शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात...पण स्वप्नांचे काजवे हाती लागतात, फक्त ‘विश्वास’ हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 05:56 IST

उदय लळीत भारताचे निवृत्त सरन्यायाधीश कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, ...

उदय लळीतभारताचे निवृत्त सरन्यायाधीश

कित्येकजण अडथळ्यांना घाबरतात, निम्म्या वाटेत थकून मागे वळतात.ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये, एवढा प्रयत्न तारुण्यात कायम हवा!

माझा जन्म सोलापूरचा. माझं शालेय शिक्षणही सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत झालं. वकिलीच्या व्यवसायात मी जवळजवळ ३९ वर्ष आहे. मी कामाला सुरुवात केली तेव्हा वकिलांनी कसं असावं किंवा कसं असू नये, असे उपदेश मलाही मिळाले होते. त्यातलं जे मला पटलं, ते मी जरुर घेतलं. व्यक्तिगत आणि व्यावसायिक मूल्यं जीवापाड जपली. आपण सर्वच काही एक मूल्यांची शिदोरी घेऊन आपापली वाटचाल करीत असतो. त्या वाटचालीमध्ये  अडथळे येतात. ठेचा लागतात. आपण सावरतो, पुन्हा एकवार हिमतीने उठून चालू लागतो, अखेर मुक्कामाचं ठिकाण दिसू लागलं, की मागे वळून पाहतो तेव्हा अचानक वाटतं, अरे? इतके पुढे आलो आपण?.. मग वाटतं, हे कसं साधलं आपल्याला? थोडेसे परिश्रम,  ईश्वरी आशीर्वाद किंवा वडीलधाऱ्यांचा वारसा असं खूप काही असतं आपल्या यशात! मीही कुणी वेगळा नाही. मी खूप मोठं काहीतरी केलंय, वेगळं केलंय असं काही नाही.

प्रत्येकजण तेच करतो. उत्कटता थोडीशी कमी-जास्त असते, एवढंच!...  माझ्यामध्ये ती थोडी जास्त असेल! कोणत्याही व्यवसायात पुढे जाण्यासाठी जिद्द लागते. त्या जिद्दीला हत्यार बनवणं आणि त्यातून वाटचाल करीत पुढे जात राहणं, हीच खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मी तेवढंच करीत आलो.. ध्येय सांभाळून पुढं जाणं हे आपल्यातला प्रत्येकजण करीत राहिला, तर सगळंच काही सुखकर होईल... पण ते दुर्दैवाने होत नाही. कित्येक जण निम्म्या वाटेत थकून मागे वळतात. काही लोक अडथळ्यांना घाबरतात. काही लोक वाटेत लागलेल्या ठेचांनी बेजार होतात. असे लोक मार्ग सोडून जातात. ही वेळ कधीच आपल्यावर येऊ नये हे ध्येय मनाशी बाळगून निवडलेल्या रस्त्यावरून पुढे जात राहणं पुरेसं असतं. भारत हा तरुणांचा तरुण देश आहे. आपल्या लोकसंख्येत ३० वर्षांच्या खालच्या युवकांची संख्या जवळजवळ निम्मी आहे. इथून पुढे या तरुण  पिढीच्या हातातच देशाची सूत्रं  असतील. अशा युवकांना थोडी ध्येयासक्ती पाहिजे! तरुण वयात कुठेतरी दूर  काजवे चमकल्यासारखी ‘स्वप्नं’  दिसतात; पण ती दूर नसतात... तुमच्या कवेतच  असतात ती, आवाक्यात येऊ शकतात; कमी पडतो तो स्वत:वरचा विश्वास! मी ज्या जमान्यात तरुण वकील म्हणून काम सुरू केलं, तेव्हा आमच्यासाठी ग्रंथालय हाच एकमेव पर्याय होता. अभ्यास करायचा, संदर्भ शोधायचे म्हणजे ग्रंथालयात जायचं! आज सगळ्यांसाठी प्रचंड साधनं उपलब्ध आहेत. मी ज्युनिअर असताना सिनिअर वकील युक्तिवाद करीत असतील, तर आम्ही आमची कामं सोडून कोर्टात त्या वकिलांचा युक्तिवाद ऐकायला जायचो. काल यू-ट्यूबवर पाहत असताना लक्षात आलं, की खुद्द फली नरिमन यांचा संविधान पीठासमोरील युक्तिवादही मला तिथे  एका क्लिकसरशी ऐकता येतो. ही संदर्भांची श्रीमंती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्ही कधीही उघडून पाहू शकता. तुमच्या मागच्या दोन पिढ्यांच्या तुलनेत इतके फायदे असताना जर त्याचा उपयोग नाही केला तर कदाचित भविष्यच तुम्हाला म्हणेल की, मी तुला दिलं होतं उदंड हातांनी, पण कर्म नव्हतं! - ही परिस्थिती कोणत्याही वकिलावर, कुणावरही येऊ नये. मी जेव्हा वकील झालो, तेव्हा एका वरिष्ठांनी मला सांगितलं होतं, सरस्वतीची पूजा करीत राहा; लक्ष्मी सदैव तुझ्या मागे येत राहील!- यात वकिली व्यवसायाचं सार आहे. या व्यवसायाने मला सगळं काही दिलं. नाव दिलं, कीर्ती दिली. मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. पैसा  जितका हवा होता, त्यापेक्षा जास्त मिळाला... आणि सगळ्यात शेवटी एक संधी मिळाली... आणखी काय हवं असतं माणसाला?(सोमवारी सेवानिवृत्त झालेले सरन्यायाधीश उदय लळीत यांनी सोलापूर येथे वकील परिषदेत केलेल्या भाषणाचा संपादित सारांश) शब्दांकन : समीर इनामदार, लोकमत, सोलापूर

टॅग्स :Uday Lalitउदय लळीत