शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

धडधड थांबलेल्या हृदयाची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:46 IST

आपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे.

- डॉ. प्रशांत थोरात, नेत्ररोगतज्ज्ञआपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांपासून हे लोन आता तुलनेने छोट्या नाशिक, नागपूर, पुणे इत्यादी शहरांकडे फोफावले आहे. ही आनंदाची बाब आहे.गेल्या आठवड्यात एक विचित्र योगायोग अनुभवयास मिळाला. The Federation of Organ and Body Donationच्या माध्यमातून मुंबई ते गोवा पायी चालत अवयवदानाची दिंडी चालू आहे. नवी मुंबईमध्ये त्या दिंडीचे स्वागत करण्याची संधी आम्हाला लाभली व त्याच दिवशी नाशिकमधून हृदय चेन्नई येथे पाठवण्यात आलेल्या अपयशाची बातमी येऊन थडकली. मन खिन्न/सुन्न झाले. काय हा दैवदुर्विलास! एका बाजूला साठी पार केलेले ज्येष्ठ अवयवदानाची पताका घेऊन ५२ दिवसांमध्ये रोज ३० किमीचे अंतर पार करीत आहेत तर दुसरीकडे अवयवदानाचा निर्णय होऊनही फक्त प्रक्रियेतील समन्वयाच्या अभावी एका हृदयाची ‘धडधड’ बंद पडते. यासारखी दुसरी खेदाची बाब नाही. या प्रश्नाकडे सर्व घटकांनी गांभीर्याने पाहणे काळाची गरज आहे. पण अशा शहरांमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी फक्त डॉक्टर्स व रुग्णालये असून ही चळवळ वाढणार नाही. तर त्यासाठी अवयवदान प्रक्रियेतील सर्व घटकांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली तर समन्वयाचे दुवे सहज साधता येतील. नेत्रदान व त्वचादान हे मृत्यूपश्चात सहा तासांत घेतले जाते. ते साठवून ठेवण्यासाठी औषधींचा वापर केल्यानंतर प्रत्यारोपणासाठी २-३ दिवसांचा कालावधी सहज उपलब्ध होतो. परंतु मश्तिश्क मृत (Brein Dead) दात्याकडून घेतलेले किडनी, यकृत (Liver), हृदय (Heart) इत्यादी अवयव काही तासांच्या आता प्रत्यारोपण होणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत यंत्रणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या प्रकारचे अवयवदान हे फक्त मान्यताप्राप्त रुग्णालयांतच शक्य आहे. अशा रुग्णालयांची दोन प्रकारे विभागणी होते. त्यामध्ये अवयवदान घेणारी रुग्णालये व अवयवदान घेऊन प्रत्यारोपणास सुसज्ज रुग्णालये. फक्त अवयवदान घेणाºया रुग्णालयात प्राप्त अवयव प्रत्यारोपणासाठी देणे बंधनकारक असल्याने वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो. यासाठी येणारा खर्च हा प्रत्यारोपण करण्यात येणाºया रुग्णाला करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी काही उपायांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.१) प्रत्येक शहरात किमान एक असे रुग्णालय असावे, जेथे सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे. वाहतुकीचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल.२) वाहतुकीच्या नियोजनासाठी तसेच इतर कायदेशीर बाबींसाठी रुग्णालय कोणतेही असले तरी विभागवार सक्षम अधिकारी नेमणे आवश्यक आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर समन्वय साधणे सहज शक्य होईल.३) प्रत्यारोपणासाठी घेतलेले अवयव दीर्घकाळ योग्य पद्धतीने साठविण्यासाठी औषधे व उपकरणे यावर संशोधन करून त्याची उपलब्धता करून देणे, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक कालावधीमिळेल.४) हवाई वाहतुकीसाठी सरकारी Air Ambulanceचा पर्याय होणे उपलब्ध आवश्यक आहे. सध्या हवाई वाहतुकीसाठी खाजगी क्षेत्रातील विमान कंपन्यांकडून सुविधा पुरविली जाते. साहजिकच त्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जाते. अशी सुविधा सरकारने मोफत देणे अपेक्षित नसून ती ना नफा ना तोटा या तत्त्वावर दिली तरी खर्च निम्म्याहून कमी होईल, यात शंकाच नाही.फक्त जाहिरातबाजी करण्यापेक्षा संबंधित यंत्रणा आता तरी जाग्या होऊन धडक निर्णय घेतील. त्यामुळे भविष्यात पुन्हा एका हृदयाची ‘धडधड’ बंद न पडता त्याच हृदयाने एका रुग्णाची ‘धडधड’ सुरू होईल. हीच अपेक्षा.