शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला रोखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ हाच पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:38 IST

मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.

समाज किंवा समूह संसर्गाच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालये पुरेशी पडणार नाहीत. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नच व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी जगाच्या पाठीवर अनेक समूह संसर्गाचे रोग आले. तेव्हा त्यावर मात करण्यासाठी समाजव्यवस्थेच्या मुळाशी जाऊन अशा रोगांचे उच्चाटन केले गेले. आताही पोलिओसारख्या व्याधीवर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांवर प्रयत्न केला जातो. २१व्या शतकात आलेला संसर्ग रोग कोरोना आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर युद्धपातळीवर सुरू आहेत. भारतासह काही देशांत अशी लस तयार करून त्याच्या चाचण्यादेखील चालू आहेत. त्याला यश येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवे आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी अपरिहार्य आहे. किमान २० जणांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि नव्या रुग्णांचा शोध लागतो आहे. परवा (३ सप्टेंबर) ची आकडेवारी पाहिली, तर येत्या २ दिवसांत ३ लाख ६२ हजार १०० जणांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घ्यावा लागणार आहे. कारण त्या दिवशी १८,१०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सध्या कोरोनासंबंधीचे एकूण २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ ६५,२१९ आशा स्वयंसेविकाच ट्रेसिंगचे काम करीत आहेत. दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक संपर्कातील लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे का?

प्रतिरुग्ण किमान २० जणांचा शोध घ्यायचा आहे. महाराष्ट्रात केवळ नागपूर आणि बीड जिल्ह्यांतच असा शोध घेण्यात आला आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले असंख्य जण (काही लाखांत) मुक्तपणे समाजात वावरत आहेत. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढतच राहणार आहे आणि सध्या तेच घडते आहे. देशात परवा (३ सप्टेंबर) ८३ हजार ८८३ जण बाधित आढळले. त्यांच्या संपर्कात प्रत्येकी २० जणांचा शोध घ्यायचा असेल, तर १६ लाख ७७ हजार ६६० जणांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही संख्या एका दिवसाची आहे. गेली पाच महिने कोरोनाबाधितांची संख्या एका दिवशीही आदल्या दिवशीच्या तुलनेने कमी आलेली नाही. ती वाढत जाऊन सध्या ८३ हजारांवर गेली आहे.मास्क लावूनच वावरावे लागेल, समाजात न वावरले तर अतिउत्तम; पण गर्दी टाळली पाहिजे. सामाजिक अंतर राखून व्यवहार केले पाहिजेत. आजारपणाची लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालय गाठले पाहिजे. आपल्या समाजाचे जगण्याचे व्यवहार गुंतागुंतीचे आहेत. प्रशासकीय व्यवस्था कमकुवत आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. ती सार्वजनिक (शासकीय) ठेवायची की, खासगी क्षेत्राकडे सोपवायची आदी गोंधळाचे वातावरण आहे. अशा अवस्थेत लढावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी कोरोनायोद्धे होऊन लढताहेत. ते पुरेसे नाहीत. मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा व समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य बाधित झाले तर गावकऱ्यांना त्याच्या घराची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. गाय-म्हैस, शेळी-मेंढीसह शेतकरी जगत असतो. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी शेजारधर्म म्हणून अंगावर घेतली पाहिजे. सध्यातरी संसर्ग रोखण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तर संपूर्ण व्यवहार बंद करण्याचा लॉकडाऊनचा उपायही पुन्हा पूर्णत: स्वीकारावा लागेल. ‘चेस द व्हायरस’ हीच संकल्पना घराघरांत राबविली तरच आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकू. सध्याची पद्धत अपुरी आहे. आपण पूर्णत: काळजी घेत नाही आणि शासकीय यंत्रणा पुरेशी नाही, हे मान्यच करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत