शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 01:54 IST

भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री)

मुळात मोदी सरकारच्या कालावधीत विकासदराचे आकडे किमान २.५ टक्क्यांनी फुगवले आहेत, असे खुद्द तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सप्रमाण मांडले आहे. भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीनंतर आणि आता मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर देशाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. मात्र घटलेला विकासदर, वाढती बेरोजगारी, उद्योगधंद्यातील मंदीमुळे कमी झालेले करसंकलन, नीचांकी निर्यात आणि देशांतर्गत बचतीचे कमी होत असलेले प्रमाण या आर्थिक अरिष्टांमुळे त्यांचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वत:च हतबल झालेल्या दिसल्या.पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था : आधी ‘न्यू इंडिया’, त्यानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मांडलेले ‘व्हिजन २०३०’ आणि आता पाच ट्रिलीयन डॉलर्स (५ लाख कोटी डॉलर्स) हे मोदी सरकारचे आणखी एक नवीन घोषवाक्य. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७ ट्रिलीयन डॉलर्स आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार मागील ५ वर्षांत अर्थव्यवस्थेचा सरासरी विकासदर ७.५% होता. या विकासदराने भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. आणि हेच उद्दिष्ट जर २०२४-२५ पर्यंत गाठायचे असल्यास अर्थव्यवस्थेचा विकासदर किमान १०-११% असायला पाहजे. निर्यात, देशांतर्गत उपभोग आणि बचतीचे प्रमाण झपाट्याने कमी होत असताना पाच ट्रिलीयन डॉलर्सचे स्वप्न मोदी सरकार कशाच्या आधारे दाखवत आहे?अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न, विशेषत: जीएसटीमधून अपेक्षित असलेले उत्पन्न घटत चालले आहे. परिणामी सकल उत्पन्नाशी कराचे असलेले प्रमाण ११.२ टक्क्यांवरून घसरून १०.९ टक्के आले आहे. सामान्यत: कोणत्याही प्रगत अर्थव्यवस्थेत हे प्रमाण किमान १५ टक्के किंवा त्याहून अधिक असते परंतु हे वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कोणत्याही ठोस उपाययोजना सांगितल्या नाहीत. प्रत्यक्ष करामध्ये सुधार करण्याची आणखी एक संधी सरकारने दवडली आहे.निर्गुंतवणुकीकरणाचे लक्ष्य साधण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने हातचलाखीचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सक्षम सार्वजनिक उपक्रमांना अकार्यक्षम उद्योग किंवा त्यामधील शेअर्स विकत घेण्यास सरकार भाग पाडत असून त्यामधील व्यवहाराचे पैसे तूट भरून काढण्याकरिता वापरले जात आहेत. मार्च महिन्यात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या सरकारच्याच तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात गुंतवणूक केली. याआधीही इंडियन आॅईल कॉर्पोरेशनला हिंदुस्थान पेट्रोलियमचे शेअर्स घेण्यास मोदी सरकारने निर्देश दिले होते. हा आतबट्ट्याचा व्यवहार करून शासन निर्गुंतवणुकीकरणाचे लक्ष्य पूर्ण करत असलेला दावा शुद्ध फसवणूक आहे आणि दीर्घकालीन अर्थव्यवस्थेसाठी ते अत्यंत धोकादायकआहे.‘द इकॉनॉमिस्ट’ या आर्थिक नियतकालिकात भारताच्या आर्थिक आकडेवारीवर केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. ते म्हणतात, भारत चीनसोबत एका गोष्टीत नक्कीच बरोबरी करत आहे, ते म्हणजे बोगस आकडेवारी प्रसृत करणे. या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प या शंकांचे निरसन करेल, अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण