शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
3
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
4
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
5
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
6
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
7
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
8
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
9
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
10
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
11
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
12
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
13
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
14
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
15
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
16
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
17
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
18
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
19
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
20
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ही यांची काटकसर

By admin | Updated: April 15, 2016 04:40 IST

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही आणि प्रत्येकवेळी प्रत्येक अर्थमंत्री वा शासन प्रमुख काटकसरीचे धडे वाचून दाखवित असतो. बैठका आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये होणार नाहीत, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांना कातरी लावली जाईल, मंत्री असंख्य मोटारींचा ताफा घेऊन दौरे करणार नाहीत वगैरे वगैरे. नव्याचे नऊ दिवस या नियमाने किंवा अधिक स्पष्ट म्हणायचे तर लोकाना तेवढ्यापुरते दाखविण्यासाठी हे काटकसर पर्व काही दिवस सुरु राहाते आणि त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. जर तसे नसते आणि सरकारमधील सर्व कर्त्यांनी काटकसर अंगवळणी पाडून घेतली असती तर ‘कॅग’ला महाराष्ट्र सरकारच्या उधळपट्टीचे धिंडवडे काढण्याची संधीच मिळाली नसती. या म्हणजे राज्य सरकारच्या मंत्र्यांनी (आघाडी-युती दोन्ही, यात भेदभाव नाही) २०१० ते २०१५ या पाच वर्षात आपल्याला सरकारतर्फे मिळालेल्या सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण आणि पुनर्बांधणीकरण यावर वाजवीपेक्षा दस पटींनी अधिक खर्च केला असल्याचे कॅगचा अहवाल म्हणतो. या संपूर्ण खर्चाची बेरीज ५२ कोटी रुपयांच्या घरात जाते. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम ज्यांच्यावर खर्ची पडली त्या बंगल्यांची संख्या मात्र केवळ १५ इतकीच आहे. मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या आणि अधिवासासाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या खुद्द सरकारच्याच मालकीच्या काही इमारती दुरुस्त करण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा नाही पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळण्यासाठी मात्र पैशाची काही चणचण नाही, हा कॅगचा या संदर्भातला निष्कर्ष कसा अमान्य करणार? मोडकळीला आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत धरुन राहाणारे लोक आहेत पोलीस जवान आणि निवासी डॉक्टर्स. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सरकारी इमारतींच्या देखभालीसंबंधींचे जे निकष आहेत, ते विचारात घेता या १५ इमारतींवर पाच वर्षात अवघे ५.३ कोटी रुपयेच खर्ची पडावयास हवे होेते. परंतु यातील अधिक गंभीर आणि कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब पुढेच आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचे जे सरकारी निकष आहेत त्यांचा विचार केला तर हे सर्व १५ बंगले जमीनदोस्त करुन मोकळ्या झालेल्या जमिनीवर नवे बंगले बांधले गेले असते तर त्यासाठी लागले असते अवघे ३७ कोटी रुपये!