शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ही यांची काटकसर

By admin | Updated: April 15, 2016 04:40 IST

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही आणि प्रत्येकवेळी प्रत्येक अर्थमंत्री वा शासन प्रमुख काटकसरीचे धडे वाचून दाखवित असतो. बैठका आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये होणार नाहीत, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांना कातरी लावली जाईल, मंत्री असंख्य मोटारींचा ताफा घेऊन दौरे करणार नाहीत वगैरे वगैरे. नव्याचे नऊ दिवस या नियमाने किंवा अधिक स्पष्ट म्हणायचे तर लोकाना तेवढ्यापुरते दाखविण्यासाठी हे काटकसर पर्व काही दिवस सुरु राहाते आणि त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. जर तसे नसते आणि सरकारमधील सर्व कर्त्यांनी काटकसर अंगवळणी पाडून घेतली असती तर ‘कॅग’ला महाराष्ट्र सरकारच्या उधळपट्टीचे धिंडवडे काढण्याची संधीच मिळाली नसती. या म्हणजे राज्य सरकारच्या मंत्र्यांनी (आघाडी-युती दोन्ही, यात भेदभाव नाही) २०१० ते २०१५ या पाच वर्षात आपल्याला सरकारतर्फे मिळालेल्या सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण आणि पुनर्बांधणीकरण यावर वाजवीपेक्षा दस पटींनी अधिक खर्च केला असल्याचे कॅगचा अहवाल म्हणतो. या संपूर्ण खर्चाची बेरीज ५२ कोटी रुपयांच्या घरात जाते. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम ज्यांच्यावर खर्ची पडली त्या बंगल्यांची संख्या मात्र केवळ १५ इतकीच आहे. मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या आणि अधिवासासाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या खुद्द सरकारच्याच मालकीच्या काही इमारती दुरुस्त करण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा नाही पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळण्यासाठी मात्र पैशाची काही चणचण नाही, हा कॅगचा या संदर्भातला निष्कर्ष कसा अमान्य करणार? मोडकळीला आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत धरुन राहाणारे लोक आहेत पोलीस जवान आणि निवासी डॉक्टर्स. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सरकारी इमारतींच्या देखभालीसंबंधींचे जे निकष आहेत, ते विचारात घेता या १५ इमारतींवर पाच वर्षात अवघे ५.३ कोटी रुपयेच खर्ची पडावयास हवे होेते. परंतु यातील अधिक गंभीर आणि कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब पुढेच आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचे जे सरकारी निकष आहेत त्यांचा विचार केला तर हे सर्व १५ बंगले जमीनदोस्त करुन मोकळ्या झालेल्या जमिनीवर नवे बंगले बांधले गेले असते तर त्यासाठी लागले असते अवघे ३७ कोटी रुपये!