शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

बेरोजगारीचा समंध

By admin | Updated: April 11, 2016 01:53 IST

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल

सुमारे दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाला केंद्रात सत्तारूढ करण्यात तरुणाईचा मोठा हातभार लागला होता. नवे सरकार नवी धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करेल, अशी आशा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवा वर्गाला वाटली होती; परंतु नवे सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन वर्षे उलटल्यानंतर, रोजगार निर्मितीच्या बाबतीत परिस्थिती आणखी बिकट झाली असल्याचे चित्र दिसत आहे. देशात प्रत्येक वर्षी कोट्यवधी तरुण बेरोजगारांच्या फौजेत दाखल होत असतात आणि सरकारी, सार्वजनिक वा खासगी या तीनपैकी एकाही क्षेत्राकडे त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत. ‘लेबर ब्युरो’ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०१५ मधील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत, अवघ्या १.३४ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आणि हा २००९ पासूनचा नीचांक आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण तर सातत्याने घटतच आहे. देशात २०००-०१ मध्ये १९.१३ दशलक्ष सरकारी नोकऱ्या होत्या. हा आकडा २०११-१२ मध्ये १७.६० दशलक्षापर्यंत खाली गेला. त्यामुळे खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होणे गरजेचे आहे; परंतु त्या क्षेत्रानेही निराशाच केली आहे. पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊन रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा होती. ‘मेक इन इंडिया’मुळे गत १८ महिन्यांत थेट विदेशी गुंतवणुकीत तब्बल ३९ टक्के वाढ झाली असली, तरी त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेला स्वयंचलित यंत्रांचा व यंत्रमानवांचा वापर त्यासाठी कारणीभूत आहे. एकीकडे सरकारी, सार्वजनिक व खासगी क्षेत्राची ही गत असताना, दुसरीकडे कृषी क्षेत्राची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. मुळात ग्रामीण भागातील तब्बल ५५ टक्के कुटुंबांकडे शेतीच नाही. त्यामुळे हा वर्ग मिळेल ते अंगमेहनतीचे काम करून आला दिवस कंठत असतो. अत्यल्प व अल्प भूधारकांची स्थितीही काही फार वेगळी नाही. त्यातच मध्यम धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही अस्मानी व सुलतानी संकटे सातत्याने नाडत आहेत. त्यामुळे विदर्भातील अनेक गावांमध्ये तर येत्या खरीप हंगामात शेती न करता मोलमजुरी करून पोट भरण्याचा निर्णय शेतकरी घेऊ लागला आहे. या ठिणगीने वणव्याचे स्वरूप घेतल्यास बेरोजगारांच्या फौजेत तर भर पडणार आहेच; पण मजुरांच्या मागणीपेक्षा संख्या वाढल्याने मजुरीचे दर घसरून परिस्थिती अधिकच गंभीर होण्याचा धोका आहे. थोडक्यात, आगामी काळात, बेरोजगारीचा समंध मोकाट सुटण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.