शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आजचा अग्रलेख: अनाकलनीय राज ठाकरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 09:56 IST

Raj Thackeray: २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची प्रतिक्रिया होती - अनाकलनीय. राज यांच्या राजकारणाचे वर्णनही या एकाच शब्दात केले जाऊ शकते. राज्यकर्त्यांना कानफटीत लगावतानाच ते सरकारला पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळेच सभेला प्रचंड गर्दी करणारेही राज यांच्या झोळीत मत मात्र टाकत नाहीत.

राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाला, त्याच सुमारास चोवीस तास बातम्या दाखवणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्या आल्या. राज यांची भाषणे तेव्हा ‘लाइव्ह’ दाखवली जात आणि त्या भरवशावर या वाहिन्यांचा ‘टीआरपी’ उच्चांक गाठत असे. दीड-दोन दशके उलटली, तरी राज यांच्या भाषणांचा ‘टीआरपी’ तसाच टिकून आहे. राज यांच्या पक्षाचा एकही सदस्य विधिमंडळात अथवा संसदेत नाही, तरीही राज ठाकरे यांचा प्रभाव का ओसरत नाही? हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो - ‘राज यांची जादू कायम असतानाही त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य आज विधिमंडळात वा संसदेत का नाही?’ १९९०च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे नावाचा तरुण महाराष्ट्राने सर्वप्रथम पाहिला, तेव्हा विशीत असणारे राज आता साठीकडे निघाले आहेत. तरीही, त्यांचा करिष्मा कायम आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार’, अशी ओळख असणाऱ्या राज यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच बंड केले आणि वर्षभरात आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तेरा जागा जिंकल्या. अवघ्या महाराष्ट्रात राज यांचा झंझावात होता. प्रामुख्याने तरुण आणि महिला यांच्यावर राज यांचे गारूड होते. महाराष्ट्राच्या राजकारणात तोवर फारसे ‘हॅपनिंग’नव्हते. राज यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही नवे घडत आहे, असे अनेकांना वाटत होते. तो काळच वेगळा होता. अमेरिकेत बराक ओबामा अध्यक्ष होत होते. ‘अरब क्रांती’ने अनेक देशांमध्ये राज्यकर्त्यांना आव्हान दिले होते. ट्युनिशियापासून इजिप्तपर्यंत कैक देशांमध्ये सत्तांतर घडत होते. भारतात अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा भडका उडत होता. त्याच काळात राज ठाकरे नवा महाराष्ट्र घडवण्याची भाषा करत होते. व्यंगचित्रकार असणारे राज समकालीन राजकारणाच्या व्यंगावर नेमके बोट ठेवत होते. महाराष्ट्राच्या साचेबद्ध राजकारणाला कंटाळलेल्यांना हा ‘स्वरराज’ त्याचा आवाज आहे, असे वाटू लागले होते. त्याला कारणही तसेच होते.

साधारणपणे जी भूमिका राजकारणी कधीच मांडू शकत नाहीत, ती मांडण्याचे साहस राज करत होते. त्याचा ताजा पुरावा म्हणजे रविवारच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण. कुंभमेळ्याबद्दल या स्वरूपाचे जाहीर भाष्य करणे कोणत्या नेत्याला आज शक्य आहे?, औरंगजेबाच्या कबरीवरून जात-धर्माचे राजकारण करणाऱ्यांना असे ठोकून काढणे किती नेत्यांना शक्य आहे?, लोकप्रिय घोषणांना विरोध करत, मरणासन्न नद्यांचा विषय पृष्ठभागावर आणण्याची समज किती नेत्यांमध्ये आहे?, असे सगळे आहे आणि तरीही निवडणुकीच्या राजकारणात राज ठाकरे अपयशी का ठरत आहेत?, २००९च्या निवडणुकीनंतर तेरा आमदार असलेला हा पक्ष त्यानंतरच्या तिन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशी ठरला. ज्या नाशिकची महानगरपालिका लोकांनी राज यांच्या पक्षाकडे दिली, त्या नाशिकमध्येही आज पक्षाची स्थिती वाईट आहे. तेरा आमदार विधानसभेत असताना, विधिमंडळाचे अधिवेशन सोडून आपल्या आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ बघण्यासाठी पाठवणारे राज ठाकरे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी- शहांना राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करा’, असे सांगू लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी यश मिळवल्यानंतर मात्र राज एकदमच शांत झाले. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज दिसलेच नाहीत. शिवसेनेतील फूट आणि अजित पवारांच्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली खरी, पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीला ‘बिनशर्त’ पाठिंबा दिला. नंतरची विधानसभा लढवताना आपण सत्तेत असणार आहोत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आणि प्रत्यक्षात मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढवून ते शून्यावर बाद झाले !

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज यांची प्रतिक्रिया होती - अनाकलनीय. राज यांच्या राजकारणाचे वर्णनही या एकाच शब्दात केले जाऊ शकते. राज्यकर्त्यांना कानफटीत लगावतानाच ते सरकारला पाठिंबाही देऊन टाकतात. त्यामुळेच सभेला प्रचंड गर्दी करणारेही राज यांच्या झोळीत मत मात्र टाकत नाहीत. सत्ताधीशांवर राज जे कोरडे ओढतात, ते जमलेल्या तमाम बांधवांना, भगिनींना आणि मातांना पटत नाही, असे नाही. मात्र, राज हे त्यावर पर्याय ठरू शकतील, अशी खात्री लोकांना वाटत नाही. हे असे अनाकलनीय असणेच आपल्या इंजिनसमोरचा सगळ्यात मोठा अडसर आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र