शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

बेरोजगारीचा समंध

By admin | Updated: April 11, 2016 01:53 IST

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल, अशी आशा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवा वर्गाला वाटली होती; परंतु नवे सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन वर्षे उलटल्यानंतर, रोजगार निर्मितीच्या बाबतीत परिस्थिती आणखी बिकट झाली असल्याचे चित्र दिसत आहे. देशात प्रत्येक वर्षी कोट्यवधी तरुण बेरोजगारांच्या फौजेत दाखल होत असतात आणि सरकारी, सार्वजनिक वा खासगी या तीनपैकी एकाही क्षेत्राकडे त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत. ‘लेबर ब्युरो’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१५ मधील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत, अवघ्या १.३४ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आणि हा २००९ पासूनचा नीचांक आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण तर सातत्याने घटतच आहे. देशात २०००-०१ मध्ये १९.१३ दशलक्ष सरकारी नोकऱ्या होत्या. हा आकडा २०११-१२ मध्ये १७.६० दशलक्षापर्यंत खाली गेला. त्यामुळे खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होणे गरजेचे आहे; परंतु त्या क्षेत्रानेही निराशाच केली आहे. पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊन रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा होती. ‘मेक इन इंडिया’मुळे गत १८ महिन्यांत थेट विदेशी गुंतवणुकीत तब्बल ३९ टक्के वाढ झाली असली, तरी त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेला स्वयंचलित यंत्रांचा व यंत्रमानवांचा वापर त्यासाठी कारणीभूत आहे. एकीकडे सरकारी, सार्वजनिक व खासगी क्षेत्राची ही गत असताना, दुसरीकडे कृषी क्षेत्राची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. मुळात ग्रामीण भागातील तब्बल ५५ टक्के कुटुंबांकडे शेतीच नाही. त्यामुळे हा वर्ग मिळेल ते अंगमेहनतीचे काम करून आला दिवस कंठत असतो. अत्यल्प व अल्प भूधारकांची स्थितीही काही फार वेगळी नाही. त्यातच मध्यम धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही अस्मानी व सुलतानी संकटे सातत्याने नाडत आहेत. त्यामुळे विदर्भातील अनेक गावांमध्ये तर येत्या खरीप हंगामात शेती न करता मोलमजुरी करून पोट भरण्याचा निर्णय शेतकरी घेऊ लागला आहे. या ठिणगीने वणव्याचे स्वरूप घेतल्यास बेरोजगारांच्या फौजेत तर भर पडणार आहेच; पण मजुरांच्या मागणीपेक्षा संख्या वाढल्याने मजुरीचे दर घसरून परिस्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका आहे. थोडक्यात, आगामी काळात, बेरोजगारीचा समंध मोकाट सुटण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.