शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

निषेधाचा स्वर

By admin | Updated: October 20, 2015 03:30 IST

म्हणूनच नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र आहे.

- गजानन जानभोरम्हणूनच नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र आहे. मोमीनपुऱ्याच्या प्रवेशद्वारालगत चबुतऱ्यावर एक मैफील नेहमी सजलेली असते. नारायण सावरकर हा अवलिया तिथे गात असतो आणि चाहते त्याला मनापासून दाद देत असतात. रस्त्याने जात असताना मध्येच कुणीतरी त्यांना थांबवतो आणि गाण्यांची फर्माइश करतो. सावरकरांचे गाणे सुरू होते अन् काही क्षणातच गाणाऱ्यांची शाळा तिथे भरते. वस्तीतल्या नागरिकांचा हा नित्यक्रम झाला आहे. सावरकर फारसे बोलत नाहीत, ते गाण्यातूनच व्यक्त होतात, अष्टौप्रहर गुणगुणत असतात. एखाद्या दिवशी ते दिसले नाहीत की चबुतरा उदासवाणा वाटतो. कुणी कौतुक करावे, गायक म्हणून सन्मान द्यावा यासाठी सावरकर गात नाहीत. ते गाणे जगतात. त्यांच्या नसानसात, प्राणात ते भिनलेले आहे. परवा गुलाम अलींची गझल गाताना ते दिसले. रफींचा हा दिवाना गुलाम अलींच्या प्रेमात? अचानक हा बदल कसा? सावरकर म्हणाले, ‘रफींचा मी भक्त आहेच. पण गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम काही लोकानी होऊ दिला नाही. त्या दिवसापासून मी अस्वस्थ आहे. मुठी आवळून, चौकात उभे राहून मला या गुंडांचा निषेध करायचा होता. पण सामान्य माणूस म्हणून व्यवस्थेने माझ्या निषेधाला काही कुंपणं घालून दिली आहेत. मी एकटा आहे, दुबळा आहे. ते झुंडीने येतात. पण घाबरून कसे चालेल? म्हणून मी रोज गुलाम अलींची गझल गातो आणि माझ्या परीने निषेध करतो’. गाणे माणसाला आनंद देते. दुभंगलेली मने जोडते. मग कथित राष्ट्रभक्त सांगतात त्याप्रमाणे, दहशतवादी जन्मास घालावेत आणि बॉम्बस्फोट घडवून आणावेत, एवढी स्फोटके गाण्यात खरीच असतात का? सावरकर गुलाम अलींच्या गझलांमध्ये नेमका त्याचाच शोध घेत आहेत. अभिजित भट्टाचार्य या सडकछाप गायकाच्या टीकेमुळे तर स्वर आणि रागांनाही पुढच्या काळात धर्माच्या सावटाखाली जगावे लागणार आहे.स्वत:च्या आनंदासाठी गाणाऱ्या या वृद्ध गायकाची अस्वस्थता कलेच्या प्रांतात येऊ घातलेल्या भयावह संकटाची चाहूल आहे. अलीकडे आपला आवाज दडपला जातो. गुलाम अलींना गाऊ दिले जात नाही, दाभोलकर, पानसरेंना कायमचे संपवले जाते. ओवैसी, साक्षी हे वाचाळवीर मात्र सातत्याने विष ओकत असतात. देश, धर्म, जात धोक्यात आल्याची आवई उठवून कधी ग्रॅहम स्टेन्स तर कधी मोहम्मद इकलाखला ठार मारतात. या नराधमांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दिवसेंदिवस क्षीण केला जात आहे. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, कलावंतांची टिंगलटवाळी केली जाते. खेदाची बाब ही की, हे सर्व सरकारच्या पाठिंब्याने होत आहे. आपल्या विरोधात कुणाला बोलूच द्यायचे नाही, त्याचे गाणे बंद करायचे, आवाज दडपायचा, काळे फासायचे, एवढ्याने ते शांत होत असतील तर ठीक नाहीतर त्यांना शेवटी गोळ्या झाडायच्या. गांधी ते दाभोलकर... धर्मपिसाटांच्या खुनशीपणाचा हा सनातन प्रवास आहे. धर्माआडून केलेल्या हिंसक कृत्यांचे समाजमनावर उमटलेले ओरखडे दीर्घकाळ असतात. ते पुसले जाऊ नयेत, हीच धार्मिक दहशतवादाची मूलभूत गरज असते. मग गुलाम अलींचे गाणे उधळून लावणे किंवा सुधींद्र कुळकर्र्णींना काळे फासणे या घटना त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक ठरतात. नारायण सावरकरांसारख्या वृद्ध गायकाच्या ‘अहिंसक’ निषेधाचे स्वर म्हणूनच या धार्मिक दहशतवादाविरुद्धच्या सत्याग्रहातील एक शस्त्र ठरते. प्रत्येक वेळी मोर्चात जाता येईल असे नाही, आंदोलनासाठी कार्यकर्ते संघटित होतीलच असे नाही. पण वैयक्तिक पातळीवर एक गोष्ट मात्र करता येईल. अवतीभवती असलेल्या माणसाना आपण गांधी उलगडून सांगू शकतो, हिंदुत्व विखारी करण्यासाठी जन्मास येऊ घातलेली ‘कच्चा आणि पक्का हिंदू’ ही नवी वर्णव्यवस्था हिंदू धर्माच्या अस्तित्वावरच घाला घालणारी कशी आहे, हे समजावून सांगू शकतो. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे आता जगभरात पसरत आहेत. आपल्या हिंसक कृत्यांना विरोध करणाऱ्या आपल्याच धर्मातील निरपराध बांधवांना ते निर्दयतेने ठार करतात. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून देशातील काही हिंदुत्ववादी संघटना त्याच पद्धतीने स्वधर्मीयांमध्ये दहशत निर्माण करु पाहात आहेत. दाभोलकर, पानसरे, कलबुर्र्गींची हत्त्या त्याचाच एक भाग आहे. त्यांचा अहिंसक मार्गाने निषेध करण्यासाठी सारे बळ एकवटायचे कुठून? नारायण सावरकरांसारखी सामान्य माणसे त्या ऊर्जेचा स्रोत आहेत.