शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जास्त न्यायाधीश नेमण्याची गरजच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 5:17 AM

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वोच्च व उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी काही घटनादुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.

- शैलेश गांधीसरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सर्वोच्च व उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी काही घटनादुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. अशा दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या ३१ वरून आणखी वाढवावी आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय ६२ ते ६५ वयोगटातील निवृत्त न्यायाधीशांना ठरावीक मुदतीसाठी उच्च न्यायालयांवर हंगामी न्यायाधीश म्हणून नेमावे, असेही त्यांनी सुचविले आहे. सर्व संबंधितांकडून प्रयत्न करूनही या न्यायालयांमधील पदे पूर्ण क्षमतेने भरली जात नाहीत म्हणून प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली निघू शकत नाहीत, असेही त्यांचे म्हणणे आहे. ‘प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यासाठी माझ्या डोक्यात एक योजना आहे’, असे सांगत, दीड वर्षांपूर्वी सरन्यायाधीश झालेल्या न्या. गोगोई यांनी आता पदावरून जाण्यापूर्वी हा उपाय सुचविला आहे.रास्त वेळेत न्यायदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे व आपली न्यायव्यवस्था याची पूर्तता करण्यात अपयशी ठरली आहे. यासाठी गांभीर्याने आणि लवकरात लवकर उपाय योजायला हवेत, यावर कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; पण सरन्यायाधीश न्या. गोगोई यांच्या या प्रस्तावाने दुखणे मुळातून दूर होणार नाही. त्याने केवळ वरवरची मलमपट्टी होईल, असे माझे स्पष्ट मत आहे. न्यायाधीशांची संख्या कमी आहे म्हणून प्रकरणे लवकर निकाली निघत नाहीत, हे त्यांचे गृहितक बरोबर आहे; पण त्यावर न्यायाधीशांची संख्या वाढविणे हा उपाय नाही. शिवाय केवळ सर्वोच्च व उच्च न्यायालयांत जास्त न्यायाधीश नेमून किंवा त्यांचे निवृत्तीचे वय वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. कारण या दुखण्याचे खरे मूळ कनिष्ठ न्यायालयांमध्ये आहे. देशभरातील प्रलंबित प्रकरणांपैकी ८५ टक्के प्रलंबित प्रकरणे कनिष्ठ न्यायालयांत आहेत. त्यामुळे जो काही उपाय योजायचा तो कनिष्ठ न्यायालयांसह सर्वसमावेशक असल्याखेरीज इच्छित परिणाम मिळणार नाही.केंद्रीय विधि आयोगाने सन २००२ ते २०१२ या १० वर्षांतील अशा आकडेवारीचा अभ्यास करून सन २०१४ मध्ये एक अहवाल दिला होता. त्यात आयोगाने सर्व प्रलंबित प्रकरणे तीन वर्षांत निकाली काढायची असतील तर न्यायाधीशांची संख्या दुप्पट करावी लागेल, असा निष्कर्ष काढला होता. माझ्या मते हा निष्कर्ष चुकीचा होता. कारण त्यात न्यायाधीशांची रिक्त पदे गृहित धरलेली नव्हती.अशाच प्रकारची सन २००६ ते २०१६ या काळातील आकडेवारी घेऊन आणि तिचे वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करून याच समस्येवर उपाय शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्यातून असे दिसले की, न्यायाधीश कमी असल्याने प्रकरणे वेळेवर निकाली निघत नाहीत, हे खरे असले तरी त्यासाठी न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची गरज नाही. माझ्या विशलेषणावरून असे दिसले की, न्यायाधीशांची सर्व स्तरांवरील सर्व पदे वेळच्या वेळी भरली गेली असती तर केवळ जुनीच नाहीत तर नव्याने दाखल होणारी सर्व प्रकरणे वेळेत निकाली निघून प्रलंबित प्रकरणांचा हा डोंगर मुळात उभाच राहिला नसता, म्हणजेच या समस्येवर खरा शाश्वत उपाय न्यायाधीशांची संख्या आणखी वाढविणे हा नसून सर्व मंजूर पदे वेळच्या वेळी भरत राहणे हा आहे. यासाठी न्यायाधीशांची पदे कधीही रिकामी न ठेवण्याचा निर्धार करून तसा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी जबाबदारी निश्चित करणारा कायदा करावा लागणार असेल तर तोही करावा लागेल.हे करणे सहज शक्य आहे. मृत्यूचा अपवाद वगळला तर किती पदे केव्हा रिकामी होणार आहेत, याची नक्की माहिती आधीपासून असल्याने त्यानुसार तयारी करण्यात काही अडचण नाही. मंजूर असलेली सर्व पदे भरून तेवढी न्यायालये सदैव सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण देशासाठी फार तर २५ हजार रुपयांचा खर्च येईल. देशाला भेडसावणाऱ्या एका जुनाट समस्येचे निवारण करण्यासाठी हा खर्च नक्कीच जास्त नाही.न्यायालयीन प्रकरण वेळच्या वेळी निकाली काढण्याची माझी ही योजना व त्यामागचा विचार मध्यंतरी मी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांना सांगितला. त्यांच्याशी चर्चा केली. माझे म्हणणे त्यांना पटले. एवढेच नाही तर न्या. गोगोई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यावर न्या. श्रीकृष्ण यांनी त्यांना पाठविलेल्या अभिनंदनाच्या पत्रातही त्यांनी माझी ही योजना त्यांना शिफारशीसह कळविली. ‘आयआयटी’मधील १०० हून अधिक तज्ज्ञांनीही माझी कल्पना तपासून तिचे अनुमोदन केले. मी स्वत: सरन्यायाधीशांना पत्र लिहून माझे हे विचार त्यांना सविस्तरपणे कळविले आहेत. सरकारी सेवांमधील रिक्त पदे वेळच्या वेळी भरली जात नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालय सरकारला धारेवर धरत असते. सरन्यायाधीश न्या. गोगोई यांनी हवे तर माझे हे पत्र जनहित याचिका म्हणून सुनावणीस घेऊन या समस्येवर शाश्वत उपाय काढावा, अशी अपेक्षा आहे. असलेले अधिकारवापरून या संधीचे कसे सोने करायचे ते त्यांच्यावर अवलंबून आहे. ते काय करतात याकडे देशाचे औत्सुक्याने लक्ष आहे.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत