शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

ही यांची काटकसर

By admin | Updated: April 15, 2016 04:40 IST

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही

सरकार केन्द्रातले असो की राज्यातले आणि सरकारच कशाला, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थादेखील कायम आर्थिक ओढग्रस्तीत असतात. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळच बसत नाही आणि प्रत्येकवेळी प्रत्येक अर्थमंत्री वा शासन प्रमुख काटकसरीचे धडे वाचून दाखवित असतो. बैठका आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये होणार नाहीत, मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांना कातरी लावली जाईल, मंत्री असंख्य मोटारींचा ताफा घेऊन दौरे करणार नाहीत वगैरे वगैरे. नव्याचे नऊ दिवस या नियमाने किंवा अधिक स्पष्ट म्हणायचे तर लोकाना तेवढ्यापुरते दाखविण्यासाठी हे काटकसर पर्व काही दिवस सुरु राहाते आणि त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. जर तसे नसते आणि सरकारमधील सर्व कर्त्यांनी काटकसर अंगवळणी पाडून घेतली असती तर ‘कॅग’ला महाराष्ट्र सरकारच्या उधळपट्टीचे धिंडवडे काढण्याची संधीच मिळाली नसती. या म्हणजे राज्य सरकारच्या मंत्र्यांनी (आघाडी-युती दोन्ही, यात भेदभाव नाही) २०१० ते २०१५ या पाच वर्षात आपल्याला सरकारतर्फे मिळालेल्या सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरण, सुशोभीकरण आणि पुनर्बांधणीकरण यावर वाजवीपेक्षा दस पटींनी अधिक खर्च केला असल्याचे कॅगचा अहवाल म्हणतो. या संपूर्ण खर्चाची बेरीज ५२ कोटी रुपयांच्या घरात जाते. विशेष म्हणजे इतकी मोठी रक्कम ज्यांच्यावर खर्ची पडली त्या बंगल्यांची संख्या मात्र केवळ १५ इतकीच आहे. मुंबई शहरातील मोडकळीस आलेल्या आणि अधिवासासाठी अत्यंत असुरक्षित मानल्या जाणाऱ्या खुद्द सरकारच्याच मालकीच्या काही इमारती दुरुस्त करण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा नाही पण मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळण्यासाठी मात्र पैशाची काही चणचण नाही, हा कॅगचा या संदर्भातला निष्कर्ष कसा अमान्य करणार? मोडकळीला आलेल्या घरांमध्ये जीव मुठीत धरुन राहाणारे लोक आहेत पोलीस जवान आणि निवासी डॉक्टर्स. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सरकारी इमारतींच्या देखभालीसंबंधींचे जे निकष आहेत, ते विचारात घेता या १५ इमारतींवर पाच वर्षात अवघे ५.३ कोटी रुपयेच खर्ची पडावयास हवे होेते. परंतु यातील अधिक गंभीर आणि कर्जबाजारी व दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणी बाब पुढेच आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचे जे सरकारी निकष आहेत त्यांचा विचार केला तर हे सर्व १५ बंगले जमीनदोस्त करुन मोकळ्या झालेल्या जमिनीवर नवे बंगले बांधले गेले असते तर त्यासाठी लागले असते अवघे ३७ कोटी रुपये!