शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:06 IST

२४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते

जम्मू काश्मिरातील अनंतनाग या जिल्ह्याच्या शहरी भागात घुसलेल्या अतिरेक्यांनी पाच जवानांची हत्या करावी आणि तीन जणांना जखमी करावे ही बाब त्या क्षेत्रातील संरक्षणाची व्यवस्था अजून पुरेशी मजबूत झाली नसल्याचे व तेथील अतिरेक्यांच्या संघटनांना जरब बसविण्यात सरकारला अजून यश येत नसल्याचे सांगणारी आहे. आपल्या जवानांच्या वाट्याला हौतात्म्य आले की काही काळ देशाने अस्वस्थ व्हायचे आणि सरकारने राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना करून ‘यापुढे असे होणार नाही’ हे लोकांना ऐकवायचे हे आता नित्याचे व अविश्वसनीय वाटावे असे प्रकरण झाले आहे. काश्मिरात सरकार नाही, राष्ट्रपतींची राजवट परिणामकारक नाही आणि तिला मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे तेथे लोकप्रशासन एवढ्यात तरी येण्याची शक्यता नाही. सबब लष्कर आणि दहशतखोर यांच्यातील युद्ध तेथे सुरू राहणार आणि त्यात मध्यस्थी वाटाघाटी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा हजर नसणार.

२४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर दहशतीच्या बंदोबस्ताच्या अनेक योजना जाहीर झाल्या. साऱ्या जगानेही त्या हिंसाचाराचा एकमुखी निषेध केला. काहींनी त्याच्या बंदोबस्तासाठी मदतही देऊ केली. परंतु प्रत्यक्षात काहीएक झाले नाही. काश्मीरच्या पूर्वेला तिबेट (म्हणजे चीन), पश्चिमेला पाकिस्तान आणि उत्तरेला रशिया व तालिबानांनी ग्रासलेला अफगाणिस्तान आहे. रशिया व अफगाणिस्तानचा अपवाद सोडला तर बाकीचे देश भारताशी वैर करणारे आहेत. त्यांना काश्मिरात शांतता नको. त्यातून काश्मिरातील जनता ही भारताला म्हणावी तशी अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न १९८० नंतर कधी झाले नाहीत. पूर्वी काश्मीरचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात असत. ते काँग्रेससोबतच भाजपच्या मंत्रिमंडळातही राहत. आता ते असले आणि नसले तरी त्यांचा काश्मिरात प्रभाव नसतो. त्यातून आताचे मोदी सरकार तर काश्मिरी जनतेत जास्तीतजास्त असंतोष उभा करण्याच्या प्रयत्नाला लागले आहे. ३७० वे कलम किंवा ३५अ हे घटनेचे कलम काढून टाकणे व काश्मीरची स्वायत्तता रद्द करणे हा त्याचा घोषित कार्यक्रम आहे. हे कलम काढल्यास ‘काश्मीर भारतात राहू शकणार नाही’ हे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे तर तसे केल्यास काश्मिरात कोणताही इसम भारताचा ध्वज हाती घेणार नाही हे दुसरे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांचे म्हणणे. त्यांच्या दोन पक्षांत वैर असले तरी काश्मीरच्या स्वायत्ततेबाबत एकमत आहे आणि मोदी व शहा यांना ती स्वायत्तताच संपवायची आहे. काश्मिरातील लोकसंख्येत ९५ टक्क्यांएवढे नागरिक मुसलमान आहेत. भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहणाºया पक्षाचे लोक या नागरिकांना आपलेसे कसे करू शकतील? धर्मनिरपेक्षता हे मूल्य नेहरू व पटेलांनी ज्या भावनेने स्वीकारले ते आताच्या सरकारात राहिले नाही. परिणामी, काश्मीरसह पंजाब, नागालँड, मणिपूर, मिझोरम व केरळ ही राज्येही आता प्रश्नार्थक होण्याची चिन्हे आहेत.

आताचे एकारलेले सरकार धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याला मूठमाती देण्याच्या प्रयत्नात आहे. तसे झाल्यास काश्मीरसोबत देशाचे इतरही अनेक भाग यापुढे केवळ धगधगते राहतील याचा विचार आपण करणार की नाही? जवान मारले गेले की त्यांना हौतात्म्य द्यायचे आणि त्यांची छायाचित्रे प्रकाशित करून त्यांच्या कुटुंबीयांना मदत पोहोचवायची हा देश एक राखण्याचा उपाय आहे काय? समाजामध्ये समन्वय राहील, त्यात एकवाक्यता व संवाद आणि देवाणघेवाण कायम राहील तरच देशाचे ऐक्य टिकणार आहे आणि घर टिकवायचे तर घरातल्या मोठ्या माणसाला जसे जास्तीच्या त्यागाला तयार राहावे लागते तसे केंद्राला करावे लागेल. तरच आजचा असंतोष व हिंसाचार थांबेल. अन्यथा पुलवामा व अनंतनाग यांसारखे प्रकार वारंवार घडतच राहतील. देश अखंड राखायचा तर त्यातील जनतेत एकात्मता असावी लागते. लोकांत ऐक्य असेल तर भौगोलिक एकात्मतेची वेगळी चिंता करावी लागत नाही. नव्या सरकारला हेच आता समजले पाहिजे.

धर्मनिरपेक्षता हे मूल्य पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार पटेलांनी ज्या भावनेने स्वीकारले ते आताच्या सरकारात राहिले नाही. परिणामी, काश्मीरसह पंजाब, नागालँड, मणिपूर, मिझोरम व केरळही राज्येही आता प्रश्नार्थक होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :MartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला