शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
4
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
5
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
6
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
7
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
8
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
11
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
12
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
13
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
14
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
15
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
16
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
17
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
18
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
19
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
20
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला

कोरोनाला रोखण्यासाठी ‘ट्रेसिंग’ हाच पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:38 IST

मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा आणि समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.

समाज किंवा समूह संसर्गाच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालये पुरेशी पडणार नाहीत. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नच व्हायला हवेत. पूर्वीच्या काळी जगाच्या पाठीवर अनेक समूह संसर्गाचे रोग आले. तेव्हा त्यावर मात करण्यासाठी समाजव्यवस्थेच्या मुळाशी जाऊन अशा रोगांचे उच्चाटन केले गेले. आताही पोलिओसारख्या व्याधीवर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच स्तरांवर प्रयत्न केला जातो. २१व्या शतकात आलेला संसर्ग रोग कोरोना आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर युद्धपातळीवर सुरू आहेत. भारतासह काही देशांत अशी लस तयार करून त्याच्या चाचण्यादेखील चालू आहेत. त्याला यश येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करायला हवे आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी अपरिहार्य आहे. किमान २० जणांचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा आहे.सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, मृत्यू आणि नव्या रुग्णांचा शोध लागतो आहे. परवा (३ सप्टेंबर) ची आकडेवारी पाहिली, तर येत्या २ दिवसांत ३ लाख ६२ हजार १०० जणांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घ्यावा लागणार आहे. कारण त्या दिवशी १८,१०५ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सध्या कोरोनासंबंधीचे एकूण २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ ६५,२१९ आशा स्वयंसेविकाच ट्रेसिंगचे काम करीत आहेत. दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक संपर्कातील लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे का?

प्रतिरुग्ण किमान २० जणांचा शोध घ्यायचा आहे. महाराष्ट्रात केवळ नागपूर आणि बीड जिल्ह्यांतच असा शोध घेण्यात आला आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले असंख्य जण (काही लाखांत) मुक्तपणे समाजात वावरत आहेत. परिणामी, कोरोनाचा संसर्ग वाढतच राहणार आहे आणि सध्या तेच घडते आहे. देशात परवा (३ सप्टेंबर) ८३ हजार ८८३ जण बाधित आढळले. त्यांच्या संपर्कात प्रत्येकी २० जणांचा शोध घ्यायचा असेल, तर १६ लाख ७७ हजार ६६० जणांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही संख्या एका दिवसाची आहे. गेली पाच महिने कोरोनाबाधितांची संख्या एका दिवशीही आदल्या दिवशीच्या तुलनेने कमी आलेली नाही. ती वाढत जाऊन सध्या ८३ हजारांवर गेली आहे.मास्क लावूनच वावरावे लागेल, समाजात न वावरले तर अतिउत्तम; पण गर्दी टाळली पाहिजे. सामाजिक अंतर राखून व्यवहार केले पाहिजेत. आजारपणाची लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालय गाठले पाहिजे. आपल्या समाजाचे जगण्याचे व्यवहार गुंतागुंतीचे आहेत. प्रशासकीय व्यवस्था कमकुवत आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. ती सार्वजनिक (शासकीय) ठेवायची की, खासगी क्षेत्राकडे सोपवायची आदी गोंधळाचे वातावरण आहे. अशा अवस्थेत लढावे लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात २ लाख ४६ हजार ४४१ कर्मचारी कोरोनायोद्धे होऊन लढताहेत. ते पुरेसे नाहीत. मानवाच्या अस्तित्वाचा लढा असल्याचे मान्य करून प्रत्येकाने योद्धा होण्याची आणि कोरोनाविरुद्ध लढाईत भागीदारी करण्याची गरज आहे. सर्व शासकीय यंत्रणा व समाजाने कोरोनाचा धोका ओळखून आपले वर्तन ठेवले पाहिजे. ट्रेसिंग करण्यासाठी मदत केली पाहिजे.एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य बाधित झाले तर गावकऱ्यांना त्याच्या घराची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. गाय-म्हैस, शेळी-मेंढीसह शेतकरी जगत असतो. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी शेजारधर्म म्हणून अंगावर घेतली पाहिजे. सध्यातरी संसर्ग रोखण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. आवश्यक असेल तर संपूर्ण व्यवहार बंद करण्याचा लॉकडाऊनचा उपायही पुन्हा पूर्णत: स्वीकारावा लागेल. ‘चेस द व्हायरस’ हीच संकल्पना घराघरांत राबविली तरच आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकू. सध्याची पद्धत अपुरी आहे. आपण पूर्णत: काळजी घेत नाही आणि शासकीय यंत्रणा पुरेशी नाही, हे मान्यच करावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत