शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना...

By admin | Updated: May 14, 2015 00:48 IST

दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

 राजा माने -

‘दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. स्वप्नरंजन आणि हवेतल्या गणितात हरवून न जाता इथला सर्वसामान्य शेतकरी येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन राज्यापुढे वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. साखर कारखानदारी अडचणीत असताना इथल्या ३२ साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळविला. पाणीप्रश्न आणि अनियमित पावसाने वैतागलेल्या मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्यात अंकुश पडवळेसारखे जिद्दी शेतकरी सामूहिक शेततळी आणि नेटशेड शेती यशस्वी करताना दिसतात. नव्या जमान्याची भाषा बोलणारी विषमुक्त अथवा सेंद्रिय शेती असो, ठिबक सिंचन पद्धती असो वा नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी शेती असो जिल्ह्यातील शेतकरी त्याचा स्वीकार करून पुढे जात असताना दिसतो.दुष्काळग्रस्तीचा शाप कायमचा पुसून टाकणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी संघर्ष आणि कृती यांचा मेळ फक्त शेतकऱ्यांनी घालून जमणार नाही. त्यासाठी प्रशासन, सहकार क्षेत्र आणि स्वत: शेतकरी यांनीच समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच भूमिकेत सध्या जिल्हा दिसतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेती आणि विकास यांचा विचार करण्याची प्रक्रियाही जिल्ह्यात गतिमान होताना दिसते. ती अधिक गतिमान करण्याचे काम अधिकारी किती खुबीने करू शकतात याचा अनुभव सध्या येतो आहे. देशात सर्वांत मोठा दहा हजार कोटी रुपयांचा जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा तयार करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आराखड्याबरहुकूम कामाला लागल्याचे दिसते. ११ लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घेतले जाते. १२३ टीएमसी पाणी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सिंचन क्षेत्राची व्याप्ती वाढत नाही. जिल्ह्यातील ४३ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या उजनी धरणावरचे ओझे ठिबक सिंचनाशिवाय हलके होणार नाही. त्याचसाठी मुंढे यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी मनावर घेतले तर जिल्ह्यातील शेतीचे सोने होऊ शकते, याचे भान जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी ठेवल्याचे दिसते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील योजना थेट शिवारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसतो. जे जिल्ह्यात चांगले चालले आहे ते आत्महत्त्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. परंपरेने दुष्काळग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कृषी आणि दुग्ध विकासासाठी कसे प्रयत्न चालले आहेत हे विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे यासाठी सुरेश काकाणी व सोलापूरचे विक्रीकर सहआयुक्त पुरुषोत्तम गावंडे यांनी एक चांगला उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविला. विदर्भातील ५० शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात कल्याणी दूध प्रकल्प, भंडारकवठे येथील सिद्धानंद कोटगुंडे यांनी नेटशेड शेतीच्या माध्यमातून घेतलेले ढोबळी मिरचीचे उत्पन्न तसेच मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे क्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून चाललेले सामूहिक शेततळ्यासारखे उपक्रम त्या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. काकाणी-गावंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी व जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मदन मुकणे यांच्या मदतीने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा उपक्रमदेखील दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संदेश देणारे एक पाऊलच ठरावे.