शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सच्चे कॉँग्रेसी, संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरी असलेले राजकारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 05:16 IST

समकालीन भारतीय राजकारणात प्रणव मुखर्जी यांची ओळख जननेता यापेक्षा मुत्सद्दी अशीच होती. संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर दिल्लीच्या राजकारणात त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली.

- गौतम लाहिरीज्येष्ठ पत्रकारप्रणव मुखर्जी यांची जीवनगाथा म्हणजे यश-अपयशाच्या हिंदोळ्यावरील जणू एक शर्यतच होती. एक सामान्य नागरिकही राजकीय स्वप्न पाहून सर्वोच्च पदापर्यंत प्रवास करू शकतो, हे प्रणव मुखर्जी यांनी दाखवून दिले. त्यांच्या या कामगिरीसाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.समकालीन भारतीय राजकारणात प्रणव मुखर्जी यांची ओळख जननेता यापेक्षा मुत्सद्दी अशीच होती. संसदीय कौशल्य आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर दिल्लीच्या राजकारणात त्यांनी स्वत:ची ताकद निर्माण केली. परंतु,त्यांना अनेकदा पक्षश्रेष्ठींच्या गैरसमजाचे बळीही व्हावे लागले. प्रणव मुखर्जी हे पक्के बंगाली होते. केवळ मनाने नव्हे तर पेहरावातही त्यांनी आपले बंगालीपण जपले होते. अखिल भारतीय कॉँग्रेस समितीच्या बैठकीत सच्च्या कॉँग्रेसजनाप्रमाणे ते नेहमी गांधी टोपी परिधान करत. मात्र, कार्यालयात पोहोचल्यावर ते आपला नेहमीचा बंद गळ्याचा सूट आणि बूट परिधान करत. सोन्याची साखळी असलेले एक घड्याळ त्यांच्या खिशाला नेहमीच लटकलेले असायचे. वडील कामदा किंकर मुखर्जी यांनी ते भेट दिले होते.प्रणव मुखर्जी यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणजे बांगलादेशचा मुक्ती लढा. पूर्व पाकिस्तानमधून बंगाली नागरिकांचे होत असलेले स्थलांतर पाहून त्यांचे मन हेलावून गेले. १७ जून १९७१ रोजी खासदार म्हणून प्रणव मुखर्जी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे विधेयक सादर केले. त्यांच्या सडेतोड युक्तिवादामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीही प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळेच युरोपीयन देशांमध्ये बांगलादेशाबाबतची भूमिका मांडण्यासाठी इंदिरा गांधींनी प्रणबदांनाच पाठविले. प्रणव मुखर्जी यांचे हेच योगदान लक्षात ठेवून ढाका येथील भेटीत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या हस्ते बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येने प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय आयुष्यात उलथापालथ घडविली. मुखर्जी यांचा पंतप्रधानपदावर डोळा असल्याचा गैरसमज पसरविण्यात आला. त्यामुळे राजीव गांधी यांच्या नजरेतून ते काही काळ उतरले होते. परंतु, त्याच राजीव गांधी यांनी पुन्हा एकदा प्रणव मुुखर्जी यांना सक्रिय राजकारणात आणले. एवढेच नव्हे तर आपले सल्लागार म्हणून नेमले. पक्षश्रेष्ठींचा पूर्ण विश्वास संपादन करूनही त्याचा राजकीय लाभ मात्र मुखर्जी यांना झाला नाही. २००४ साली कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये पंतप्रधानपदी आपलीच निवड होईल, याची प्रणव मुखर्जी यांना पूर्ण खात्री होती. पण हे घडले नाही. २००७ मध्ये राष्टÑपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते. परंतु, राजकीय अपरिहार्यतेमुळे कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्याला मान्यता दिली नाही. पुढे २०१२ सालीही त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राष्टÑपती करून पंतप्रधानपदाची जबाबदारी मुखर्जी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, हे देखील घडू शकले नाही. हीच वेदना मनात ठेवून त्यांनी भारताचे १३ वे राष्टÑपतिपद स्वीकारले आणि सक्रिय राजकारणातून निवृत्तीघेतली. सच्चे कॉँग्रेसी असलेल्या प्रणव मुखर्जी यांच्या मनात कायमच कॉँग्रेसबद्दल प्रेम होते. मला आठवते, एखाद्या पोटनिवडणुकीतही कॉँग्रेसचा विजय झाला तर ते साजरा करायचे. म्हणायचे आम्ही जिंकलो आहोत. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रपती असल्याने ते उघडपणे हे म्हणू शकत नसत, एवढेच!त्यांना नम्र श्रध्दांजली!

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण