शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी अवघड!

By रवी ताले | Updated: January 30, 2018 00:20 IST

विदर्भाचा गड शिवसेनेसाठी तर अवघड आहेच; पण तो सर करताना भाजपाचाही चांगलाच घाम निघणार आहे. रसातळाला गेलेल्या काँग्रेससाठी मात्र पुनरागमनाची ही उत्तम संधी असणार आहे.

कुणाच्या डोळ्याची पापणी प्रथम लवते, असा एक खेळ लहान मुले खेळत असतात. गत विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेदरम्यान तोच खेळ सुरू होता. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. युतीचा पोपट कधीच मेला होता. ती बातमी कोण फोडणार, एवढाच काय तो प्रश्न होता! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी शिवसेना स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित करून, त्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकले आहे.राजकीय निरीक्षकांच्या डोक्यात वळवळत असलेल्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकले असले तरी, त्या उत्तराने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. भाजपा आणि शिवसेनेने १९८९ पासून महाराष्ट्रात युती करूनच प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. अपवाद फक्त २०१४ मधील विधानसभा निवडणुकीचा! त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवायची म्हटल्यास, १९८९ पासून ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवलीच नाही, त्या मतदारसंघांमध्ये प्रबळ उमेदवाराचा शोध घेण्यापासून, मतदारसंघाची बांधणी करण्यापर्यंतचे आव्हान, उभय पक्षांना पेलावे लागणार आहे.विदर्भापुरता विचार करायचा झाल्यास, शिवसेनेसाठी हे आव्हान तुलनात्मकरीत्या अधिक अवघड असणार आहे. त्यातही पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील वाटचाल सेनेसाठी अधिकच खडतर सिद्ध होणार आहे. लोकसभेचा रामटेक व विधानसभेचा वरोरा मतदारसंघ वगळता, सेनेचा पूर्व विदर्भात कुठेही दबदबा नाही. लोकसभेचा विचार केल्यास, पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ हे तीन मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहेत आणि तिन्ही मतदारसंघांमध्ये सेनेचा बºयापैकी वरचष्माही आहे. पूर्व विदर्भात मात्र रामटेक वगळता सेनेला कधीच यश लाभले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे १९८९ पासून २०१४ पर्यंतच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत सेनेला भाजपाची साथ होती. आता स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविताना, ताब्यातील मतदारसंघ टिकवून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलणे, सेनेसाठी सोपे असणार नाही.सेनेच्या तुलनेत भाजपासाठी विदर्भ सोपा असला तरी, एकाच वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व सेनेला अंगावर घ्यायचे असल्याने, भाजपालाही चांगलाच घाम गाळावा लागेल, हे स्पष्ट आहे. गेल्या निवडणुकीत सेना भाजपाच्या साथीला होती, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. आगामी निवडणुकीत भाजपा व सेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतील, तर काँग्रेस व राकाँची आघाडी कायम असेल. भरीस भर म्हणून भाजपाच्या काही आमदार-खासदारांचाच पक्षाविषयी भ्रमनिरास होऊ लागला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गटबाजीही मोठ्या प्रमाणात उफाळली आहे. वरून विदर्भवाद्यांची नाराजी आहेच!  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक