शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

झाडे, रंग आणि रेषा...; सुंदर अनुभवाच्या आठवणींचा पूर्वार्ध...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 5:38 AM

सामान्यत: असे कॅम्प तीन ते आठ-दहा दिवसांचे असतात.

- साधना बहुलकरआर्ट कॅम्प किंवा आर्टिस्ट कॅम्पची मूळ कल्पना म्हणजे संयोजकांनी निवडलेले वेगवेगळ्या ठिकाणचे चित्रकार एखाद्या जागी एकत्रितपणे जमून राहातात, परस्परांशी संवाद करतात आणि आपापली चित्रे काढतात. यातून चित्रकार मंडळींचा एकमेकांशी प्रत्यक्ष परिचय होतो, एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धती बघण्याची दुर्मीळ संधी मिळते. एकत्रित काम करण्याचा आनंद मिळतो. कलानिर्मिती मागच्या एकमेकांच्या प्रेरणा, त्यामागची भूमिका, दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी खेळीमेळीचे अनौपचारिक वातावरण लागते. विचारांची देवघेव होते. आठवणींना उजाळा मिळतो.

सामान्यत: असे कॅम्प तीन ते आठ-दहा दिवसांचे असतात. त्यासाठी सर्वसाधारणपणे कलाक्षेत्रात थोडे फार नाव झालेल्यांची निवड होते. त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च करून मानधनही दिले जाते. आयोजकांच्या शक्यतेनुसार, क्षमतेनुसार कॅम्पचे ठिकाण ठरते. अर्थात असे काही उपक्रम होण्यामागे लहानमोठी आर्थिक उलाढालही असते. कॅम्पच्या कालावधीत ठरवलेल्या आकाराची एक किंवा दोन चित्रे काढून ती आयोजकांना दिली जातात. काही वेळा त्यांचे प्रदर्शन भरविले जाते. प्रदर्शनात किंवा एरवीही ती चित्रे विकली जातात. काहीवेळा खासगी संग्रहासाठी ती जतन केली जातात किंवा कधी भेटीदाखल म्हणूनही दिली जातात.

एकुणातच वेगवेगळ्या बाजूंनी आर्टिस्ट कॅम्प हा उपक्रम कलावंत आणि रसिकांच्यात वेगवेगळ्या प्रकारे आदान-प्रदान घडवीत असतो.असे आर्टिस्ट कॅम्प म्हणजे एक आगळा-वेगळा माहोल असतो. रंगीबेरंगी तर तो असतोच; पण त्याचबरोबर एकमेकांना सहज जमेल तसे जाणून घेण्याचा निखळ आनंद देणारा असतो. चित्रकलेत वास्तववादी, अमूर्त (अ‍ॅब्स्ट्रॅक्ट), पारंपरिक, आधुनिक, अलंकारिक (डेकोरेटिव्ह), विरूपीकरणात्मक (डिस्ट्रॉर्शन) अशा अनेक प्रकारे कलानिर्मिती होत असते. त्यात आपापली वैशिष्ट्ये जपत वेगवेगळ्या पद्धतीने कलावंत आपली अभिव्यक्ती करीत असतात. साहजिकच त्यांच्या अस्मिता, मत-मतांतरेही असतात. त्यामुळे मग गट आणि गटबाजीही अपरिहार्य असते. पण आर्टिस्ट कॅम्पच्या दिवसात मात्र हे सर्व मागे ठेवून कलाकार तेथे एकत्र येतात. आनंदात राहतात. काम आणि मजा दोन्ही मनापासून करतात.

दिनांक ३० सप्टेंबर २०१९नागपूरच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीने ताडोबा अभयारण्यात आयोजित केलेल्या आर्टिस्ट कॅम्पला निघायचे म्हणून मुंबईतील त्या दिवशीची सकाळ मला वेगळी उत्साही वाटत होती. ठरल्याप्रमाणे सकाळी ९ ला घर सोडले. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच या कॅम्पचे क्यूरेटर विनोद शर्मांचा फोन, ‘अरे भाई ! कहा हो तुम दोनो, मै तो कबका पहूच गया हूँ। अपने गेट पर तुम्हारा इंतजार कर रहा हूँ।’- खरे म्हणजे दचकलोच आम्ही!घाईघाईने विमानतळात शिरून ठरल्या गेटवर पोहचलो, तरी आमच्या या ‘कॅम्प क्यूरेटर’ मित्राचा पत्ता नाही. नंतर बऱ्याच वेळानी ते आले. म्हणजे मघाचा फोन व त्यानंतरचा ‘इंतजार’ ही त्यांनी घेतलेली फिरकी होती ! एकेक करीत कलाकार मंडळी विमानतळावर जमत गेली. सोबत पेंटिंग केलेल्या कॅनव्हासच्या लांबट गुंडाळ्या हातात असल्याने परिचय नसला तरी विदर्भातील ताडोबा आर्टिस्ट कॅम्पवासी सहजपणे ओळखता येत होते.नागपूरला पोहचलो आणि आम्हाला घ्यायला आलेल्या बसने थेट दर्डा कुटुंबीयांच्या घरी गेलो. विजय दर्डा यांचा स्नेहशील पाहुणचार मनसोक्त घेऊन तेथून मग थेट ताडोबाकडे प्रयाण.करकरीत तिन्हीसांज संपून अंधार दाटू लागला तरी ताडोबा जवळ येत असल्याची चाहूल लागत नव्हती. अखेर ‘ईराई रिट्रिट’ या मुक्कामाच्या जागी पोहचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ-नऊ वाजले होते. बसमधून उतरताच हिरवाईच्या ताज्या स्वच्छ हवेचा गंध पावलागणिक जाणवत गेला. ‘ईराई’च्या स्वागतकक्षात त्यांच्या वतीने आणि दर्डा कुटुंबीयांच्या वतीने कलाकार, अतिथींच्या जथ्थ्याचे उत्साहाने आणि अगत्याने पारंपरिक स्वागत झाले.सगळे फ्रेश होऊन अर्ध्या तासात परतले, तोवर डायनिंग हॉलबाहेरची प्रशस्त गॅलरी दीपदानांनी लखलखत होती. बघता बघता अड्डे पडले, आणि ओळखपाळख करून घेत, जुन्या परिचयाचे दाखले शोधत गप्पा सुरू झाल्या.मध्यरात्र उलटली, तरी विषय संपले नाहीत, गप्पा सरल्या नाहीत !शेवटी दुसºया दिवशी सकाळी होणाºया उद्घाटनाची वेळ पुढे ढकलून साडेअकरा करण्यात आल्याची घोषणा झाली; मग तर सगळेच आणखी निवांत झाले!

१ आॅक्टोबर २०१९.आर्टिस्ट कॅम्पचे आणि चित्रकारांनी बरोबर आणलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन एका छोटेखानी, देखण्या हॉलमध्ये झाले. अमित गोनाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर जागून गुंडाळलेली चित्रे उलगडून लाकडी चौकटीवर ताणून सज्ज केली होती. या कॅम्पसाठी पॅरिस, आसाम, हैदराबाद, गुजरात, मुंबई, पुणे येथून आलेल्या चित्रकारांचे विजय दर्डांनी औपचारिक; पण मनमोकळे स्वागत केले. त्यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केलेला आशावाद मनाला स्पर्शून जाणारा होता. दर्डा म्हणाले, ‘जातिभेद आणि कट्टर धार्मिकतेने समाजात निर्माण केलेल्या भिंती उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य कलेमध्ये आहे. हे कधी ना कधी घडेल आणि विभागलेल्या समाजाला एक एकसंध अंत:स्वर मिळेल.’परदेश आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या वीस कलाकारांची आजूबाजूला लावलेली चित्रे त्यांच्या कलावैशिष्ट्यांची ओळख करून देत देशातील कलेचे वैविध्य व्यक्त करत होती. कलाकारांच्या मनात पुढील चार दिवसांत काढल्या जाणाºया चित्रांचे बेत रचले जात होते. एकमेकांच्या निर्मिती प्रक्रियेची उत्सुकताही होती.दुपारच्या भोजनानंतर कलाकार मंडळी आपापल्या कॅन्व्हाससमोर सरसावली होती. त्याबद्दल पुढच्या रविवारी...आर्ट कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ चित्रकारांशी झालेला संवाद

अमूर्ताचा शोधहलकेहलके का असेना, लोकांना अमूर्त चित्र-शैलीतले मर्म आता उलगडू लागले आहे, असे मला वाटते आणि त्याचा आनंदही होतो. हे श्रेय अर्थातच प्रयोगशील अशा नव्या दमाच्या चित्रकारांचे आहे, हे नि:संशय ! तसे पाहाता अमूर्ताचा शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया आहे; पण दृश्य माध्यमात मात्र अमूर्ताप्रति काहीशी अप्रीती होती, अजूनही आहे. हे चित्र लवकर बदलेल, अशी मला आशा वाटते. मी जयपूरला जन्मले, पुढे फ्रान्समध्ये स्थायिक झाले, तरी माझा भाऊ पवनार आश्रमात मुक्कामाला असतो.. त्यामुळे विदर्भ हे माझे माहेर आहे, असेच मी मानते. या कॅम्पला येणे हे माझ्यासाठी माहेरपणाच्या कौतुकासारखेच आहे!- सुजाता बजाज, पॅरिस‘सह-अस्तित्व’समाजमनामध्ये काहीही व्यापक बदल घडवण्याचा मार्ग चित्रकलेतून- खरे तर कोणत्याही कलेतून जातो, असे माझे मत आणि अनुभवही आहे. कला माणसाला भावनिक स्तरावर स्पर्शून जाते आणि त्याला विचारालाही उद्युक्त करते. असे ‘दोन्ही’ स्तरावरचे आवाहन दुर्मीळ म्हणूनच महत्त्वाचे ! म्हणूनच चित्रकाराच्या कामामागे निश्चित प्रेरणा असली पाहिजे, असे मी मानतो. मी स्वत: सध्या ‘सह-अस्तित्व’ या संकल्पनेभोवती काम करतो आहे. माणूस आणि निसर्ग यांच्या सह-अस्तित्वाच्या शक्यता रंगरेषांमधून शोधत जाणे हा मोठा विलक्षण रोमांचक अनुभव आहे.- दीपक शिंदे, मुंबईसच्चा अंत:स्वरमाणसाला उन्नयनाच्या दिशेने नेणारा ‘समग्र शिक्षणा’चा मार्ग कलानिर्मितीच्या वळणावरूनच जातो, गेला पाहिजे असे मला वाटते. ज्या समाजात कला आणि कलावंताला मान असतो, त्या समाजाचा अंत:स्वर सच्चा असतो, असे खुशाल समजून चालावे. नव्या चित्रकारांना मोठ्या संधी आहेत, तसेच त्यांच्या मार्गावर मोहही मोठे आहेत आणि संयम नावाच्या गोष्टीशी त्यांचा फारसा परिचय नाही. हे बदलेल, तर बरे.- विजेंदर शर्मा, दिल्लीआर्ट कॅम्पची संस्कृतीजागतिकीकरण आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टींमुळे नव्या पिढीतल्या चित्रकारांना खºया अर्थाने जगाची दारे खुली झाली. पण त्यातन उघड्या दारांमधून अनेक गैर गोष्टीही आत आल्या. त्यामध्ये उधार-उसनवारीची सवय, ही सर्वात घातक गोष्ट इथल्या वातावरणात मुरली. कलेच्या पोषणासाठी हे उचित नव्हे. माध्यमांचा प्रसार वाढला आहे हे खरे; पण त्यातून कलासमीक्षा हद्दपार झाली आहे, याचेही वैषम्य वाटते ! या वातावरणात आर्ट कॅम्पची संस्कृती विकसित होणे उल्हसित करणारे आहे.- सुहास बहुलकर, मुंबई

टॅग्स :paintingचित्रकला