शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

टाेल वसुलीतला घाेळ! ... हा तर जनतेला लुटण्याचा अधिकृत परवानाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 4:22 AM

दाेन हजार काेटींच्या रस्त्याला तीस हजार काेटी रुपये जनतेने माेजणे आणि ते एका कंत्राटदाराच्या खिशात जाणे म्हणजे जनतेला लुटण्याचा अधिकृत परवाना दिल्याचा प्रकार आहे. गेल्या दाेन दशकांत बहुतांश राज्य आणि राष्ट्रीय  महामार्ग अशा पद्धतीने खासगीकरणातून करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात बावीस वर्षांपूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा महामार्ग खासगीकरणातून झाला. त्यावर दाेन हजार काेटी रुपये खर्च करण्यात आला हाेता. त्याची परतफेड करण्यापाेटी आजवर ६ हजार ७७३ काेटी रुपये टाेल वसुलीतून मिळविण्यात आले. प्रत्यक्षात ही वसुली ४ हजार ३३० काेटी रुपयांपर्यंत वसूल करणे आणि रस्ता हस्तांतरित करणे अपेक्षित हाेते. महाराष्ट्र राज्य महामार्ग विकास मंडळाने (एमएसआरडीसी) रस्ता ताब्यात घ्यायला हवा हाेता. मात्र, या रस्त्यासाठी झालेला खर्च परतावा म्हणून अद्याप २२ हजार ३७० काेटी रुपये वसुली हाेणे बाकी आहे असे महामार्ग विकास मंडळाला वाटते, तसे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्याच प्रतिज्ञापत्रात रस्ता तयार करण्यासाठी किती खर्च आला आहे, हे सांगण्याचा मात्र साेईस्कर विसर पडलेला दिसतो. रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदारास अद्याप नऊ वर्षे (२०३० पर्यंत) टाेल वसुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे सांगितले गेले. आजवर वसूल केलेला टाेल आणि नऊ वर्षे हाेणाऱ्या संभाव्य वसुलीचा आकडा तीस हजार काेटींच्या पुढे जाताे. ही तर सामान्य जनतेच्या पैशांची लूट आहे.

दाेन हजार काेटींच्या रस्त्याला तीस हजार काेटी रुपये जनतेने माेजणे आणि ते एका कंत्राटदाराच्या खिशात जाणे म्हणजे जनतेला लुटण्याचा अधिकृत परवाना दिल्याचा प्रकार आहे. गेल्या दाेन दशकांत बहुतांश राज्य आणि राष्ट्रीय  महामार्ग अशा पद्धतीने खासगीकरणातून करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या काेणत्याही शहरातून प्रवासाला बाहेर पडले की, खासगीकरणातून केलेल्या रस्त्यांवरून धावावे लागते. त्यासाठी साध्या माेटारगाडीलाही दाेन ते तीन रुपये प्रतिकिलाेमीटर माेजावे लागतात. एका बाजूला विविध प्रकारच्या  अप्रत्यक्ष करांच्या रूपाने सरकारला महसूल द्यायचा आणि स्वत:च्या प्रवासासाठी लागणाऱ्या रस्त्यांसाठीही पैसे द्यायचे, हा दुहेरी कराचाच प्रकार आहे. अशा कंत्राटदारांना टाेल वसुलीचे ठेके दिले आहेत ते बहुतांश ठेके राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची बुजगावणी उभी करून घेतले आहेत. त्यातून काेट्यवधीची माया गाेळा केली जाते. रस्ता तयार करायचा खर्च, त्याची निगा करण्याचा खर्च आदींचा हिशेबदेखील चुकीच्या पद्धतीने मांडला जाताे. ठेका वसुलीचा कालावधी निश्चित करण्यासाठी अपेक्षित वाहनांची वर्दळ कमी दर्शविली जाते. प्रत्यक्षात अधिक वाहने धावतात. एकदा खर्च तयार झाल्यावर त्याचा एकूण परतावा किती असणार याची आकडेवारी आधीच म्हणजे टाेल वसुलीला प्रारंभ करताना जाहीर केली पाहिजे.

मात्र, यात सर्व गाेलमाल आहे. त्यात रस्ते विकास महामार्ग मंडळाने याेग्य भूमिका जनतेच्या बाजूने घेणे अपेक्षित असताना कंत्राटदार आणि टाेल वसुलीच्या ठेकेदारांच्या पाठीशी ते उभे राहते. काेणत्या आधारे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसाठी अद्याप २२ हजार ३७० काेटी रुपये वसूल करायचे बाकी आहे, याचा खुलासा मंडळाने जनतेच्या माहितीसाठी जाहीर करायला हवा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्या याचिकेवरून या संपूर्ण व्यवहाराचे लेखापरीक्षण करून तीन आठवड्यांत अहवाल देण्याचा आदेश केंद्रीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना (कॅग) दिला, याचे स्वागत करायला हवे.  तशीच चाैकशी पुणे-बंगळूर महामार्गाच्या पुणे ते कागल, पुणे ते साेलापूर आदी रस्त्यांचीही करायला हवी आहे.

महाराष्ट्र  सरकारनेदेखील यासंदर्भात पारदर्शी हिशेब मांडायला हवा. त्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षणाची व्यवस्था करून दरवर्षी प्रत्येक रस्ते प्रकल्पांची आकडेवारी जाहीर करायला हवी . अनेक ठिकाणी शहरांच्या बाह्यवळणांवरही टाेल वसुली केली हाेती. त्यांची मुदत संपली तरी टाेल वसुली केली जात हाेती. जनतेने आंदाेलने करून ती बंद पाडली. दरवर्षी लेखापरीक्षण करून अहवाल प्रसिद्ध केले असते तर अशी आंदाेलने करण्याची वेळ आली नसती; शिवाय काही स्थानिक राजकारणी मंडळी आंदाेलनाचा वापर हप्ते मिळविण्यासाठी करण्याची संधी घेऊ शकले नसते. भविष्यात काेकण महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, रत्नागिरी-नागपूर महामार्ग, पुणे-कागल सहापदरी महामार्ग, पुणे-नाशिक चारपदरी महामार्ग तयार हाेणार आहेत. या महामार्गांवरील झालेला खर्च, निगा राखण्यासाठी येणारा खर्च आणि दरवर्षी गाेळा हाेणारा टाेलरूपी महसूल, तसेच एकूण द्यावयाचा परतावा याची आकडेवारी दरवर्षी जाहीर करावी. टाेल देऊन रस्ते करण्यास आता काेणाचा विराेध राहिला नाही याचा अर्थ त्याआधारे जनतेची लूटमार करण्याचा परवाना दिला आहे, असे नव्हे.  

टॅग्स :tollplazaटोलनाकाroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीGovernmentसरकार