शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:21 IST

बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमी कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराट कोहलीला तो आज्ञाधारक मुलगा होणं काही शक्य नव्हतं !

- द्वारकानाथ संझगिरी, ख्यातनाम क्रीडा समीक्षकविराट कोहलीने आता कसोटीचं नेतृत्वही सोडलं. तो आता राजा राहिला नाही, प्रजेचा भाग झालाय !- हे अपेक्षितच होतं. आपण मालिका जिंकलो असतो तर तिथल्या तिथे “ जितं मया” म्हणत  नेतृत्वाची राजवस्त्र त्याने बीसीसीआयकडे  फेकली असती आणि तो शिखरावरून निवृत्त झाला असता. पराभव झाल्यामुळे त्याने एक दिवस विचार केला आणि “ कृतार्थ मी, कृतज्ञ मी” म्हणत नेतृत्व सोडलं.त्याचं आणि बीसीसीआयचं  यापुढे पटणं कठीण होतं. बीसीसीआय  क्रिकेटपटूंच्या बाबतीत कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराटला आज्ञाधारक मुलगा होणं शक्य नव्हतं. विनोद रॉय  मंडळाचे सर्वेसर्वा असताना त्यांनी विराटचे लाड  पुरवले. अगदी त्याला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून देण्यापर्यंत.  मग जय शहा आणि गांगुली येताच मंडळाची भूमिका ताठर झाली.  ठिणग्या उडाल्या. अलीकडच्या ठिणग्या तर आग लागावी इतक्या प्रखर होत्या. “मी खरं बोलतोय की तू “हा विराट आणि गांगुलीमधला वाद चक्क चव्हाट्यावर आला. त्यात पराभव; त्यामुळे कोहलीच्या मनात डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली असेलच. पूर्वी दिग्गज पण पराभूत कर्णधार फेकले गेले होतेच. मग तो इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवणारा अजित वाडेकर असो, बेदी असो, व्यंकट असो, की वेंगसरकर! याची पूर्ण कल्पना  विराटला होती. शिवाय ड्रेसिंग रूम बदलली. तिथे आता रवी शास्त्री नव्हता. सपोर्ट स्टाफमधली त्याची खास मंडळी नव्हती. 

 नेतृत्व सोडण्याचा निर्णय ब्रँडच्या दृष्टीने थोडा कठीण असावा. कर्णधाराची ब्रँड व्हॅल्यू ही नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. हल्लीचे खेळाडू ब्रँडचा विचार आधी करतात. पण विराट अशा उंचीवर आहे, की त्याला पैशाची फार फिकीर नसावी. असे आर्थिक तोटे त्याला साधा ओरखडाही काढू शकत नाहीत. विराटचं कॅप्टन म्हणून मूल्यमापन कसं करायचं? - यशाचा निकष लावला तर भारतीय क्रिकेटमधला तो सर्वांत यशस्वी कर्णधार ठरतो! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा विक्रम त्याच्या संघाने केलाय. त्याच्या नेतृत्वाच्या टोपीमध्ये अनेक मानाचे तुरे खोवलेले आहेत, यात काही वादच नाही. एक महत्त्वाचा तुरा त्यात नाही, तो म्हणजे आयसीसी ट्रॉफी... पण  कुणाच्या करिअरमध्ये परिपूर्णता असते? ब्रॅडमनसारख्या माणसालासुद्धा १००च्या सरासरीपासून कणभर दूर राहावं लागलंच की !
विराट फलंदाजीच्या बाबतीतही सेनापती राहिला. किंबहुना नेतृत्वाच्या जबाबदारीने त्याची फलंदाजी अधिक फुलली. तो मॅच विनर फलंदाज ठरला. कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. परदेशी खेळाडूंच्या वलयाला कस्पटाप्रमाणे लेखायला सुरवात सर्वात प्रथम गांगुलीने केली होती. गांगुलीने भारतीय खेळाडूंना गोऱ्या खेळाडूंच्या नजरेला कशी नजर भिडवायची ते शिकवलं.  विराट फारच पुढे गेला. तो गोऱ्यांच्या डोळ्यात वडस होऊन वाढण्याइतपत आक्रमक झाला. इतका की ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्याकडून चार गोष्टी शिकले असते ! पण काही वेळा आक्रमकपणा, बेजाबदारपणा आणि बालिशपणा यातल्या रेषा पुसल्या जायला लागल्या. त्याचं मैदानावरचं वर्तन अधिकाधिक बेजबाबदार व्हायला लागलं. परवाच्या त्या कसोटीमध्ये ते  लांच्छनास्पदच होतं. कितीही निर्णय तुमच्या विरोधात गेले तरी ज्या पद्धतीने विराट त्या दिवशी वागला - स्टंपच्या माईकमध्ये मुद्दामहून बोलणं वगैरे- ते गैरच होतं.  त्याला त्याच्या भावना  लपवता येत नाहीत. गांगुलीच्याही चेहऱ्यावर त्याच्या भावना दिसायच्या. प्रत्येकजण काय धोनी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मैदानावर किती आणि कसं व्यक्त व्हायचं, यालाही काही मर्यादा असतात. कर्णधार म्हणून त्या पाळाव्या लागतात. डावपेचदृष्ट्या विराट धोनीसारखा धूर्त कधीही नव्हता. विशेषतः कसोटी स्तरावर डावपेचाच्या बाबतीत त्याने अनेक वेळेला अनेक चुका केल्या. काही विशेष खेळाडूंवर त्याचा लोभ होता.  एखादा त्याच्या मनातून उतरला की मग विराट कुठल्याही टोकाला जायचा. विराट चांगला कर्णधार होता,  यशस्वी कर्णधार होता.. पण तो महान कर्णधार मात्र कधीही नव्हता. - तो महान फलंदाज आहे, आणि आता नेतृत्वाचा दबाव डोक्यावरून गेल्यानंतर तो महानतेच्या आपल्या कक्षा नक्कीच रुंदावू शकतो.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीSaurav Gangulyसौरभ गांगुली