शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:21 IST

बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमी कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराट कोहलीला तो आज्ञाधारक मुलगा होणं काही शक्य नव्हतं !

- द्वारकानाथ संझगिरी, ख्यातनाम क्रीडा समीक्षकविराट कोहलीने आता कसोटीचं नेतृत्वही सोडलं. तो आता राजा राहिला नाही, प्रजेचा भाग झालाय !- हे अपेक्षितच होतं. आपण मालिका जिंकलो असतो तर तिथल्या तिथे “ जितं मया” म्हणत  नेतृत्वाची राजवस्त्र त्याने बीसीसीआयकडे  फेकली असती आणि तो शिखरावरून निवृत्त झाला असता. पराभव झाल्यामुळे त्याने एक दिवस विचार केला आणि “ कृतार्थ मी, कृतज्ञ मी” म्हणत नेतृत्व सोडलं.त्याचं आणि बीसीसीआयचं  यापुढे पटणं कठीण होतं. बीसीसीआय  क्रिकेटपटूंच्या बाबतीत कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराटला आज्ञाधारक मुलगा होणं शक्य नव्हतं. विनोद रॉय  मंडळाचे सर्वेसर्वा असताना त्यांनी विराटचे लाड  पुरवले. अगदी त्याला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून देण्यापर्यंत.  मग जय शहा आणि गांगुली येताच मंडळाची भूमिका ताठर झाली.  ठिणग्या उडाल्या. अलीकडच्या ठिणग्या तर आग लागावी इतक्या प्रखर होत्या. “मी खरं बोलतोय की तू “हा विराट आणि गांगुलीमधला वाद चक्क चव्हाट्यावर आला. त्यात पराभव; त्यामुळे कोहलीच्या मनात डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली असेलच. पूर्वी दिग्गज पण पराभूत कर्णधार फेकले गेले होतेच. मग तो इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवणारा अजित वाडेकर असो, बेदी असो, व्यंकट असो, की वेंगसरकर! याची पूर्ण कल्पना  विराटला होती. शिवाय ड्रेसिंग रूम बदलली. तिथे आता रवी शास्त्री नव्हता. सपोर्ट स्टाफमधली त्याची खास मंडळी नव्हती. 

 नेतृत्व सोडण्याचा निर्णय ब्रँडच्या दृष्टीने थोडा कठीण असावा. कर्णधाराची ब्रँड व्हॅल्यू ही नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. हल्लीचे खेळाडू ब्रँडचा विचार आधी करतात. पण विराट अशा उंचीवर आहे, की त्याला पैशाची फार फिकीर नसावी. असे आर्थिक तोटे त्याला साधा ओरखडाही काढू शकत नाहीत. विराटचं कॅप्टन म्हणून मूल्यमापन कसं करायचं? - यशाचा निकष लावला तर भारतीय क्रिकेटमधला तो सर्वांत यशस्वी कर्णधार ठरतो! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा विक्रम त्याच्या संघाने केलाय. त्याच्या नेतृत्वाच्या टोपीमध्ये अनेक मानाचे तुरे खोवलेले आहेत, यात काही वादच नाही. एक महत्त्वाचा तुरा त्यात नाही, तो म्हणजे आयसीसी ट्रॉफी... पण  कुणाच्या करिअरमध्ये परिपूर्णता असते? ब्रॅडमनसारख्या माणसालासुद्धा १००च्या सरासरीपासून कणभर दूर राहावं लागलंच की !
विराट फलंदाजीच्या बाबतीतही सेनापती राहिला. किंबहुना नेतृत्वाच्या जबाबदारीने त्याची फलंदाजी अधिक फुलली. तो मॅच विनर फलंदाज ठरला. कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. परदेशी खेळाडूंच्या वलयाला कस्पटाप्रमाणे लेखायला सुरवात सर्वात प्रथम गांगुलीने केली होती. गांगुलीने भारतीय खेळाडूंना गोऱ्या खेळाडूंच्या नजरेला कशी नजर भिडवायची ते शिकवलं.  विराट फारच पुढे गेला. तो गोऱ्यांच्या डोळ्यात वडस होऊन वाढण्याइतपत आक्रमक झाला. इतका की ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्याकडून चार गोष्टी शिकले असते ! पण काही वेळा आक्रमकपणा, बेजाबदारपणा आणि बालिशपणा यातल्या रेषा पुसल्या जायला लागल्या. त्याचं मैदानावरचं वर्तन अधिकाधिक बेजबाबदार व्हायला लागलं. परवाच्या त्या कसोटीमध्ये ते  लांच्छनास्पदच होतं. कितीही निर्णय तुमच्या विरोधात गेले तरी ज्या पद्धतीने विराट त्या दिवशी वागला - स्टंपच्या माईकमध्ये मुद्दामहून बोलणं वगैरे- ते गैरच होतं.  त्याला त्याच्या भावना  लपवता येत नाहीत. गांगुलीच्याही चेहऱ्यावर त्याच्या भावना दिसायच्या. प्रत्येकजण काय धोनी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मैदानावर किती आणि कसं व्यक्त व्हायचं, यालाही काही मर्यादा असतात. कर्णधार म्हणून त्या पाळाव्या लागतात. डावपेचदृष्ट्या विराट धोनीसारखा धूर्त कधीही नव्हता. विशेषतः कसोटी स्तरावर डावपेचाच्या बाबतीत त्याने अनेक वेळेला अनेक चुका केल्या. काही विशेष खेळाडूंवर त्याचा लोभ होता.  एखादा त्याच्या मनातून उतरला की मग विराट कुठल्याही टोकाला जायचा. विराट चांगला कर्णधार होता,  यशस्वी कर्णधार होता.. पण तो महान कर्णधार मात्र कधीही नव्हता. - तो महान फलंदाज आहे, आणि आता नेतृत्वाचा दबाव डोक्यावरून गेल्यानंतर तो महानतेच्या आपल्या कक्षा नक्कीच रुंदावू शकतो.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSaurav Gangulyसौरभ गांगुली