शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2019: आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:26 IST

वैद्यकीय शिक्षणामधील मनुष्यबळ वाढविण्याच्या निधीत वाढ झालेली नाही.

- डॉ. अभिजित वैद्य(वैद्यकीय तज्ज्ञ)केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी काहीच तरतुदी नसल्यामुळे सामान्य नागरिकांची निराशा झाली आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले, तरच देशाची प्रगती होण्यास हातभार लागू शकतो. देशात डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यांच्यासाठी महाविद्यालयांची संख्या वाढविणे आवश्यक होते. ते या अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही.वैद्यकीय शिक्षणामधील मनुष्यबळ वाढविण्याच्या निधीत वाढ झालेली नाही. वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी भरीव वाढ नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाचे बजेट २०१८-१९च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार ५४ हजार ३१० कोटी रुपये होते. तर, २०१९-२०च्या अंदाजपत्रकानुसार सार्वजनिक आरोग्याचे बजेट ६२ हजार ६५९ कोटी रुपये आहे. आरोग्याच्या बजेटमध्ये १५ टक्के वाढ दिसते; पण बहुतांशी वाढ ही आयुष्मान भारत योजनेच्या विविध घटकांच्या बजेटमध्ये आहे.‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चे बजेट २,४०० कोटी रुपयांवरून (२०१८-१९चे सुधारित अंदाजपत्रक) वाढवून ते २०१९-२०च्या अंदाजपत्रकानुसार ६,४०० कोटी रुपये करण्यात आले आहे. गेल्या वर्षी नीती आयोगाने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी प्रत्येक कुटुंबाचा प्रीमियम १,०८२ रुपये असेल आणि एकूण १०,८२० कोटी रुपये खर्च येऊ शकतो, असे सांगितले होते. त्या तुलनेत ६,४०० कोटी रुपये ही रक्कम अपुरी आहे.आयुष्मान भारत योजनेचा दुसरा भाग म्हणजे हेल्थ व वेलनेस सेंटर. देशातील १ लाख उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांमध्ये सुधारणा करून त्यांना हेल्थ व वेलनेस सेंटरमध्ये परावर्तित करण्यासाठी केवळ १,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही फारच अपुरी आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एकूण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बजेटमधील कमी होणारा वाटा काळजी वाढवणारा आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये हा वाटा ५१ % होता तर २०१९-२० मध्ये कमी होऊन ४३ % झाला आहे. संकटात सापडलेली कृषी अर्थव्यवस्था, वाढत्या शेतकरी आत्महत्या या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्यसेवांचे बजेटमधील महत्त्व कमी होणे धोक्याची घंटा आहे.शहरी भागातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसाठी केवळ ९५० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.स्मार्ट सिटीचे मॉडेल हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेशी सुसंगत नाही आणि त्यामध्ये खासगी क्षेत्राला पाठिंबा देण्याचे धोरण आहे, हे बजेट पुन्हा स्पष्ट करते.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्षचअर्थसंकल्पात आरोग्य विमा योजनेवरील तरतूद वाढविण्यात आली आहे. १० कोटी लोकांना याचा लाभ मिळेल, असे म्हटले आहे. हा आकडा ५० कोटींपर्यंत पोहोचवू, असा सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात १० लाख लोकांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. विमा योजनेने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.हरियाणामध्ये बाविसावे एआयएमएस उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशात ५ लाख डॉक्टर आणि साडेसात लाख नर्सेस कमी आहेत. या तरतुदींनी हे आकडे अत्यंत नगण्य प्रमाणात वाढतील. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांच्या अद्ययावतीकरणाचा कोणताही ठोस आराखडा अर्थसंकल्पामध्ये नाही. देशात २३,५०० हजार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि लाखभर उप आरोग्य केंद्रे आहेत. ती चौपट वाढण्याची गरज आहे. सध्याची केंद्रे वाईट अवस्थेत आणि नवीन केंद्रांच्या सक्षमीकरणाची तरतूदच नाही.विमा योजनेने प्रश्न सुटणार नाहीतजीडीपीच्या १.२ टक्का रक्कम सार्वजनिक आरोग्यासाठी खर्च केली जाते. ५ टक्के रक्कम खर्च व्हावी, अशी मागणी आरोग्य सेनेतर्फे केली जात आहे. १३० कोटी लोकांच्या देशात ६०-७० टक्के लोक गरीब आहेत. अशा वेळी केवळ १.२-१.३ टक्का रक्कम खर्च होणे हास्यास्पद आहे. जोपर्यंत तरतूद वाढवली जात नाही, तोवर आरोग्यव्यवस्था सुधारणे शक्य नाही.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Healthआरोग्य