शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

बेरोजगारीचा समंध

By admin | Updated: April 11, 2016 01:53 IST

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल, अशी आशा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवा वर्गाला वाटली होती; परंतु नवे सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन वर्षे उलटल्यानंतर, रोजगार निर्मितीच्या बाबतीत परिस्थिती आणखी बिकट झाली असल्याचे चित्र दिसत आहे. देशात प्रत्येक वर्षी कोट्यवधी तरुण बेरोजगारांच्या फौजेत दाखल होत असतात आणि सरकारी, सार्वजनिक वा खासगी या तीनपैकी एकाही क्षेत्राकडे त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत. ‘लेबर ब्युरो’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१५ मधील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत, अवघ्या १.३४ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आणि हा २००९ पासूनचा नीचांक आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण तर सातत्याने घटतच आहे. देशात २०००-०१ मध्ये १९.१३ दशलक्ष सरकारी नोकऱ्या होत्या. हा आकडा २०११-१२ मध्ये १७.६० दशलक्षापर्यंत खाली गेला. त्यामुळे खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होणे गरजेचे आहे; परंतु त्या क्षेत्रानेही निराशाच केली आहे. पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊन रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा होती. ‘मेक इन इंडिया’मुळे गत १८ महिन्यांत थेट विदेशी गुंतवणुकीत तब्बल ३९ टक्के वाढ झाली असली, तरी त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेला स्वयंचलित यंत्रांचा व यंत्रमानवांचा वापर त्यासाठी कारणीभूत आहे. एकीकडे सरकारी, सार्वजनिक व खासगी क्षेत्राची ही गत असताना, दुसरीकडे कृषी क्षेत्राची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. मुळात ग्रामीण भागातील तब्बल ५५ टक्के कुटुंबांकडे शेतीच नाही. त्यामुळे हा वर्ग मिळेल ते अंगमेहनतीचे काम करून आला दिवस कंठत असतो. अत्यल्प व अल्प भूधारकांची स्थितीही काही फार वेगळी नाही. त्यातच मध्यम धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही अस्मानी व सुलतानी संकटे सातत्याने नाडत आहेत. त्यामुळे विदर्भातील अनेक गावांमध्ये तर येत्या खरीप हंगामात शेती न करता मोलमजुरी करून पोट भरण्याचा निर्णय शेतकरी घेऊ लागला आहे. या ठिणगीने वणव्याचे स्वरूप घेतल्यास बेरोजगारांच्या फौजेत तर भर पडणार आहेच; पण मजुरांच्या मागणीपेक्षा संख्या वाढल्याने मजुरीचे दर घसरून परिस्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका आहे. थोडक्यात, आगामी काळात, बेरोजगारीचा समंध मोकाट सुटण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.