शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

‘ति’चं अस्तित्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 23:36 IST

आपल्याला अस्तित्व आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्की काय अभिप्रेत असतं? अस्तित्व म्हणजे असण्याचा धर्म, जिवंत असल्याची स्थिती हे जरी असलं

मी आहे एक सावली, स्वत:चं अस्तित्व असलेलीमी आहे एक अस्वस्थ धडपड,अंधारात प्रकाशवाट होणारी...आपल्याला अस्तित्व आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्की काय अभिप्रेत असतं? अस्तित्व म्हणजे असण्याचा धर्म, जिवंत असल्याची स्थिती हे जरी असलं, तरी त्यात कुठं तरी ‘स्वत्व’देखील अंतर्भूत असतं. या स्वत्वाची जाणीव होण्यासाठी सर्वप्रथम ‘स्व’ला ओळखण्याची सुरुवात व्हावी लागते. हेतूपूर्ण आणि समर्पित अशा जगण्यातूनच अस्तित्वाचा खरा अर्थ उलगडू लागतो आणि एकूणच जगण्याला परिपक्वता येऊ लागते. ही परिपक्वता निरोगी, आनंदी जीवनाच्या जवळ घेऊन जात असते. अस्तित्वाचा व्यापक अर्थ जेव्हा समजून घेऊ, तेव्हा त्याचा संबंध जगण्याशी आहे. ज्या गोष्टी आंतरिक आनंद, समाधान देतात आणि जीवन निरामय बनवतात, तेव्हा अस्तित्वाला वेगळा आयाम प्राप्त होतो.हे सारं विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे, परवा पुण्यात आंतरराष्ट्रीय ‘लोकमत वुमन समीट’ झाली. तिला देश-विदेशातून मान्यवरांची विशेष उपस्थिती लक्षणीय होती. ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते महेश भट, प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन व दिव्या दत्ता, जागतिक कीर्तीची कुस्तीपटू गीता फोगाट, ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी, विनोदी कलाकार सुनील ग्रोवर, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा आदिंसह अनेक मान्यवरांची मांदियाळी सभागृहात बौद्धिक, वैचारिक चैतन्य निर्माण करणारी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘युनिसेफ’चा लाभलेला सहयोग या परिषदेची विशेष उपलब्धी ठरली. ‘अस्तित्व’ ही या समीटची केंद्रीय संकल्पना होती. पुरुषप्रधान समाजात स्त्रीला दुय्यम मानण्याचा व तिचं स्वतंत्र ‘अस्तित्व’ नाकारण्याचा अन्याय अनादिकाळापासून होत आला आहे. तिची कधी पिळवणूक होत आली, तर कधी तिच्या आत्मविश्वासाच्याच चिंधड्या उडवल्या गेल्या. ती अबला आहे, असंच ठसवण्याचा प्रयत्न होत गेला. मात्र, स्त्रीप्रश्नांविषयी आस्था असणाऱ्या अनेक विचारवंत, कृतिशील समाजसुधारकांनी आणि पुरोगामी लोकनेत्यांनी तिला मुक्त करण्यासाठी अविरत धडपड केली. प्रबोधनाची चळवळ राबवली. त्यांना होणारा विरोध तीव्र, प्रचंड आणि परिणामांनी भयकारी होता. गेल्या शे-दीडशे वर्षांत स्त्रियांनी लढलेली अस्तित्वाची लढाई, विविध क्षेत्रांत घेतलेली प्रगतीची झेप खरोखर थक्क करणारी आहे. आधुनिक काळात चित्र वेगानं बदलतं आहे. चूल-मूल यापलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या अवकाशात झेपावण्याचा अधिकार आपल्यालाही आहे, याची तिला जाणीव झाली. तिनं उंबरठा ओलांडला आणि तिलाही तिच्या अफाट क्षमतांची जाणीव झाली. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यापासून ते ‘ति’चं अवकाश विस्तारण्याचा प्रवास लोकमतच्या व्यासपीठावर उत्तरोत्तर रंगत गेला. जीवनाच्या संघर्षात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून टपाल कार्यालयात काम करणारी, रिक्षा चालवणारी, कचरा वेचणारी अशा महिला तिथं होत्या. व्यवसाय-उद्योगात यशस्वी पुरुषांच्या बरोबरीनं धुरा सांभाळणाऱ्या कर्तृत्वशालिनीही होत्या. त्याचबरोबर सैन्यदल, वायुदल, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांत ‘मर्दुमकी’ गाजवणाऱ्या महिलाही आवर्जून उपस्थित होत्या. एका अर्थानं महिलांचं क्षितिज किती विस्तारलेलं आहे आणि तिनं स्वत:चं ‘अस्तित्व’ किती विविध प्रकारांनी फुलवलेलं आहे, हे दिसून आलं. स्वयंप्रज्ञेनं एकेका कलाक्षेत्राला समृद्ध करणारी, पूर्वपरंपरेला संपूर्ण नवता प्रदान करणारी, जुना वारसा प्रतिभेच्या स्पर्शानं उज्ज्वल करणारी आणि स्त्रीत्वाची अंतर्ज्याेत तेवत ठेवणारी ‘ती’ आजच्या काळात विकासप्रक्रियेची गतिमानता वाढवीत नेणारी स्वयंसिद्धा आहे, हेच जणू त्या सर्वांच्या व्यक्त होण्यातून जाणवत होतं. ‘ति’ची झेप, ‘ति’चं अवकाश ‘ति’चं आकाश, ‘ति’चा प्रकाश‘ति’चं अस्तित्व, तिचा विकासआत्मनिर्भरतेच्या बांधणीतील उत्स्फूर्त आणि मनोज्ञ सहभागातून स्वत:च्या ‘अस्तित्वा’चा शोध आज महिला समर्थपणे घेत आहेत. स्त्रीवरची दडपणं दूर होत जाण्याचा, तिच्या सामाजिक स्थानामध्ये बदल होत जाण्याचा आणि तिच्यासाठी नव्या जगाची दारं खुली होत जाण्याचा मार्ग आता विस्तृत झाला पाहिजे. तिच्या अस्तित्वासह तिचं अवकाश तिला मिळायलाच हवं, हेच नवनीत या मंथनातून निर्माण झालं.- विजय बाविस्कर