शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

कोरोनाला रोखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ हाच पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:38 IST

मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.

समाज किंवा समूह संसर्गाच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालये पुरेशी पडणार नाहीत. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नच व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी जगाच्या पाठीवर अनेक समूह संसर्गाचे रोग आले. तेव्हा त्यावर मात करण्यासाठी समाजव्यवस्थेच्या मुळाशी जाऊन अशा रोगांचे उच्चाटन केले गेले. आताही पोलिओसारख्या व्याधीवर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांवर प्रयत्न केला जातो. २१व्या शतकात आलेला संसर्ग रोग कोरोना आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर युद्धपातळीवर सुरू आहेत. भारतासह काही देशांत अशी लस तयार करून त्याच्या चाचण्यादेखील चालू आहेत. त्याला यश येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवे आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी अपरिहार्य आहे. किमान २० जणांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि नव्या रुग्णांचा शोध लागतो आहे. परवा (३ सप्टेंबर) ची आकडेवारी पाहिली, तर येत्या २ दिवसांत ३ लाख ६२ हजार १०० जणांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घ्यावा लागणार आहे. कारण त्या दिवशी १८,१०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सध्या कोरोनासंबंधीचे एकूण २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ ६५,२१९ आशा स्वयंसेविकाच ट्रेसिंगचे काम करीत आहेत. दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक संपर्कातील लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे का?

प्रतिरुग्ण किमान २० जणांचा शोध घ्यायचा आहे. महाराष्ट्रात केवळ नागपूर आणि बीड जिल्ह्यांतच असा शोध घेण्यात आला आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले असंख्य जण (काही लाखांत) मुक्तपणे समाजात वावरत आहेत. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढतच राहणार आहे आणि सध्या तेच घडते आहे. देशात परवा (३ सप्टेंबर) ८३ हजार ८८३ जण बाधित आढळले. त्यांच्या संपर्कात प्रत्येकी २० जणांचा शोध घ्यायचा असेल, तर १६ लाख ७७ हजार ६६० जणांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही संख्या एका दिवसाची आहे. गेली पाच महिने कोरोनाबाधितांची संख्या एका दिवशीही आदल्या दिवशीच्या तुलनेने कमी आलेली नाही. ती वाढत जाऊन सध्या ८३ हजारांवर गेली आहे.मास्क लावूनच वावरावे लागेल, समाजात न वावरले तर अतिउत्तम; पण गर्दी टाळली पाहिजे. सामाजिक अंतर राखून व्यवहार केले पाहिजेत. आजारपणाची लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालय गाठले पाहिजे. आपल्या समाजाचे जगण्याचे व्यवहार गुंतागुंतीचे आहेत. प्रशासकीय व्यवस्था कमकुवत आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. ती सार्वजनिक (शासकीय) ठेवायची की, खासगी क्षेत्राकडे सोपवायची आदी गोंधळाचे वातावरण आहे. अशा अवस्थेत लढावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी कोरोनायोद्धे होऊन लढताहेत. ते पुरेसे नाहीत. मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा व समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य बाधित झाले तर गावकऱ्यांना त्याच्या घराची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. गाय-म्हैस, शेळी-मेंढीसह शेतकरी जगत असतो. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी शेजारधर्म म्हणून अंगावर घेतली पाहिजे. सध्यातरी संसर्ग रोखण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तर संपूर्ण व्यवहार बंद करण्याचा लॉकडाऊनचा उपायही पुन्हा पूर्णत: स्वीकारावा लागेल. ‘चेस द व्हायरस’ हीच संकल्पना घराघरांत राबविली तरच आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकू. सध्याची पद्धत अपुरी आहे. आपण पूर्णत: काळजी घेत नाही आणि शासकीय यंत्रणा पुरेशी नाही, हे मान्यच करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत