव्हता. लव मात्र शाळेत एनसीसीमध्ये जात होता. बालपणीच सैन्यात जाण्याचे त्याच्या मनाने घेतले आणि तिरंगा त्याला बोलावू लागला. ‘जन गण मन’चे जादुई स्वर जणू त्याच्यावर स्वार झाले. शेवटी तो सेनादलात सामील झाला. 

कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या या वीराने कारगिलच्या युद्धात हंप तथा राकी नाब जिंकून आपले पहिले शौर्य दाखविले. तो सेकंड लेफ्टनंटचा कॅप्टन झाला. त्यानंतर कारगिलमध्ये ५१४० नामक शिखर जिंकून त्याने पुन्हा अशक्य ते शक्य करून दाखविले. विक्रमची तुकडी अशा मार्गाने शिखरावर पोहोचली, की शत्रूला पत्ताही लागला नाही. युद्धात इतक्या आणीबाणीच्या वेळी सर्वांत पुढे राहून पथकाचे नेतृत्व करणे ही विक्रमची खासियत होती. २० जून १९९९च्या पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी ५१४० हे शिखर त्यांनी गाठले आणि रेडिओवरून ‘ये दिल मांगे मोअर’ हा संदेश दिला. ती विजयाची घोषणा होती ! सारा देश विक्रम बत्रा यांचा दिवाना झाला होता. या विशेष चढाईसाठी कर्नल योगेश कुमार जोशी यांनी विक्रमला ‘शेरशाह’ असे सांकेतिक नाव दिले होते.विक्रम बत्रा यांच्या शौर्याचे किस्से गाजत होते. हा शेरदिल तरुण काहीही करू शकतो, असे मानले जाऊ लागले.

कारगिलचे घमासान सुरूच होते. अत्यंत चिंचोळ्या ४८७५ या शिखरावर चाल करून शत्रूला हुसकण्याची जबाबदारी विक्रम आणि त्याच्या तुकडीवर टाकण्यात आली. दोन्ही बाजूला दरी होती. वर जायचा एकमेव रस्ता शत्रूच्या ताब्यात होता. विक्रमने ध्येय साध्य करण्यासाठी अशी काही वाट निवडली, की ते शत्रूच्या डोक्यातही येणे शक्य नव्हते. शिखरावर पोहोचताच  समोरासमोर झालेल्या लढाईत विक्रमने पाच शत्रू सैनिक यमसदनी धाडले. शरीराची गोळ्या लागून चाळणी झालेली असतानाही विक्रमने प्राण पणाला लावून ग्रेनेड फेकला आणि दुश्मनांंना संपविले. भारताने हे शिखर सर केले खरे; पण आपण ‘शेरशाह’ गमावला.

‘एक तर बर्फाळ शिखरावर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून येईन’, असे विक्रम यांनी पालनपूरहून निघताना आपल्या मित्राजवळ म्हटले होते. १३ जम्मू-काश्मीर रायफल्समध्येच नव्हे तर सैन्याच्या प्रत्येक तुकडीत विक्रम यांचे हे वाक्य अभिमानाने सांगितले जाते. खरे तर ही तिरंग्याचीच ताकद आहे जी एखाद्या माणसाला देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची प्रेरणा देते, शत्रूच्या नाकीनव आणण्याचे बळ देते ! भारतमातेला जगभर एक देश म्हणून ओळख मिळते ती या ताकदीच्याच भरवशावर.

एक प्रसंग आठवतो. राज्यसभा सदस्य म्हणून  संसदेच्या सभागृहात प्रवेश करीत असताना माझ्या छातीवर तिरंग्याची लेपन पीन होती. ‘ही लावून आपण आत जाऊ शकत नाही, त्यासाठी परवानगी नाही’, असे सांगून मला अडवले गेले. पण अथक संघर्ष करून मी अखेर तो प्रवेश मिळवलाच. छातीवर तिरंगा लावणे, हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे हे संसदेने मान्य केले. - याच तिरंग्यासाठी  सामान्य माणूस एक मिनिट थांबणे दूर राहिले, पोहोचूही शकणार नाही अशा दुर्गम ठिकाणी आपले सैनिक ठिय्या देऊन राहतात, तिथेही तिरंगा त्याच्यासोबतीला असतो. मला वाटते, या शूरवीरांच्या कहाण्या सांगणारे चित्रपट सतत निघाले पाहिजेत. त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल. दुर्दैवाने, आज तरुणांना प्रेरणा मिळवण्याच्या कमी संधी आहेत. अभ्यास असो, क्रीडा किंवा व्यवसाय, सर्वत्र प्रेरणेचा अभाव आहे. समाज, सरकारकडून लोकांना प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. लोकांनी चुकीच्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. कोणतीही भेसळ करण्यापूर्वी विचार करा की हे पाप आहे. जर एखादा तरुण एखाद्या शैक्षणिक संस्थेत जात असेल, तर शिक्षकाने असा आदर्श ठेवला पाहिजे की विद्यार्थ्याला प्रेरणा मिळेल, खेळाडूंना वाटेल की इथे कोणताही भेदभाव नाही. राजकारण्यांनी सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असले पाहिजे. 

विक्रम बत्रा हुतात्मा झाल्यावर डिम्पल चिमा या त्यांच्या मैत्रिणीने अन्य कुणाशीही विवाह करायला नकार देत एकटे राहणे पसंत केले. या तरुण मुलीच्या  जिद्दीला मी नमन करतो. प्राणांची बाजी लावून तिरंग्याचा मान राखणारे सर्व हुतात्मे, सैनिकांना माझे नमन. त्यांनी तिरंग्याची, भारतमातेची प्रतिष्ठा राखली. म्हणूनच तर आपण गर्वाने म्हणतो, ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा.’ जय हिंद.. वंदे मातरम!

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन