शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आजचा अग्रलेख - आर्थिक मंदीचा फेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 6:02 AM

सध्या देशात सर्वाधिक चर्चेचा विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती

सध्या देशात सर्वाधिक चर्चेचा विषय जर कोणता असेल, तर तो म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती! आर्थिक आघाडीवरील गत काही दिवसांतील घडामोडींमुळे देश मंदीकडे वाटचाल करीत असल्याची चर्चा जोर धरत आहेत. त्यातच माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी नुकतेच देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे निदान करीत, त्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले. डॉ. सिंग यांनी केलेले विश्लेषण भारतीय जनता पक्षाने लगोलग फेटाळले. डॉ. सिंग पंतप्रधान असताना भारताचीअर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकाची होती. आता ती पाचव्या क्रमांकावर असून, तिसऱ्या क्रमांकाकडे अग्रेसर आहे, असा युक्तिवाद भाजपतर्फे करण्यात आला. हे म्हणजे सहामाही परीक्षेत माघारलेल्या विद्यार्थ्याने गतवर्षीच्या वार्षिक परीक्षेतील उत्तम गुणांचा दाखला देण्यासारखे झाले! भारत जगातील पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याच्या वस्तुस्थितीमुळे, अर्थव्यवस्थेची घसरण होत असल्याची वस्तुस्थिती बदलत नाही. भाजपच्या दाव्याप्रमाणे अर्थव्यवस्था मजबूत असल्यास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन एकापाठोपाठ एक उपाययोजनांची घोषणा का करीत आहेत? अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर का आली आहे? अर्थव्यवस्थेची घसरण होत आहे ही वस्तुस्थिती आहे आणि सत्ताधारी भाजपने ती मान्य करायला हवी.

‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये १९७४ साली प्रसिद्ध झालेल्या एका लेखात आर्थिक मंदीच्या काही व्याख्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका व्याख्येनुसार, दोन सलग तिमाहींमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीची उणे वाढ झाल्यास मंदी आली असे मानावे! कालौघात त्या लेखात करण्यात आलेल्या व्याख्यांपैकी इतर सर्व व्याख्या विस्मृतीत गेल्या; मात्र ही व्याख्या आजही सर्वमान्य आहे. या व्याख्येच्या कसोटीवर भारतीय अर्थव्यवस्था अद्याप तरी मंदीच्या विळख्यात सापडल्याचे म्हणता येणार नाही; कारण जीडीपी अजूनही पाच टक्क्यांच्या दराने वाढत आहे. हा दर जगातील बहुतांश देशांच्या जीडीपी वाढीच्या दरापेक्षा जास्त आह; परंतु चिंतेचे अजिबात कारणच नाही, असाही त्याचा अर्थ होत नाही! भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसºया क्रमांकाकडे झेप घ्यायची असल्यास आणि येत्या पाच वर्षांत ‘पाच खर्व डॉलरची अर्थव्यवस्था’ हा बहुमान प्राप्त करायचा असल्यास, जीडीपी किमान आठ टक्क्यांच्या दराने वाढायला हवा. चीनचा जीडीपी सलग तीन दशके जवळपास १० टक्के दराने वाढला होता, तेव्हा चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसºया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा कितीही दावा सत्ताधारी भाजपतर्फे करण्यात येत असला तरी, परिस्थितीने चिंताजनक वळण घेतले असल्याची वस्तुस्थिती अमान्य करता येणार नाही. देशातील वाढती बेरोजगारीदेखील त्याकडेच अंगुलीनिर्देश करीत आहे. सलग १२ महिने बेरोजगारीमध्ये १.५ ते २.० टक्क्यांनी वाढ झाल्यास, आर्थिक मंदी आल्याचे समजावे, असे काही अर्थतज्ज्ञ म्हणतात.

गत काही दिवसांपासून भारतात सर्वाधिक ओरड बेरोजगारीचीच होत आहे. भिन्न भिन्न दाव्यांमुळे देशात रोजगाराच्या नेमक्या किती संधी हिरावल्या गेल्या, याची निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी, तो आकडा ४० लाख ते चार कोटींच्या दरम्यान असावा, असा अंदाज आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या व्यवसाय माहितीच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीनुसार, जुलै २०१७ मध्ये वस्तू व सेवा कर लागू झाला तेव्हा बेरोजगारीचा दर ३.४ टक्के एवढा होता. तेव्हापासून त्यामध्ये सातत्याने वाढच झाली आणि गत महिन्याच्या अखेरीस तो नऊ टक्क्यांच्याही वर गेला होता. ही आकडेवारी आणि बेरोजगारीच्या दरावर आधारित आर्थिक मंदीच्या व्याख्येनुसार तर मंदी दाखल झाली असल्याचेच म्हणावे लागेल! देशांतर्गत मागणीही प्रचंड घटली आहे. विशेषत: ग्रामीण भागात ते जास्तच जाणवत आहे. वाहन उद्योगालाही मागणी घटल्याचा जोरदार फटका बसला आहे. ही सगळी लक्षणे अर्थव्यवस्था मंदीच्या फेºयात सापडली असल्याचीच आहेत. मोदी सरकारमधील धुरीण ही वस्तुस्थिती जेवढ्या लवकर मान्य करतील, तेवढे ते देशासाठी आणि सरकारसाठीही चांगले होईल!

भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसºया क्रमांकाकडे झेप घ्यायची असल्यास आणि येत्या पाच वर्षांत ‘पाच खर्व डॉलरची अर्थव्यवस्था’ हा बहुमान प्राप्त करायचा असल्यास, जीडीपी किमान आठ टक्क्यांच्या दराने वाढायला हवा.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसायIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन