शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ज्वालामुखीच्या तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 5:06 AM

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले.

मुंबई कशी ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहे, याचे उत्तम उदाहरण बुधवारी बीपीसीएलमधील रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या रूपाने पाहायला मिळाले. आधीच अतिरेक्यांच्या निशाण्यावर असलेल्या मुंबईकरांच्या काळजात या भयानक स्फोटाने धस्स झाले. तब्बल सहा तासांनंतरही ही आग धुमसत होती. चेंबूर भागातील बीपीसीएल, एचपीसीएल अथवा जवळील टाटा पॉवर तसेच माहुल परिसरातील औद्योगिक कंपन्यांमुळे सर्वाधिक प्रदूषण या पट्ट्यात असते. नागरी लोकवस्तीही या ठिकाणी आहे. त्यामुळे येथील रहिवासी कायम मृत्यूच्या छायेखाली वावरत असतात. बुधवारच्या आगीने याचा प्रत्यय आणून दिला. यापूर्वीदेखील लोअर परळ येथील कमला मिल, अंधेरीतल्या साकीनाका येथील फरसाण मार्टला लागलेल्या आगीत मोठी मनुष्यहानी झाली होती. अशा मोठ्या आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात आपल्याकडच्या यंत्रणा कमी पडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या यापूर्वीच्या विकास आराखड्यातही चेंबूरसह लगतचा परिसर हा ‘हेव्ही इंडस्ट्रीयल झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी दाट वस्ती असता कामा नये, याची जाणीव तज्ज्ञांनी प्रशासनाला वारंवार करून दिली आहे. असे असतानाही मुंबई महापालिकेने लगतच्या माहुल परिसरात प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. केवळ माहुलच नाही, तर चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह लगतच्या परिसरातील रहिवाशांना आधीच मूलभूत सेवासुविधांअभावी जगावे लागत आहे. माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने करीत प्रशासनाला याची जाणीवही करून दिली आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. पूर्व उपनगरातील डम्पिंगलाही सातत्याने आगी लागत असून, आगीमुळे येथील परिसरात चार ते पाच पाच दिवस धुराचे साम्राज्य राहते. मानखुर्द आणि गोवंडीमध्ये दाटीवाटीने वसलेल्या लोकवस्तीमध्ये यापूर्वी कित्येकवेळा आगी लागल्या आहेत. परिणामी, मुंबईसारखी मायानगरी सातत्याने ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. बीपीसीएलसारख्या कंपन्यांत आपत्कालीन घटनांवर मात करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज असल्या तरीदेखील येथील दुर्घटनांचा संबंध हा इतिहासात झालेल्या चुकांशी आहे. चुकीच्या पद्धतीने वसवलेली वस्ती, त्यामुळे येथील मूलभूत सेवासुविधांवर लोकसंख्येचा येणारा ताण, डम्पिंगची अपुरी क्षमता यांसारख्या अनेक समस्यांनी आधीच डोके वर काढले आहे. त्यात पुन्हा अशा आगीच्या घटना घडतात. हे दुहेरी संकट येत्या काळात अधिकच गडद होत जाईल. याचा विचार आगामी विकास आराखड्यात झाला तरच मुंबईकरांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.

टॅग्स :fireआगBPCL Mumbai Fireबीपीसीएल आग