शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

Toolkit Case: तपासाची दिशा अन‌् दशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:58 PM

दिल्ली न्यायालयासमोर दिशा रवीला हजर करताना या आरोपांच्या समर्थनार्थ काेणत्याही स्वरूपाचे पुरावे तपासयंत्रणेला सादर करता आले नाहीत.

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणे गुन्हा असेल तर तुरुंगात राहणे पसंत करेन’, अशी ठाम आणि बोलकी प्रतिक्रिया देणारी केवळ बावीस वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला देशद्रोही ठरविणाऱ्या तपास यंत्रणेची दुर्दशा झाली आहे. टूलकिटच्या आधारे व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून त्यावर उत्तर भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणाऱ्या दिशाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तिला तीन दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दिल्लीच्या न्यायालयात तिला हजर करून पुन्हा पोलीस कोठडी मागणाऱ्या तपास यंत्रणेला न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी फटकारले; शिवाय जे ताशेरे ओढले आहेत, ते पाहता दिशा रवी हिच्याविरुद्ध केवळ सुडाच्या भावनेने फिर्याद दाखल करून देशद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्याचे कलम लावून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न होता, हे स्पष्ट दिसते आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून फुटीरतावादी खलिस्तान चळवळीशी संबंध निर्माण करणे, त्यासाठी जनमत तयार करण्यासाठी लिखाण करणे, त्याचा व्हॉट्सॲपच्या आधारे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करणे, त्यातून प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या दंगलसदृश परिस्थिती निर्माण होणे, आदी आरोप ठेवण्यात आले होते.

दिल्ली न्यायालयासमोर दिशा रवीला हजर करताना या आरोपांच्या समर्थनार्थ काेणत्याही स्वरूपाचे पुरावे तपासयंत्रणेला सादर करता आले नाहीत. शिवाय जे आराेप करण्यात आलेत, त्यात अंशत:ही तथ्य आढळून येत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. भारतीय समाजाला सार्वजनिक सभ्यतेची पाच हजार वर्षांची परंपरा आहे, या परंपरेनुसार ऋग्वेदातील एका श्लाेकामध्ये लाेककल्याणार्थ चाेहाेबाजूने मांडण्यात येणारे विचार आणि कल्पनांचा स्वीकार करायला हवा, असेही न्यायाधीशांनी बजावले. लाेकशाही शासनव्यवस्थेत देशातील नागरिक हे सरकारच्या विवेकाचे रक्षणकर्ते असतात. त्यामुळे केवळ सरकारच्या निर्णयांच्या किंवा धाेरणांच्या विराेधात मत व्यक्त करणे, असहमती दर्शविणे याबद्दल तुरुंगात ठेवता येणार नाही.

मत व्यक्त करण्याचे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, ते मत सरकारच्या बाजूचे किंवा विराेधात असू शकते. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९नुसार असहमतीचा अधिकार प्राप्त हाेताे. त्यानुसार राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते मत प्रसारित करता येऊ शकते, असा दाखलाही न्यायालयाने दिला आहे. खरेच दिशा रवी हिच्या मतस्वातंत्र्याचा सरकारला एवढा का राग यावा? राजकीय पक्ष किंवा नेते काश्मीर प्रश्न, भारत-चीन संबंध, ईशान्य भारतातील अशांतता तसेच भारत-पाक सीमेवरील चकमकीवरून गेली कित्येक वर्षे सर्वत्र टीका-टिप्पणी करत आले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा कितीतरी अधिक संवेदनशील असणाऱ्या या वादग्रस्त विषयांवर टीका-टिप्पणी हाेत असेल तर देशात जनआंदाेलनाच्या स्वरूपात चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यात गैर काय आहे? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ वाॅशिंग्टन डी.सी.मध्ये जाे हिंसाचार झाला हाेता त्यावर अनेक देशांतील राष्ट्रप्रमुखांसह नागरिकांनी मते व्यक्त केली हाेती.

वास्तविक, तो अमेरिकेचा अंतर्गत मामला हाेता; शिवाय त्या समर्थकांची मागणी अयाेग्य हाेती, अशा स्थानिक, राष्ट्रीय पातळीवरील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांवर माणूस म्हणून व्यक्त होणे स्वाभाविक असते. जगाच्या पाठीवर असे अनेक विषय आहेत की, ज्यांचा संबंध राष्ट्रांच्या सीमापार येत राहतो. त्याचा मानवी कल्याणाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रश्नांवर जगभरातील प्रत्येक नागरिकास मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य गृहीत आहे. दिशा रवी यांनीही कोणताही गुन्हा केलेला नाही. सरकारने केवळ धोरणात्मक प्रश्नांवर असहमती दर्शविणाऱ्यांना तुरुंगात डांबायचे ठरविल्यास देशालाच तुरुंग बनवावे लागेल.

आपल्या देशात सुमारे एक हजार मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. विविध विषयांवर, विविध मते आहेत.  त्यापैकी काही पक्ष विविध प्रांतांत सत्तेवर आहेत. त्यांची मते वेगळी असली म्हणजे तो राष्ट्रद्रोह नाही. पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा आहे. याचा अर्थ ते सरकार राष्ट्रद्रोही ठरत नाही. काही राज्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही वादग्रस्त कायद्यांचा अंमल करणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यापुढे दिशा रवी हिचे मत फारच किरकोळ आहे. त्यामुळे तिच्यावरील कारवाईबाबत न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यामुळे तपास यंत्रणेच्या तपासाचीच दुर्दशा झाली आहे. यापुढे अशा प्रकारची कारवाई करताना विचार करावा लागेल, हे निश्चित!

टॅग्स :Toolkit Controversyटूलकिट वादCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन