शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसरा बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 4:24 AM

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता.

योगशास्त्राचा प्रणेता पतंजली हा केवळ धर्मज्ञ नव्हता. तो पाणिनीसारखाच राजनीतिज्ञही होता. देशात वैदिक धर्माची नव्याने मुहूर्तमेढ करणाऱ्या पुष्यमित्र शुंगराजाचा तो प्रधानमंत्री होता. योगशास्त्राएवढाच त्याचा तत्कालीन राजकारणावरही फार मोठा प्रभाव होता. त्याच्या नावाने प्रथम आपली यौगिक व नंतर औद्योगिक इस्टेट उभी करणा-या आताच्या रामदेवबाबांनीही राजकारण, अर्थकारण आणि थोडेफार धर्मकारण अशा सर्व क्षेत्रांत आपली चांगली पैठ जमविली आहे. त्यांना राजकारण त्यातल्या काळवेळेनुसार चांगले समजते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांचा भारतीय जनता पक्ष यांचा उघड प्रचार केला. त्याआधीचे काही दिवस त्यांनी संघाशीही चांगलेच जुळवून घेतले होते. त्यांच्या या राजकीय मैत्रीचा लाभ त्यांना त्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर मिळाला. एकेकाळी नुसतीच योगविद्या शिकवत देशभर हिंडणारा हा बाबा नंतरच्या काळात पंजाबात त्याची औद्योगिक वसाहत उभारून थांबला. त्या वसाहतीत तयार होणारी अप्रमाणित औषधे व सौंदर्य प्रसाधने त्याने देशभर विक्रीला आणली. पतंजली या नावाने देशात सर्वत्र आढळणारी या बाबाची दुकाने आता थेट मोठ्या मॉलच्या आकाराची व तेवढ्या थाटाची झाली आहेत. त्यात येणाºया ग्राहकांचा वर्ग मोठा आहे आणि त्यातून येणाºया उत्पन्नाच्या बळावर या रामदेवबाबाने आता देशातील लहानसहान उद्योग खरेदी करण्याचाही सपाटा लावला आहे. सरकारने त्याला हजारो एकर जमिनी अतिशय वाºयामोलाने दिल्या आणि त्या या बाबाच्या उद्योगांची वाट पाहत तशाच पडित राहिल्या आहेत. ही स्थिती या बाबाचे मोदीप्रेम वाढविणारी आणि त्याची संघाशी असलेली जवळीक आणखी दृढ करणारी आहे. मात्र प्रत्यक्षात रामदेवबाबा मोदींपासून दूर जातानाच आता दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर जाहीर टीका करायला सुरुवात केली आहे. अस्मानाला भिडलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव जमिनीवर आणा, अन्यथा तुम्हाला येत्या निवडणुकीत यश मिळणार नाही अशी शापवाणी त्यांनी उच्चारायला सुरुवात केली आहे. रामदेवबाबा हा नरेंद्र मोदींच्या सरकारवर उलटलेला तिसºया क्रमांकाचा बाबा आहे. सर्वप्रथम या सरकारविरुद्ध आसारामबापू किंचाळत उठला. आसारामबापूच्या पायांना स्पर्श करणारी व त्यांचा आशीर्वाद घेणारी भाजपाच्या नेत्यांची अनेक छायाचित्रे लोकांच्या आताही स्मरणात आहेत. सध्या हा बापू त्याच्या पापाची फळे भोगत व सरकारच्या नावाने शिव्याशाप देत देशाच्या कुठल्याशा तुरुंगात पडला आहे. श्रीश्री रविशंकर याही सत्पुरुषाने आरंभी मोदी व संघ यांच्या आरत्या गायला सुरुवात केली होती. तशी ती अजूनही थांबली नाही. मात्र तिचा आवाज कमी झाला आहे. या श्रीश्रींनी दिल्लीजवळ यमुनेच्या काठी त्यांच्या भक्तांचा जो मोठा उरुस भरविला तिचे पाणी गढूळ करून टाकले. त्यासाठी श्रीश्रींना पर्यावरणाचे रक्षण करणाºया खात्याने पाच कोटींचा दंड केला. वास्तविक हा दंड श्रीश्रींसाठी फार मोठा नव्हे. त्यांचा कोणताही भक्त त्यांच्यासाठी तेवढी रक्कम सरकारात जमा करू शकला असता. परंतु श्रीश्रींसारख्या सत्पुरुषाला सरकारने दंड ठोठावणे हीच बाब त्याच्या महात्म्याला बाधित करणारी ठरली. तेव्हापासून त्यांचीही मोदीनिष्ठा कमी झाली आहे. रामदेवबाबाचा क्रमांक त्यानंतरचा आहे. रामदेवबाबा राजकारणात आहे, उद्योगात आहे, अर्थकारणात आहे आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे त्याच्या वैचारिक भूमिकेत न शोधता आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात. जमिनी मिळाल्या, त्या अल्प किमतीत मिळाल्या, बाजार मिळाला आणि देशभरची गिºहाईकीहीमिळाली. एवढे सारे ज्यांच्या राजकारणाच्या कृपेने प्राप्त करता आले त्यांच्याच राजकारणावर बाबाने तोंडसुख घेणे हे त्याचमुळे अचंबित करणारे आहे.रामदेवबाबा राजकारण, उद्योग अर्थकारण आणि सौंदर्य प्रसाधनातही आले आहेत. असा माणूस मोदी आणि सरकारवर संतापून बोलत असेल तर त्याची कारणे आर्थिक व औद्योगिक हितसंबंधांच्या क्षेत्रातच शोधावी लागतात.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा