शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे दुर्भिक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:44 IST

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये.

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये. पाण्यासाठी मोताद झालेल्या यवतमाळकरांना आठवडाभराचे पाणी साठवून ठेवण्याकरिता सुटी घ्यावी लागत आहे. १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून देणारी ही पाणीटंचाई असल्याची प्रचिती येत आहे. उन्हाळा जेमतेम सुरू झाला आहे. पुढे स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अनेक भागांची भिस्त टँकरवर असली तरी टँकरही येत नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात तर चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. गावातील हातपंपच निकामी झाल्याने पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरींची पातळी अतिशय खोल गेली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा एकदिवसा आड केला जात आहे. परिणामी नागरिकांना आठ दिवसानंतरच पाणी मिळत आहे. ग्रामसेवकाकडे तक्रार केली तरी तो दुर्लक्ष करतो. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील ग्रामीण दरवर्षी पाण्याच्या समस्येला सामोरे जातात. गोंदिया, भंडारातही स्थिती वेगळी नाही. उन्हाची दाहकता तशी फेब्रुवारीपासूनच जाणवायला लागली होती. मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. मात्र प्रशासनदरबारी नियोजनाचा अभाव असल्याने पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, असे वाटायला लागले आहे. गुंडभर पाण्यासाठी दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळते. जंगलातही वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदा मार्चमध्येच जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले आहेत. ही बाब वनखात्यासाठी अधिक चिंताजनक आहे. ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या विदर्भात वाघांची संख्या मोठी आहे. वाघांची तृष्णा भागविण्यासाठी वन विभाग दरवर्षी नियोजन करीत असतो. कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र यंदा हे काम आतापासूनच हाती घेण्यात आले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत असताना कृत्रिम पाणवठ्यात शिकाऱ्यांकडून विषप्रयोग करून प्राण्यांची शिकार करण्याची भीती आहेच. एकंदरीत यंदाचा उन्हाळा डोळ्यातून पाणी आणणारा ठरू शकतो.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई