शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 01:54 IST

भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

- पृथ्वीराज चव्हाण(माजी मुख्यमंत्री)

मुळात मोदी सरकारच्या कालावधीत विकासदराचे आकडे किमान २.५ टक्क्यांनी फुगवले आहेत, असे खुद्द तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सप्रमाण मांडले आहे. भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीनंतर आणि आता मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर देशाच्या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. मात्र घटलेला विकासदर, वाढती बेरोजगारी, उद्योगधंद्यातील मंदीमुळे कमी झालेले करसंकलन, नीचांकी निर्यात आणि देशांतर्गत बचतीचे कमी होत असलेले प्रमाण या आर्थिक अरिष्टांमुळे त्यांचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वत:च हतबल झालेल्या दिसल्या.पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था : आधी ‘न्यू इंडिया’, त्यानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मांडलेले ‘व्हिजन २०३०’ आणि आता पाच ट्रिलीयन डॉलर्स (५ लाख कोटी डॉलर्स) हे मोदी सरकारचे आणखी एक नवीन घोषवाक्य. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७ ट्रिलीयन डॉलर्स आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार मागील ५ वर्षांत अर्थव्यवस्थेचा सरासरी विकासदर ७.५% होता. या विकासदराने भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. आणि हेच उद्दिष्ट जर २०२४-२५ पर्यंत गाठायचे असल्यास अर्थव्यवस्थेचा विकासदर किमान १०-११% असायला पाहजे. निर्यात, देशांतर्गत उपभोग आणि बचतीचे प्रमाण झपाट्याने कमी होत असताना पाच ट्रिलीयन डॉलर्सचे स्वप्न मोदी सरकार कशाच्या आधारे दाखवत आहे?अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न, विशेषत: जीएसटीमधून अपेक्षित असलेले उत्पन्न घटत चालले आहे. परिणामी सकल उत्पन्नाशी कराचे असलेले प्रमाण ११.२ टक्क्यांवरून घसरून १०.९ टक्के आले आहे. सामान्यत: कोणत्याही प्रगत अर्थव्यवस्थेत हे प्रमाण किमान १५ टक्के किंवा त्याहून अधिक असते परंतु हे वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कोणत्याही ठोस उपाययोजना सांगितल्या नाहीत. प्रत्यक्ष करामध्ये सुधार करण्याची आणखी एक संधी सरकारने दवडली आहे.निर्गुंतवणुकीकरणाचे लक्ष्य साधण्यासाठी मोदी सरकारकडून सातत्याने हातचलाखीचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सक्षम सार्वजनिक उपक्रमांना अकार्यक्षम उद्योग किंवा त्यामधील शेअर्स विकत घेण्यास सरकार भाग पाडत असून त्यामधील व्यवहाराचे पैसे तूट भरून काढण्याकरिता वापरले जात आहेत. मार्च महिन्यात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन या सरकारच्याच तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात गुंतवणूक केली. याआधीही इंडियन आॅईल कॉर्पोरेशनला हिंदुस्थान पेट्रोलियमचे शेअर्स घेण्यास मोदी सरकारने निर्देश दिले होते. हा आतबट्ट्याचा व्यवहार करून शासन निर्गुंतवणुकीकरणाचे लक्ष्य पूर्ण करत असलेला दावा शुद्ध फसवणूक आहे आणि दीर्घकालीन अर्थव्यवस्थेसाठी ते अत्यंत धोकादायकआहे.‘द इकॉनॉमिस्ट’ या आर्थिक नियतकालिकात भारताच्या आर्थिक आकडेवारीवर केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. ते म्हणतात, भारत चीनसोबत एका गोष्टीत नक्कीच बरोबरी करत आहे, ते म्हणजे बोगस आकडेवारी प्रसृत करणे. या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प या शंकांचे निरसन करेल, अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण