शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

वृक्षवल्ली आम्हा सोयरी कंत्राटांची जंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:49 IST

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें असे म्हणण्याऐवजी ह्यआम्हा सोयरी कंत्राटाची जंगले  हाच  सुविचार  ठरू लागला आहे. पर्यावरणरक्षणाचा संदेश देणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा हा अभंग. वृक्षवल्ली, वन्यजीव हे आपले सोयरे आहेत. त्यांचे अस्तित्व टिकले तरच आपण टिकून राहू, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, सुविचार हे भिंतीवर टांगण्यासाठीच असतात, असे आपला समाज नेहमी जगत आला.

- विजय बाविस्कर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेंपक्षीही सुस्वरें। आळविती।।पर्यावरणरक्षणाचा संदेश देणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा हा अभंग. वृक्षवल्ली, वन्यजीव हे आपले सोयरे आहेत. त्यांचे अस्तित्व टिकले तरच आपण टिकून राहू, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, सुविचार हे भिंतीवर टांगण्यासाठीच असतात, असे आपला समाज नेहमी जगत आला. त्यामुळे पर्यावरण दिन, वृक्षारोपण दिनाशिवाय आपल्याला हिरवाईचे महत्त्व कळत नाही. वृक्षतोडीमुळे गावे तर ओसाड होऊ लागली आहेतच; पण त्याहीपेक्षा शहरांची अवस्था भीषण आहे. टोलेजंग इमारती बांधताना झाडांची कत्तल झाली. रस्त्यांची कामे करताना वृक्षांवर कुºहाड चालवली गेली. यामुळे शहरांमध्ये प्रदूषण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीत बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना वृक्षतोडीला परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्षलागवड केली आहे का, याचे पाच वर्षांचे आॅडिट केले जाणार आहे, असे स्पष्ट केले. कोणतेही झाड तोडताना संबंधिताने त्याबदल्यात तीन झाडे लावणे बंधनकारक असते. हा निकष न पाळणाºयांवर कारवाईही केली जाईल. शहरांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत योग्य निर्णय आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होणार का, हा प्रश्न आहे. कोणत्याही शहरातील वृक्षतोड करण्याची परवानगी देण्याचा अधिकार हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला असतो. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पंचवार्षिक सभागृहाची मुदत संपताच वृक्ष प्राधिकरण समितीची मुदतही संपुष्टात येते. नव्या पंचवार्षिकमधील पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर एका महिन्याच्या आतच नवी वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे आवश्यक असते. नगरसेवकांपैकी किमान ५ ते कमाल १५ सदस्य नियुक्त करावेत, असे महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंवर्धन व जतन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशासकीय सदस्य म्हणून सात जणांची नियुक्ती करता येते. त्यांत विज्ञान शाखेच्या पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे, असे बंधन आहे; पण कोणत्याही शहरात हे निकष पाळले जात नाहीत. त्यामध्ये राजकीय सोय लावली जाते. सोय याचा अर्थ राजकारण्यांकडून लाभ, असा होत असल्याने वृक्ष प्राधिकरण समिती हे लाभाचे पद बनून जाते. त्यामुळे प्रत्यक्षात कागदावर काहीही रंगवले, तरी शहरात मात्र हिरवाई दिसत नाही. वृक्षतोडीचे ९० टक्के प्रस्ताव हे बांधकाम व्यावसायिकांकडून येतात. एखाद्याच्या घराला खरोखरच अडथळा ठरणारी फांदी किंवा रस्त्यावरील धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी अनेक सायास पडतात. मात्र, एखाद्या भागातील संपूर्ण वृक्षराजी एका रात्रीत नष्ट केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही, हे वास्तव आहे. अनेकदा तर सरकारी प्रकल्पांसाठीही वृक्षांच्या कत्तली होतात. त्याला जनहिताचा मुलामा दिला जातो. त्यामुळे त्याला विरोध करणारे विकासविरोधी ठरविले जातात. पुण्यासह अनेक शहरांत वृक्षतोडीविरोधात जनआंदोलने उभी राहिली; पण त्यांना यश मिळाले नाही. कारण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें असे म्हणण्याऐवजी ‘आम्हा सोयरी कंत्राटांची जंगले’ हाच ‘सुविचार’ ठरू लागला आहे. 

 

टॅग्स :forestजंगलEarthपृथ्वीenvironmentवातावरण