शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

भुजबळांसाठी की मतांसाठी?

By किरण अग्रवाल | Updated: January 4, 2018 08:16 IST

राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्याने सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वभाविक ठरले आहे.

राज्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामागे विविध चौकशांचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगातच अडकवून ठेवल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ केल्या गेलेल्या सत्याग्रह आंदोलनात अगदी भाजपा नेत्यासह खुद्द राष्ट्रवादीतील भुजबळ विरोधकही सहभागी झाल्याने सामान्यांच्या भुवया उंचावणे स्वभाविक ठरले आहे. विशेष म्हणजे, वेळोवेळी उघडपणे भुजबळ विरोधाचा उच्चार करणा-या नेत्यांनी या आंदोलनादरम्यान ‘मी भुजबळ’ लिखित टोप्या परिधान केल्याने सोयी वा गरजेनुसार राजकारणातील टोपी बदलाचा प्रत्ययही पुन्हा येऊन गेला आहे.दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ २२ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करीत असून, त्यांच्या सुटकेत अडथळे आणत असल्याचा आरोप केला जात आहे. याच संदर्भाने भुजबळ समर्थकांकडून सरकारच्या निषेधार्थ ठिकठिकाणी जी आंदोलने केली गेलीत त्यात यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सरकार समर्थक आमदारही सहभागी झाल्याने या अराजकीय आंदोलनाला राजकीय छटा प्राप्त होणे क्रमप्राप्त ठरून गेले. एकतर, सरकार भुजबळांवर सूडबुद्धीने कारवाई करीत आहे हे लक्षात यायला या पक्षांना व नेत्यांना तब्बल सुमारे दोन वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला, असा अर्थ यातून काढता यावा, किंवा पुढे येऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने ओबीसी मतांसाठी त्यांना आता भुजबळांची आठवण झाली असे तरी समजता यावे; कारण यापूर्वी ३ आॅक्टोबर २०१६ रोजी याच कारणास्तव भुजबळ समर्थनार्थ नाशकात जो विराट मोर्चा कााढण्यात आला होता, त्यात ‘मी भुजबळ’च्या टोप्या घालून आज आंदोलनात उतरलेल्या जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांपैकी कुणी दिसला नव्हता.भुजबळ मुंबई सोडून नाशिकच्या राजकीय परिघावर अवतरल्याने जी स्थानिक संस्थाने खालसा झाली त्यात देवीदास पिंगळे यांचे नाव आवर्जून घेता येणारे आहे. विधान परिषद तसेच लोकसभेतही नाशिकचे प्रतिनिधित्व केलेल्या पिंगळे यांची जिल्हा बँक व नाशिक बाजार समितीतही मातब्बरी होती. पण, भुजबळ नाशकात आल्याने लोकसभा निवडणुकीसाठीचे ‘तिकीट’ही गेले आणि हळूहळू पक्षातील त्यांचा प्रभावही ओसरला. पुढे पुढे तर पिंगळे हे पक्षाचे नाशिकबाहेरील नेते नाशकात आले तरच तेवढ्यापुरते पक्षाच्या व्यासपीठावर दिसत. त्यामुळे त्यांचा भुजबळांशी मनोमन झालेला दुरावा लपून राहिला नाही. अलीकडेच नासिक सहकारी साखर कारखाना व बाजार समितीतल्या तख्तावरूनही त्यांना पायउतार व्हावे लागले. अशात पिंगळे ‘मी भुजबळ’ची टोपी घालून जसे आंदोलनात उतरलेले दिसले तसे निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर यांचा सहभागही लक्षवेधी ठरला. कारण भुजबळ पक्षांतर्गत राजकारणात ‘मोठ्या साहेबां’च्या म्हणजे शरद पवार यांच्या मर्जीतले म्हणवले जात असताना बनकर हे धाकल्या पातीच्या म्हणजे अजित पवार यांच्या मर्जीतले म्हणवले जातात. त्यातून काही बाबी त्यांना आपसूक चिकटल्या. मध्यंतरी याच बनकर यांच्या पुढाकारातून शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव (ब) येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला होता तेव्हा व्यासपीठावरील फलकावर नेत्यांच्या मालिकेत छगन भुजबळ यांचे छायाचित्र न वापरल्याने गदारोळ झाल्याने अखेर ऐनवेळी फलक बदलण्याची वेळ आली होती. तेच बनकर कालच्या आंदोलनात ‘मी भुजबळ’ची टोपी घातलेले दिसले. नाशकातील राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष गजानन शेलार यांचेही असेच. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शेलार यांनी भुजबळांचे बोट सोडून स्वत:चा स्वतंत्र सवतासुभा स्थापला होता. अजित पवार यांची फूस त्यामागे असल्याचे त्यावेळी बोलले गेले. पण, ते शेलारही ‘मी भुजबळ’ म्हणवताना दिसले. भुजबळ समर्थनाच्या या आंदोलनात राष्ट्रवादीने सक्रियपणे उतरण्याची भूमिका घेतल्याने हे असे घडले असेल, म्हणूनच मग आतापर्यंत याकडे दुर्लक्ष करणा-या राष्ट्रवादीला आताच भुजबळ का आठवले व त्या अनुषंगाने या नेत्यांचे समर्थन खरे मानायचे का, असे प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नयेत. अर्थात पक्षाला व नेत्यांना आज भुजबळांची आठवण झाली असली तरी भुजबळांमागे असलेल्या सामान्यांना व समर्थकांना ती कायम असल्याचे या आंदोलनातूनही दिसून आले. तेव्हा त्यामुळेच राष्ट्रीवादीसह अन्य पक्षीयांनाही या आंदोलनात उतरावे लागले असेल तर काय सांगावे?महत्त्वाचे म्हणजे, पक्षांतर्गत दुराव्यातील नेत्यांची भुजबळ समर्थनातील अशी सहभागीता एकीकडे दिसून येताना व त्यात मालेगावचे विद्यमान आमदार आसिफ शेख, चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल, नांदगावचे अनिल आहेर या काँग्रेसच्या नेत्यांचीही भर पडली असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार अपूर्व हिरे यांचीही मालेगावातील आंदोलनात सक्रियता दिसून आल्याने चर्चेचा फुगा अधिक उंचावून गेला आहे. हिरे हे भाजपा समर्थक आहेत म्हणून हे आश्चर्य नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळ यांना नेटाने व उघडपणे कडवा विरोध करणारे दमदार नेतृत्व म्हणून आजवर त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. मध्यंतरी त्यांनी भुजबळ यांची तुरुंगातही भेट घेतली होती. त्यातून त्यांच्यातील वाढत्या सलगीची जी चर्चा घडून आली, तिला या टोपी बदलाने बळकटीच मिळून गेली आहे. सोशल इंजिनिअरिंगद्वारे मतपेढी बळकट करण्याचे प्रयत्न यामागे असण्याची शक्यता नाकारता येणारी नसल्याने, या सर्वपक्षीय सहभागीतेकडे संभाव्य राजकीय समीकरणांचा संकेत म्हणूनच पाहता यावे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक