शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

धडधड थांबलेल्या हृदयाची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:46 IST

आपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे.

- डॉ. प्रशांत थोरात, नेत्ररोगतज्ज्ञआपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांपासून हे लोन आता तुलनेने छोट्या नाशिक, नागपूर, पुणे इत्यादी शहरांकडे फोफावले आहे. ही आनंदाची बाब आहे.गेल्या आठवड्यात एक विचित्र योगायोग अनुभवयास मिळाला. The Federation of Organ and Body Donationच्या माध्यमातून मुंबई ते गोवा पायी चालत अवयवदानाची दिंडी चालू आहे. नवी मुंबईमध्ये त्या दिंडीचे स्वागत करण्याची संधी आम्हाला लाभली व त्याच दिवशी नाशिकमधून हृदय चेन्नई येथे पाठवण्यात आलेल्या अपयशाची बातमी येऊन थडकली. मन खिन्न/सुन्न झाले. काय हा दैवदुर्विलास! एका बाजूला साठी पार केलेले ज्येष्ठ अवयवदानाची पताका घेऊन ५२ दिवसांमध्ये रोज ३० किमीचे अंतर पार करीत आहेत तर दुसरीकडे अवयवदानाचा निर्णय होऊनही फक्त प्रक्रियेतील समन्वयाच्या अभावी एका हृदयाची ‘धडधड’ बंद पडते. यासारखी दुसरी खेदाची बाब नाही. या प्रश्नाकडे सर्व घटकांनी गांभीर्याने पाहणे काळाची गरज आहे. पण अशा शहरांमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी फक्त डॉक्टर्स व रुग्णालये असून ही चळवळ वाढणार नाही. तर त्यासाठी अवयवदान प्रक्रियेतील सर्व घटकांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली तर समन्वयाचे दुवे सहज साधता येतील. नेत्रदान व त्वचादान हे मृत्यूपश्चात सहा तासांत घेतले जाते. ते साठवून ठेवण्यासाठी औषधींचा वापर केल्यानंतर प्रत्यारोपणासाठी २-३ दिवसांचा कालावधी सहज उपलब्ध होतो. परंतु मश्तिश्क मृत (Brein Dead) दात्याकडून घेतलेले किडनी, यकृत (Liver), हृदय (Heart) इत्यादी अवयव काही तासांच्या आता प्रत्यारोपण होणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत यंत्रणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या प्रकारचे अवयवदान हे फक्त मान्यताप्राप्त रुग्णालयांतच शक्य आहे. अशा रुग्णालयांची दोन प्रकारे विभागणी होते. त्यामध्ये अवयवदान घेणारी रुग्णालये व अवयवदान घेऊन प्रत्यारोपणास सुसज्ज रुग्णालये. फक्त अवयवदान घेणाºया रुग्णालयात प्राप्त अवयव प्रत्यारोपणासाठी देणे बंधनकारक असल्याने वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो. यासाठी येणारा खर्च हा प्रत्यारोपण करण्यात येणाºया रुग्णाला करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी काही उपायांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.१) प्रत्येक शहरात किमान एक असे रुग्णालय असावे, जेथे सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे. वाहतुकीचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल.२) वाहतुकीच्या नियोजनासाठी तसेच इतर कायदेशीर बाबींसाठी रुग्णालय कोणतेही असले तरी विभागवार सक्षम अधिकारी नेमणे आवश्यक आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर समन्वय साधणे सहज शक्य होईल.३) प्रत्यारोपणासाठी घेतलेले अवयव दीर्घकाळ योग्य पद्धतीने साठविण्यासाठी औषधे व उपकरणे यावर संशोधन करून त्याची उपलब्धता करून देणे, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक कालावधीमिळेल.४) हवाई वाहतुकीसाठी सरकारी Air Ambulanceचा पर्याय होणे उपलब्ध आवश्यक आहे. सध्या हवाई वाहतुकीसाठी खाजगी क्षेत्रातील विमान कंपन्यांकडून सुविधा पुरविली जाते. साहजिकच त्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जाते. अशी सुविधा सरकारने मोफत देणे अपेक्षित नसून ती ना नफा ना तोटा या तत्त्वावर दिली तरी खर्च निम्म्याहून कमी होईल, यात शंकाच नाही.फक्त जाहिरातबाजी करण्यापेक्षा संबंधित यंत्रणा आता तरी जाग्या होऊन धडक निर्णय घेतील. त्यामुळे भविष्यात पुन्हा एका हृदयाची ‘धडधड’ बंद न पडता त्याच हृदयाने एका रुग्णाची ‘धडधड’ सुरू होईल. हीच अपेक्षा.