शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

मतदारांना गृहित धरणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 5:01 PM

सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप-शिवसेनेसह सर्वच पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. सत्तेमुळे, पदामुळे डोक्यात हवा शिरते आणि जमिनीपासून चार वीत रथ उंचावर धावू लागला की, समजावे आत्मघात हमखास होणार आहे. त्याची प्रचिती या निकालाने आणून दिली आहे.संकटमोचक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या गिरीश महाजन यांना आता भाजपच्या खान्देशातील अपयशाचे धनी समजले जाणे अगदी स्वाभाविक आहे. नगर, नाशिक, जळगाव आणि धुळे महपालिका ताब्यात घेण्याचे यश जसे सर्वस्वी त्यांचे होते, तसे विधानसभा निवडणुकीत खान्देशचे निर्णय हे त्यांच्या कलानेच पक्षश्रेष्ठींनी घेतले होते. उत्तर महाराष्टÑातील ४७ पैकी ३५ जागा निवडून येतील, हा अंदाज त्यांचा आत्मविश्वास दर्शविणारा होता. आता असे का घडले नाही, याचेही उत्तर त्यांनी मतदारांना द्यायला हवे.महाजन असो की, राज्यातील भाजपचे नेतृत्व असो, लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्टÑ ही आपली जहागिरी आहे, आपण म्हणू तसेच घडेल, अशा पध्दतीच्या मानसिकतेने काम आणि विचार करु लागले होते. क्रिकेटच्या मैदानावर जसे एखादा कप्तान फलंदाज आणि गोलंदाजांच्या शैलीचा विचार करुन क्षेत्ररचना करतो, अगदी त्या पध्दतीने करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी या निवडणुकीत केला. आमचे उमेदवार आम्हीच ठरवू आणि तुमचे उमेदवारदेखील पळवून नेऊ, असा हेका ठेवल्याने नव्या दमाचे, उमेदीचे उमेदवार विरोधकांनी उभे केले आणि भाजपच्या पैलवानांना भूईसपाट व्हावे लागले. सन्माननीय अपवाद वगळता इतरांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेतही काटे रचण्याचा प्रयत्न भाजपच्या अंगलट आला. ‘आयारामां’ना महत्त्व देण्याचा प्रयत्नात निष्ठावंतांवर अन्याय झाला, पण सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नेते आणि पक्षाविषयी वेगळी धारणा तयार झाली.एकनाथराव खडसे, अनिल गोटे, उदेसिंग पाडवी या विद्यमान आमदारांविषयी पक्षाने कठोर भूमिका घेतली. परिणामी शहादा वगळता भाजपने दोन हक्काच्या जागा गमावल्या. मंजुळा गावीत, डॉ.जितेंद्र ठाकूर, नागेश पाडवी हे पक्षाच्या पडत्या काळात निवडणुका लढवत होते. पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेक पर्याय तयार झाल्यावर निष्ठावंतांना डावलण्यात आले. गावीत तरीही निवडून आल्या, पण ठाकूर आणि पाडवी यांचे अपयश आणि अन्याय सामान्य कार्यकर्त्यांना वेदना देणाऱ्या ठरल्या.माझे ते माझे आणि तुझे तेही माझे ही भाजपची हाव पक्षाला खड्डयात घालणारी आहे. ही चूक भाजपने लवकर सुधारायला हवी. अन्यथा हा मुद्दा युतीमधील तणावात भर घालू शकतो. प्रभाकर सोनवणे, अमोल शिंदे, चंद्रशेखर अत्तरदे, राजवर्धन कदमबांडे, गोविंद शिरोळे यांना निवडणुकीत भाजपने केलेली मदत सेना उमेदवारांना अडचणीची ठरली. एवढे करुनही सेनेचे चार आमदार निवडून आले. हिलाल माळी आणि आमशा पाडवी हे दोन्ही कडवे शिवसैनिक पराभूत झाले. सेना हा त्रास विसरेल, असे मानण्याचे काही कारण नाही. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता चंद्रकांत सोनवणे हे आमदार आता भाजपला मतदारसंघात वरचढ राहतील.भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा त्रास झाल्याने दोनदा आमदारकी हुकलेल्या अमळनेरच्या अनिल भाईदास पाटील यांना राष्टÑवादीकडून आमदारकी मिळाली. ‘भूमिपूत्र’ या मुद्यावरुन भाजपच्या काही मंडळींनी उघड तर काहींनी छुपी मदत केली. रावेरात अनिल चौधरींना छुपी मदत, खडसे यांच्या तिकीट कापण्याचा प्रकार याचा फटका हरिभाऊ जावळे यांना बसला. संयमित प्रचार करणाºया शिरीष चौधरींना पुन्हा एकदा विधानसभेचे दार उघडले.मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटील यांना गेल्यावेळेप्रमाणे ज्ञात-अज्ञात व्यक्ती, पक्षांकडून मदत झाली आणि त्यांनी खडसे यांच्या साम्राज्याला यंदा यशस्वी धडक दिली. गेल्यावेळी शिवसेना पक्षाची उमेदवारी असतानाही अपयश मिळाले, यंदा अपक्ष उमेदवारी त्यांना सोयीची आणि फायद्याची ठरली. मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्याचा काही भाग असा मतदारसंघ असलेले खडसे यांचे प्राबल्य पाटील यांनी संपविले. विधिमंडळात केवळ खडसेच नाही तर त्यांचे वारसदारदेखील पोहोचले नाही, हे या निकालातून स्पष्ट झाले.मतदारांना कोणीही गृहित धरु नये, हा संदेश या निवडणुकीने सगळ्यांनाच दिला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव