शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मजबूत राष्ट्र उभारणीसाठी भक्कम जनादेश वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 05:09 IST

नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर निवडून आल्यामुळे देशात हुकूमशाहीचा चंचुप्रवेश तर होत नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, पण मला चिंता वाटते आहे ती वेगळ्याच कारणासाठी.

- गुरचरण दास (राजकीय अभ्यासक)नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर निवडून आल्यामुळे देशात हुकूमशाहीचा चंचुप्रवेश तर होत नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, पण मला चिंता वाटते आहे ती वेगळ्याच कारणासाठी. मजबूत राष्ट्राचे मला भय वाटत नाही. मला भय वाटते ते दुबळ्या परिणामशून्य राजवटीचे! दुर्बल राष्ट्राच्या घटनात्मक संस्थादेखील दुबळ्या असतात. कायद्याचे दुबळे राज्य असेल, तर न्याय मिळण्यासाठी एक तप वाट पाहावी लागते. न्यायालयातील प्रलंबित खटले सव्वातीन कोटीच्या घरात जातात. दुबळे राष्ट्र दुबळ्या लोकांचे शक्तिमान लोकांकडून संरक्षण करू शकत नाही.देशातील तिघा खासदारांपैकी एका खासदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, याकडे सरकार दुर्लक्ष करते. दुबळ्या राष्ट्रामुळे जीवनात अनिश्चितता निर्माण होते आणि लोकांना सरकारविषयी विश्वास वाटेनासा होतो. अशा राष्ट्रात पोलीस, मंत्री आणि न्यायाधीश हे खरेदी केले जातात. अशा सरकारकडून ताबडतोब कृती होईल, ही अपेक्षाच केली जात नाही. त्यामुळे सुधारणांची गती मंदावते. पाच वर्षांच्या आपल्या कार्यकाळात भारताच्या पंतप्रधानांच्या मर्यादा काय असतात, याची जाणीव झाली असेल. उदारमतवादी लोकशाही राष्ट्र हे तीन खांबांवर उभे असते. प्रभावशाली नोकरशाही, कायद्याचे राज्य आणि उत्तरदायित्व. त्यातील पहिला खांब महत्त्वाचा असताना आपण तिसऱ्या खांबाचीच अधिक चिंता करतो. आपले राष्ट्र सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत गुंतलेले असल्याने उत्तरदायित्व हा खरा प्रश्नच नाही.तर सरकारकडून कामे कशी करवून घ्यायची, हा खरा प्रश्न आहे. भारतीय पंतप्रधान तसेही दुर्बल असतात. कारण खरी सत्ता ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात असते. देशाचे खरे राज्यकर्ते तेच असतात. मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदींनी जी कामगिरी गुजरातमध्ये बजावली होती, त्याच्या बळावरच ते २०१४ साली पंतप्रधान झाले होते. पंतप्रधान या नात्याने ते चमत्कार घडवून आणतील, असे लोकांना वाटले होते, पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. इंदिरा गांधीदेखील हुकूमशहा बनण्याच्या मार्गावर होत्या, पण त्यांनाही आपल्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत, याची जाणीव झाली होती.२०१४ साली नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारताचा कायापालट घडवून आणण्यासाठी मला दहा वर्षांचा अवधी हवा आहे. त्यांना आता ती संधी मिळाली आहे. आर्थिक सुधारणांपासून या परिवर्तनाची सुरुवात न होता, ती प्रशासकीय सुधारणांपासून व्हायला हवी. याबाबतीत नरेंद्र मोदींनी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचेपासून प्रेरणा घ्यायला हवी. त्यांनीही काही सुधारणा स्वत:च्या दुसºया टर्मसाठी राखून ठेवल्या होत्या, पण भारताची क्षमता वाढविणे तितकेसे सोपे नाही. कारण भारत हे सुरुवातीपासूनच दुबळे राष्ट्र राहिले आहे. याउलट चीनची स्थिती आहे. भारतात अनेक विखुरलेली संस्थाने होती, तर चीनमध्ये सुरुवातीपासून एकछत्री अंमल राहिला आहे. भारतात पूर्वी मौर्य, गुप्त, मोगल आणि ब्रिटिश या चार राजवटी होऊन गेल्या. या सर्व राजवटी चीनी राजवटीपेक्षा दुबळ्या होत्या.भारतातील परिस्थिती वेगळी आहे. येथे सर्वप्रथम कुटुंब, स्वत:ची जात आणि स्वत:चे गाव यांना प्राधान्य दिले जाते. भारतातील राजवटी दुबळ्या असल्या, तरी येथील समाज हा मजबूत होता. त्यामुळे प्रजेचे शोषण राजवटीकडून होण्याऐवजी ते विशिष्ट समाजाकडून करण्यात आले. हे शोषण रोखण्याचा प्रयत्न या देशातील संतांनी, तसेच भगवान बुद्धाने केला. भारतात सत्ता ही विकेंद्रित असल्यामुळे भारतात ७० वर्षांपूर्वी स्वायत्त लोकशाही प्रणाली अस्तित्वात येऊ शकली, तर चीनमध्ये मात्र एकाधिकारशाही रुजली. इतिहासापासून आपल्याला हा बोध मिळाला आहे की, आपल्याला मजबूत सरकार हवे आणि हे सरकार जबाबदार असण्यासाठी येथील समाजही मजबूत हवा.भारतासाठी एकाधिकारशाही योग्य नाही. आपले पंतप्रधान देशाची आणि राज्यांची प्रशासन क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टीने पुरेसे मजबूत आहेत. नरेंद्र मोदींना या निवडणुकीतून फार मोठा जनादेश मिळाला आहे. तेव्हा सुधारणा लागू करण्यासाठी त्यांना चांगली संधी आहे.

आर्थिक सुधारणा लागू करण्यापेक्षा प्रशासकीय सुधारणा लागू करणे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे, पण त्यापासून मिळणारे फायदे जास्त आहेत. ते करण्यात नरेंद्र मोदींना यश लाभले, तर ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ देण्याचे अभिवचन पूर्ण करणारे महान नेता ही त्यांची ओळख इतिहासात नोंदली जाईल. लोकांनी चांगली कामगिरी बजावली आहे. आता सरकारने चांगली कामगिरी बजावून लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करावी!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारdemocracyलोकशाही